Tag Archives: pm narendra modi

पेट्रोल, डिझेलवरील अन्यायी कर कमी करून जीएसटीच्या कक्षेत आणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांची मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मागणी

मुंबई : प्रतिनिधी राज्यात इंधनावर सरकारने लावलेला अन्यायी कर कमी करावा व त्यावरील विविध अधिभार तात्काळ रद्द करून पेट्रोल डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करावा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली. सध्या संपूर्ण देशपातळीवर महाराष्ट्रात पेट्रोल व डिझेलचे दर सर्वाधिक …

Read More »

महाराष्ट्राला १५ पंतप्रधान पुरस्कार ११ वर्षात ८ योजनांच्या क्षेत्रात पुरस्कार मिळाले

नवी दिल्ली : प्रतिनिधी लोकप्रशासनात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांना पंतप्रधान पुरस्कार देऊन गौरविण्यात येते, गेल्या ११ वर्षात महाराष्ट्राला  ८ योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीबद्दल १५ अधिकाऱ्यांना पंतप्रधान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. शासकीय योजना प्रभावीपणे राबवून लोकप्रशासनाचे उत्तम उदाहरण स्थापित करणाऱ्या प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांना पंतप्रधान पुरस्कार दिला जातो. दरवर्षी २१ एप्रिल या …

Read More »

भाजप सरकाराच्या कारभाराविरोधात तुषार गांधी, प्रज्ञा पवार, आशुतोष शिर्के, राम पुनियानी यांचे आवाहन राज्यातील १६ विचारवंत, साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांची जनतेला हाक

मुंबई : प्रतिनिधी संपूर्ण देशभरात सामाजिक, राजकिय आणि आर्थिकस्तरावर हाहाकार माजला आहे. त्यामुळे देशात सामजिक सलोखा बिघडलेला आहे. तर अल्पवयीन मुली आणि महिलांचे जीवन धोक्यात आले असून सर्वसामान्य नागरीकांना न्याय देणाऱ्या न्यायपालिकेतील सावळा गोंधळावर भाष्य करण्यासाठी चार न्यायाधीशांना पत्रकार परिषद घ्यावी लागली. यावरून देशात लोकशाहीचे मोठ्या प्रमाणावर अवमुल्यन होत असून …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीसांचे गुजरातवर प्रेम राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडी सतत गुजरात राज्याचे नाव असते. त्यामुळे त्यांचे महाराष्ट्रापेक्षा गुडजरातवर अधिक प्रेम असल्याचे दिसून येत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी करत  कोकणातील नाणार रिफायनरीला विरोध होत असताना, मुख्यमंत्री फडणवीस यांनी हा प्रकल्प गुजरातला जाईल अशी शक्यता वर्तवल्याने मुख्यमंत्र्यांना सध्या …

Read More »

चायरे यांच्या आत्महत्येप्रकरणी पंतप्रधान मोदींवर गुन्हा दाखल करण्यास काँग्रेसचा पाठिंबा अपयशी ठरल्याने मोदींकडून उपोषणाचे ढोंग: अशोक चव्हाण यांचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जबाबदार धरून यवतमाळ जिल्ह्यातील राजूरवाडी येथील शेतकरी शंकर चायरे यांनी मंगळवारी आत्महत्या केली. चायरे कुटुंबियांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे. काँग्रेस पक्षाचा त्यांच्या मागणीला पाठिंबा आहे. कुटुंबियांच्या मागणी प्रमाणे चायरे यांच्या आत्महत्येप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर …

Read More »

विरोधकांच्या उपोषणाला भाजपचे निषेध उपोषणाचे प्रतित्तुर पंतप्रधान, मुख्यमंत्री, अमित शहासह केंद्रीय मंत्री, आमदार-खासदारांचे देशभरात उपोषण

मुंबई : प्रतिनिधी देशात शांतता आणि सलोखा कायम रहावा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नकारात्मक कारभाराच्या विरोधात दोन दिवसांपूर्वी कॉंग्रेसने देशभरात एकदिवसीय उपोषण केले. त्यास प्रतित्तुर म्हणून भाजप अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत विरोधकांनी कामकाज चालू दिले नसल्याच्या निषेधार्थ आज एकदिवसीय उपोषण करण्यास सुरुवात केली. दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी …

Read More »

मोदी सरकारच्या कारभारा विरोधात काँग्रेसचे एक दिवसीय उपोषण काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी केंद्रातील भाजप सरकारच्या द्वेषपूर्ण भूमिके आणि कारभारामुळे देशातील शांतता व सामाजिक सलोखा धोक्यात आला आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या या कारभाराच्या निषेधार्थ आणि देशात शांतता व सलोखा कायम राखण्यासाठी काँग्रेस पक्षातर्फे उद्या ९ एप्रिल रोजी राज्यभरातील सर्व जिल्हा मुख्यालयांमध्ये एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात येणार असल्याची घोषणा महाराष्ट्र …

Read More »

अखेर गरीबांना रेशनवर मिळणारी साखर बंद केंद्रानेच गरीबांची साखर नाकारल्याचा अन्न व नागरी पुरवठा मंत्री बापट यांचा खुलासा

मुंबई : बी.निलेश ‘सबका साथ सबका विकास’ चा नारा देत विकासाच्या घोषणा करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने रेशन दुकानावर मिळणारी गरीबांची साखर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र राज्य सरकारने रेशनवर द्रारीद्रय रेषेखालील लोकांना पुन्हा साखर मिळावी यासाठी प्रस्ताव पाठवला पण तोही फेटाळून लावल्याचे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा …

Read More »

घरांसाठी करार करणाऱ्या सरकारकडून दोन वर्षात एक वीटही नाही रचली २१० कोटी रूपयांपैकी फक्त ५ कोटींचा खर्च

मुंबई: प्रतिनिधी देशातील प्रत्येक नागरीकाला स्वस्त आणि परवडणाऱ्या दरात घर मिळावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१५ साली प्रत्येकाला घर देण्याची घोषणा ९ डिसेंबर २०१५ रोजी केली. मात्र या घरांच्या निर्मितीसाठी मागील दोन वर्षात दोन वेळा विविध बांधकाम व्यावसायिकांशी सामंज्यस करार करणाऱ्या राज्य सरकारने स्वत:च्या गृहनिर्माण क्षेत्रातील म्हाडा, सिडकोच्या माध्यमातून …

Read More »

केंद्राच्या निधीतून राज्यात ४ लाख कोटींची कामे पूर्ण केंद्रीय भूपृष्ठमंत्री गडकरींची ग्वाही

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राचा प्रतिनिधी म्हणून केंद्र सरकारमध्ये मला काम करण्याची संधी मिळाली असून रस्ते वाहतूक आणि नौकानयन विभागाच्या माध्यमातून राज्यात आतापर्यंत ४ लाख २७ हजार ८५५ कोटी रुपयांची कामे मार्गी लावली आहेत. माझ्या कार्यकाळात ५ लाख कोटींची कामे करण्याचे टार्गेट ठेवले होते. ते लक्ष्य पूर्ण करून सहा लाख कोटीपर्यंतची …

Read More »