Tag Archives: forest minister

तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी मंत्रिमंडळातून वनमंत्री कोंडा सुरेखा यांना काढले वनमंत्री कोंडा सुरेखा यांच्या मुलीने मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यावर केली होती टीका

तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी वनमंत्री कोंडा सुरेखा यांना मंत्रिमंडळातून तात्काळ हटवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यांच्या मुलीने मुख्यमंत्र्यांवर जाहीर हल्ला करण्याच्या काही आठवड्यांपूर्वीच काँग्रेसच्या हायकमांडपर्यंत पोहोचलेला राजकीय वाद यामुळे अधिकच चिघळला आहे. गुरुवारी जारी केलेल्या अधिकृत निवेदनानुसार, सुरेखा यांना हटवण्याची शिफारस तेलंगणाचे राज्यपाल शिव प्रताप शुक्ला यांना पाठवण्यात …

Read More »

वनमंत्री गणेश नाईक यांचे निर्देश, फ्लेमिंगो, सोनेरी कोल्हे आणि वन्यजीवांचा अधिवास अबाधित ठेवा वन्यपक्ष्यांचा नैसर्गिक अधिवास जपण्यासाठी दिले निर्देश

नवी मुंबईतील फ्लेमिंगो, सोनेरी कोल्हे, मुंगूस आणि विविध वन्यपक्ष्यांचा नैसर्गिक अधिवास जपण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश मंत्री नाईक यांनी दिले. नवी मुंबईच्या डी.पी.एस. तलाव परिसराचे संवर्धन करून फ्लेमिंगो पक्ष्यांसाठी पोषक नैसर्गिक अधिवास निर्माण करण्यासोबतच नेरुळ सेक्टर ५२-ए परिसराचा फ्लेमिंगो कन्झर्वेशन झोनमध्ये समावेश करण्याबाबत वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक …

Read More »

गणेश नाईक यांचा इशारा, वृक्षतोड परवानगी प्रक्रियेत गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही विधानसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना दिली माहिती

वृक्षतोड परवानगी प्रक्रियेचे डिजिटलीकरण आणि सुलभीकरण करताना पर्यावरणाचा समतोल राखणे तसेच राज्यातील जुन्या व दुर्मिळ वृक्षसंपदेचे जतन व संवर्धन करण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. या प्रक्रियेत सर्व कायदेशीर व तांत्रिक निकषांचे काटेकोर पालन केले जात असून गैरप्रकार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत …

Read More »

वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती, वणव्यांबाबत जनजागृती वाढविण्यावर भर शासकिय आणि खाजगी वनांमध्ये वणवा पेटण्याच्य अनेक घटना

कोकणातील वणव्यांच्या घटनांमागे मोठ्याप्रमाणात जनजागृतीचा अभाव आणि शेतकऱ्यांमधील गैरसमज कारणीभूत असल्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत सांगितले. वणवे रोखण्यासाठी वन विभाग, कृषी विभाग, ग्रामपंचायती, महसूल यंत्रणा; तसेच लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून व्यापक जनजागृती मोहीम राबविली जाणार असल्याची माहिती त्यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली. सदस्य प्रशांत ठाकूर यांनी कोकणातील वणव्यांचा प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना …

Read More »

गणेश नाईक यांची माहिती, वन्य प्राण्यांच्या हालचालीच्या माहितीसाठी एक हजार गावांमध्ये अलर्ट यंत्रणा मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी २६० कोटींच्या कृती आराखड्यास मंजुरी, अत्याधुनिक नियंत्रण कक्ष, रेस्क्यू सेंटर, उपचार केंद्रे उभारणार

मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी राज्यात पहिल्या टप्प्यात दहा ठिकाणी नियंत्रण कक्ष उभारणे, राज्यातील एक हजार गावांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित अर्लट यंत्रणा उभारणे तसेच दोन रेस्क्यू सेंटर व दहा उपचार केंद्रे उभारण्यास राज्य वन्य जीव मंडळाच्या स्थायी समितीच्या बैठकीत अध्यक्ष तथा वन मंत्री गणेश नाईक यांनी मंजुरी दिली. हा प्रकल्प सुमारे २६० कोटी …

Read More »

गणेश नाईक यांची स्पष्टोक्ती, कांदळवन क्षेत्रातील अतिक्रमणांवर कारवाई होणार मुंबई परिसरात समुद्रकिनाऱ्यावरी कांदळवन हे पर्यावरणीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे

मुंबईच्या किनारपट्टीवरील कांदळवन क्षेत्रातील अतिक्रमणांबाबत गंभीर दखल घेण्यात आली असून, संबंधित प्रकरणांची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत सांगितले. सदस्य संजय उपाध्याय यांनी यासंदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य मनिषा चौधरी यांनी सहभाग घेतला. लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना वनमंत्री गणेश नाईक …

Read More »

गणेश नाईक यांचे आश्वासन,बांबूपासून निर्मित उत्पादनांना मॉलमध्ये जागा देण्यासाठी प्रयत्न करणार ग्रामीण व आदिवासी भागात रोजगार निर्मितीवर सरकारचा भर

प्लास्टिकच्या वाढत्या वापरामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत असून त्याला प्रभावी पर्याय म्हणून बांबू लागवडीला प्रोत्साहन देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. बांबू उत्पादन, प्रक्रिया आणि बाजारपेठ निर्मितीद्वारे ग्रामीण व आदिवासी भागात रोजगारनिर्मिती करण्यावर सरकारचा भर आहे. तसेच शेतकरी व आदिवासी बांधवांना बांबू निर्मितीसाठी प्रोत्साहन देणे व त्यांच्या उत्पादनांना मॉलमध्ये विक्रीसाठी जागा उपलब्ध …

Read More »

गणेश नाईक यांचे आश्वासन, मानव–वन्यजीव संघर्ष दूर करण्यासाठी पर्यायी उपाययोजना राबवू विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासा दरम्यान दिले आश्वासन

मानव–वन्यजीव संघर्ष दूर करण्याबरोबरच पर्यायी शेती व पुनर्वसनासह दीर्घकालीन उपाययोजना राबवण्याचा शासनाचा मानस असल्याचे प्रतिपादन वनमंत्री गणेश नाईक यांनी विधान परिषदेत केले. नवेगाव–नागझिरा व्याघ्र प्रकल्पाबाबत विधानपरिषद सदस्य डॉ.परिणय फुके यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना गणेश नाईक म्हणाले की, नवेगाव – नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राचे बफर क्षेत्र वाढवण्याचा कोणताही प्रस्ताव शासनाच्या …

Read More »

गणेश नाईक यांची माहिती, बिबट्याची नसबंदी करण्याचा प्रस्ताव केंद्राला पाठवणार भविष्यात बिबट्यांच्या हल्ल्यात एकही मृत्यू होणार नाही यासाठी यंत्रणा सतर्क

राज्यातील मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी वन विभागाकडून ठोस उपाययोजना करण्यात येत आहेत. भविष्यात एकही मनुष्य मृत्यूमुखी पडणार नाही, यासाठी यंत्रणा सतर्क केली आहे. यासंदर्भात लोकप्रतिनिधींची बैठक घेण्यात येणार आहे. तसेच बिबट्यांची नसबंदी करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठविणार असल्याची माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी मंगळवारी विधानसभेत दिली. राज्यातील बिबट्यांच्या हल्ल्यासंदर्भात …

Read More »

गणेश नाईक यांची माहिती, जुन्नर व शिरूर परिसरातील बिबट्यांचे तातडीने स्थलांतर करणार ·त्वरित २०० पिंजरे बसविणार, आणखी १ हजार पिंजरे युद्धपातळीवर खरेदी करणार

पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, राजगुरूनगर व शिरुर परिसरातील बिबट्यांमुळे मनुष्यहानी होणे ही दुर्देवी घटना आहे. यावर दीर्घ व तातडीच्या उपाययोजना करण्यात येतील. या परिसरातील बिबट्यांना पकडण्यासाठी २०० पिंजरे तातडीने लावण्यात येतील. आणखी एक हजार पिंजरे युद्धपातळीवर खरेदी करण्यात येणार आहेत. या परिसरातील बिबट्यांना पकडून त्यांचे तातडीने स्थलांतर करण्यात येईल. तसेच …

Read More »