राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारकडून करण्यात येत असलेल्या मुंबईतील कामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करण्यात येत असल्याचा आरोप करत ठाकरे गटाकडून आज शनिवारी मुंबईत महामोर्चाच आयोजन करण्यात आलं. या मोर्च्याला मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते. हा मोर्चा मेट्रो सिनेमापासून मनपा कार्यालयापर्यंत काढण्यात आला. या मोर्च्याला सुरुवात होण्यापूर्वी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी …
Read More »समृद्धी महामार्गावरील अपघाताबाबत मुख्यमंत्री शिंदे, पंतप्रधान मोदींकडून शोक मुख्यमंत्री शिंदेंकडून पाच लाख तर पंतप्रधानांकडून २ लाखांची मदत मृतांच्या कुटुंबियांसाठी जाहिर
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ समृद्धी महामार्गावर खाजगी बसच्या झालेल्या भीषण अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या अपघातातील मृत आणि त्यांच्या कुटुंबिंयांप्रति सहवेदना प्रकट करुन या दुर्दैवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या …
Read More »संजय राऊत यांचा सवाल, इथे का समान नागरी कायदा नाही? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समान नागरी कायद्यावर खोच टीका
देशात समान नागरी कायदा आणण्याच्या हालचालींना वेग आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तसे सूचक विधानही केलं आहे. यावर शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. देशात चार-चार कायदे लागू आहेत. भ्रष्टाचारासंदर्भात जे आपल्याविरोधात आहेत, त्यांना एक कायदा. स्वत:च्या पक्षात आलेल्या भ्रष्टाचाऱ्यांना दुसरा कायदा. …
Read More »देवेंद्र फडणवीस यांनी मानले ऊसाच्या एफआरपी व युरियावरील सबसिडीसाठी पंतप्रधानांचे आभार ऊसाला ३१५ रुपये प्रती क्विंटल तर ३.६८ लाख हजार कोटींची युरिया सबसिडी ३ वर्षांसाठी
केंद्र सरकारने युरियावर ३ वर्षांसाठी सबसिडी देण्याचा तसेच ऊसाची एफआरपी वाढविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना फार मोठा लाभ होणार आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा मी नितांत आभारी आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने …
Read More »नाना पटोले यांचा आरोप, राहुल गांधींना मणिपूरच्या लोकांना भेटू न देणे ही हुकुमशाही मणिपूर हिंसाचारावर पंतप्रधान मोदींची कृती ‘रोमच्या निरो’ पेक्षाही असंवेदनशील
मणिपूरमध्ये सुरु असलेला हिंसाचार ५२ दिवसानंतरही शमलेला नाही आणि पंतप्रधानही या हिंसाचारावर साधा ‘म’ सुद्धा काढत नाहीत हे या देशाचे व मणिपूरी जनतेचे दुर्भाग्य आहे. ‘रोम जळत असताना निरो फिडल वाजवत होता’ या प्रवृत्तीलाही लाजवेल एवढा असंवेदनशील पंतप्रधान भारताला लाभला आहे. केंद्र सरकार स्वतः काही करत नाही आणि विरोधी पक्षाचे …
Read More »पंतप्रधानांच्या टीकेला शरद पवार यांचे प्रत्युत्तर, स्वकर्तृत्वशिवाय जनता मतदान करत नाही… सुप्रिया सुळे या स्वर्तृत्वावर निवडूण येतात, कामाचे कौतुक संसदरत्न पुरस्कारने
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकांच्या अनुषंगाने नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळ येथील पक्ष कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह देशातील सर्व विरोधकांवर टीका केली. पंतप्रधान मोदी यांच्या टीकेला आज शरद पवार यांनी प्रत्युत्तर देत चांगलेच सुनावले. तसेच पंतप्रधान मोदींनी केलेली टीका अशोभणीय असून प्रत्येक वेळी मुला-मुलींना …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांचे प्रतिपादन, वंदे भारत एक्सप्रेसमुळे कोकण पर्यटनाला चालना छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे मडगाव - मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचे स्वागत
मडगाव (गोवा) – मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसमुळे विस्तीर्ण समुद्र किनारा, आंबा, नारळी, पोफळीच्या बागा आणि डोंगर – दऱ्यांनी नटलेल्या कोकणातील पर्यटनाला चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सकाळी मडगाव ते मुंबईदरम्यान धावणाऱ्या वंदेभारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखविला. त्यानंतर काल सायंकाळी …
Read More »शरद पवार यांनी उघडकीला आणले पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यातील खोटे आरोप
पंतप्रधान मोदी यांनी मध्यप्रदेशातील भोपाळ येथे आज भाजपाच्या बुथ कार्यकर्त्यांना दृकश्राव्य पद्धतीने मार्गदर्शन केले. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच विरोधकांच्या झालेल्या बैठकीचा संदर्भावरून विरोधांवर टीका करताना शरद पवार यांच्यावर तसंच महाराष्ट्रातील विविध घोटाळ्यांचा संदर्भ देत विरोधकांवर जोरदार टीका केली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर तब्बल …
Read More »देवेंद्र फडणवीस म्हणाले, वेगाने वाढणाऱ्या भारतीय अर्थ व्यवस्थेची माहिती पोहोचवा
मोदी सरकारच्या ‘गरीब कल्याण’ कार्यक्रमातून गरीबांचे उंचावलेले जीवनमान, सर्वसमावेशक विकासामुळे जगात सर्वाधिक वेगाने वाढणारी भारताची अर्थव्यवस्था याची माहिती भाजपा कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी सामान्य माणसांपर्यंत घरोघरी जाऊन पोहचविली पाहिजे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केले. भोपाळ येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज १० लाख बूथ वरील कार्यकर्त्यांना ऑनलाईन मार्गदर्शन केले. …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टीका, शरद पवार यांच्या मुलीचे भले करायचे असेल तर राष्ट्रवादीला मत द्या पंतप्रधान मोदी यांच्याकडून पहिल्यादाच शरद पवारांचे नाव घेत साधला निशाणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मध्य प्रदेशातील भोपाळ येथे भाजपाच्या बुथ कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी पाच वंदे भारत रेल्वेंना हिरवा झेंडा दाखवला. या कार्यक्रमात त्यांनी भाजपा कार्यकर्त्यांना अंगणवाडी शाळांमध्ये खजूर आणि इतर फळं वाटण्याचाही सल्ला दिला. मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं …
Read More »
Marathi e-Batmya