आरक्षणप्रश्नावर काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट आहे आणि ती वेळोवेळी काँग्रेसने जाहीर केलेली आहे. पण भाजपाचे आमदार नितेश राणे यांना त्याची माहिती नसावी म्हणून अज्ञानातून त्यांनी काँग्रेसची भूमिका विचारली आहे. देशभरातील विविध जातींच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावायचा असेल तर, ‘जातनिहाय जनगणना करणे व आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवली पाहिजे’, असा ठराव …
Read More »रामदास आठवले म्हणाले, मराठा आरक्षणासाठी राज्यातही ६९ टक्के आरक्षण करा… मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभर प्रत्येक जिल्ह्यात आरपीआय शांततापूर्ण आंदोलन करणार
मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी तामिळनाडूत जसे ६९ टक्के आरक्षण आहे; त्या धर्तीवर महाराष्ट्रात आरक्षण वाढविले पाहिजे. तामिळनाडूत ओबीसी मध्ये दोन प्रकारचे आरक्षण असून एका ओबीसी गटाला ३० टक्के आणि दुसऱ्या ओबीसी गटाला २० टक्के आरक्षण तसेच अनुसूचित जातीला १८ टक्के आणि आदिवासींना १ टक्का आरक्षण असे मिळून ६९ टक्के आरक्षण …
Read More »मराठा आरक्षण मिळूपर्यंत ‘या’ गावात दिवाळी साजरी न करण्याचा निर्धार मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर साजरी दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय
राज्यात मराठा आरक्षण मुद्धा तापत असून मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आंदोलनाला सुरवात केली आहे. अशातच राज्यभरात मराठा आरक्षणाचा मुद्दा दिवसेंदिवस चिघळत असून राज्यभरात आंदोलन करण्यात येत आहेत. जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा निर्णय घेतला जात आहे. नाशकात देखील सकल मराठा समाज आक्रमक …
Read More »अखेर सत्ताधारी सहयोगी पक्षांच्या आमदारांनीच मंत्रालयाला ठोकले टाळे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि दादा भूसे यांच्य गाड्या फोडल्या
राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्यावरून वातावरण चांगलेच तप्त झालेले आहे. तसेच अनेक आमदार, खासदार आणि मंत्र्यांना मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी गाव बंदी केल्याने त्याचा फटका या आमदारांना बसला आहे. यापार्श्वभूमीवर शरद पवार गटाच्या, अजित पवार गटाच्या आणि ठाकरे गटाच्या आमदारांसह काँग्रेसच्या काही आमदारांनी आज सकाळी राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन करत मंत्रालयाच्या प्रवेशद्वाराला …
Read More »मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठकीत “या” मुद्यावर एकमुखी ठराव राज्यात शांतता, कायदा सुव्यवस्था राखण्याचे आवाहन
मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत असून कायदेशीर बाबी पूर्ण करूनच टिकणारे आरक्षण देण्यासाठी राज्यातील सर्वच पक्ष एकत्रितपणे काम करायला तयार आहेत. मात्र, राज्यात कुणीही कायदा हातात घेऊ नये, राज्यातील शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी, असे आवाहन आज सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत करण्यात आले. तसेच या सर्व …
Read More »जितेंद्र आव्हाड यांचा आरोप, सध्याच्या परिस्थितीला मुख्यमंत्री- दोन्ही उपमुख्यमंत्री जबाबदार उपमुख्यमंत्र्यानी राजीनामे द्यावे
राज्यातील सध्याच्या परिस्थितीला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जबाबदार असून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. तसेच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव जितेंद्र आव्हाड यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केली. जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले की, मराठा आरक्षणावरून सध्या राज्यामध्ये अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मराठा आंदोलक …
Read More »सुनिल तटकरे म्हणाले, आता राजकारण करायची ही वेळ नाही… सर्वच राजकीय पक्षांनी जबाबदारीने सहकार्य करण्याची आवश्यकता
समाजात अस्वस्थता निर्माण होते त्यावेळी निर्माण झालेल्या परिस्थितीचा राजकीय फायदा घेणे योग्य ठरु शकत नाही. सर्वच राजकीय पक्षांनी जबाबदारीने आज ज्या परिस्थितीतून महाराष्ट्रातील स्थिती जातेय त्यामध्ये सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. राजकारण करायचे असते त्यावेळी करता येते परंतु आता राजकारण करायची ही वेळ नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे …
Read More »मोठी बातमीः कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरु न्या. शिंदे समितीचा पहिला अहवाल स्वीकारला
मराठवाड्यातील निझामकालीन व इतर उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे मराठा -कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्रांसंदर्भात कार्यवाही निश्चित करणाऱ्या निवृत्त न्या. संदीप शिंदे समितीचा पहिला अहवाल आज राज्य मंत्रिमंडळाने स्वीकृत केला. अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या अहवालामध्ये निवृत्त न्या. संदीप शिंदे समितीने नमूद केल्याप्रमाणे मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील सुमारे पावणेदोन कोटी नोंदी तपासण्यात आल्या …
Read More »मनोज जरांगे पाटील यांची स्पष्टोक्ती, सर्वसामान्य मराठा असे करू शकत नाही मराठा शांततेत आंदोलन करा
मराठा आरक्षण प्रश्नी आज मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक बोलावित चर्चा करण्यात आली. त्या बैठकीत मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या अनुषंगाने ठोस निर्णय न झाल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्रकार परिषदेतून स्पष्ट झाले. त्यानंतर राज्यातील मराठा आरक्षणाच्या आंदोलकांनी मराठवाड्यातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये आमदारांची घरे जाळण्याचे प्रकार करण्यात आले. तर काही आमदारांच्या …
Read More »जरांगे पाटील यांच्या तब्येतीसाठी प्रार्थना चिंततो…, रितेश देशमुखची सूचक पोस्ट जरांगे पाटील शांतीपूर्ण उपोषणाला बसलेत त्यांच्या तब्येतीसाठी मी प्रार्थना चिंततो
राज्य सरकारला दिलेली मुदत संपल्यानंतर मराठा आरक्षणासाठी आंतरवाली सराटी गावात पुन्हा एकदा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले आहे. त्यांनी अन्न-पाणी त्याग करुन आमरण उपोषणाला सुरूवात केली. आज उपोषणाचा सहावा दिवस आहे. सध्या सरकारी डॉक्टर तपासणी साठी आलेले असताना जरांगे पाटलांनी त्यांना पुन्हा पाठवले होते. रविवारी त्यांची …
Read More »
Marathi e-Batmya