राज्यात पुणे, नाशिक, वर्धा, पालघर सह अनेक ठिकाणी आदिवासी विद्यार्थ्यांचे उपोषण मागील १३ दिवसापासून सुरु आहे. राज्यातील भाजपा महायुती सरकार विकासाच्या मोठ्या गप्पा मारते पण आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्यास त्यांना वेळ नाही, काल मंत्रिमंडळाची बैठक झाली पण त्यातही आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर चर्चा झाली नाही. भाजपा महायुती सरकार हे आदिवासी विरोधी आहे. या आदिवासी …
Read More »‘भगवान बिरसा मुंडा आदिवासी भूषण पुरस्कार’साठी प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ २५ ऑक्टोबर पर्यंत मुदत वाढ मंत्री अशोक वुईके यांची माहिती
आदिवासी कल्याण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि सामाजिक संस्थांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आदिवासी विकास विभागामार्फत ‘भगवान बिरसा मुंडा आदिवासी भूषण पुरस्कार’ तसेच ‘भगवान बिरसा मुंडा आदिवासी भूषण संस्था पुरस्कार’ देण्यात येतात. या पुरस्कारांसाठी प्रस्ताव स्वीकारण्यासाठी २५ ऑक्टोबर २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. जास्तीत जास्त व्यक्ती आणि संस्थानी प्रस्ताव …
Read More »आदिवासी मंत्री अशोक उईके यांचा विश्वास, आदिवासी बांधवांच्या न्याय्य हक्कांचे रक्षण होणार अनुसूचित जमातीसाठी स्वतंत्र आयोग स्थापन केल्याबद्दल महायुती सरकारचे अभिनंदन
राज्यात ‘महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोग’ स्थापन करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल राज्यातील १ कोटी ३५ लाख आदिवासी बांधवांतर्फे महायुती सरकारचे अभिनंदन करीत आहोत, असे राज्याचे आदिवासी मंत्री अशोक उईके यांनी शुक्रवारी सांगितले. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर प्रथमच आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी महायुती सरकारने हे महत्वपूर्ण पाऊल उचलून या आयोगासाठी वेगळी अर्थसंकल्पीय तरतूद ही केल्याबद्दल अशोक उईके यांनी …
Read More »आदिवासी विकास मंत्र्यांच्या संकल्पनेतून ‘संवाद चिमुकल्यांशी अभियान’ आश्रमशाळेत आदिवासी विकास मंत्र्यांसह अधिकारी करणार एक दिवसाचा मुक्काम
आदिवासी समाजाच्या शिक्षण आणि सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाने एक महत्वाचे अभियान राबवित आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनातील अडचणी, त्यांच्या सुरक्षिततेची हमी आणि उपलब्ध सुविधांची गुणवत्ता याबाबत माहिती मिळवून सुधारणा करण्यासाठी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या संकल्पनेतून ‘संवाद चिमुकल्यांशी’ अभियानाची सुरूवात करण्यात येणार आहे. ७ फेब्रुवारी २०२५ रोजी राज्यभरातील शासकीय …
Read More »आदीवासी आश्रमशाळांमध्ये आता इंग्रजी व सेमी इंग्रजीचे शिक्षण राज्य मंत्रिमंडळाने निर्णय घेतल्याची आदीवासी मंत्र्यांची माहिती
मुंबईः प्रतिनिधी राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या ५०२ शासकिय आदीवासी आश्रमशाळांपैकी ५० आश्रमशाळांमध्ये १ ली पासून इंग्रजी व सेमी इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार पहिल्या टप्प्यात २ हजार विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेश घेता येणे सुलभ होणार असल्याची माहिती आदीवासी विकास मंत्री अशोक उइके यांनी दिली. मंत्रालयातील …
Read More »आश्रमशाळा ते मिशिगन विद्यापीठ व्हाया राज्य शासन शासकीय योजनेमुळे उघडले परदेशी शिक्षणाचे द्वार
मुंबई: प्रतिनिधी गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी भागातील आश्रमशाळेची विद्यार्थिनी योगिता मारोतराव वरखडे हिला अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठात पीएचडीसाठी प्रवेश मिळाला असून परदेशात उच्च शिक्षण घेण्याचे तिचे स्वप्न साकार करण्यासाठी शासनाने शिष्यवृत्ती देऊन हातभार लावला आहे. योगिताप्रमाणेच यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथील सूरज आत्राम या आदिवासी विद्यार्थ्यास इंग्लंडमधील शेफील्ड विद्यापीठात प्रवेश मिळाला असून …
Read More »आदीवासी आश्रमशाळेतील शिक्षकांना ७ वा वेतन १० दिवसात लागू करणार आदीवासी मंत्री अशोक उईके यांची घोषणा
मुंबईः प्रतिनिधी राज्यातील आदीवासी विभागाच्या अखत्यारीत असलेल्या आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांना अद्याप ७ वा वेतन लागू करण्यात आलेला नव्हता. यासंदर्भातील प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यावेळी आदीवासी मंत्री अशोक उईके यांनी १० दिवसात ७ वा वेतन लागू करण्याची घोषणा विधानसभेत केली. बुधवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात शिवसेनेचे आमदार योगेश घोलप यांनी प्रश्न विचारला …
Read More »
Marathi e-Batmya