एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह देण्यात आल्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला. या निर्णयामुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. या निकालानंतर उध्दव ठाकरे यांनी मातोश्री या आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद आयोजित करत आपली भूमिका मांडताना केंद्रिय निवडणूक आयोगासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खोचक टीका …
Read More »मोठी बातमीः या एका चुकीमुळे ठाकरेंची शिवसेना- धनुष्यबाण एकनाथ शिंदेंनाः वाचा निकालपत्र निवडणूक आयोगाने ७८ पानी निकालपत्रात दिली सविस्तर कारणे
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाच्या विरोधात एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडाचे निशाण फडकावित शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह असलेल्या धनुष्यबाणावर दावा केला. त्यावर उध्दव ठाकरे यांच्या गटाने केंद्रीय निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. तसेच सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत निवडणूक आयोगाने निर्णय देवू नये अशी मागणी केली. …
Read More »एकनाथ शिंदे गटाच्या बंडखोरीवर देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी तुम्हाला सविस्तर घटनाक्रमच सांगतो.. शिंदे गटाच्या बंडखोरीवर पहिल्यांदाच केले भाष्य
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी उलथवून टाकण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी सुरुवातीला २५ आमदारांना घेऊन बंडखोरी केली. त्यावेळी या बंडखोरीमागे देवेंद्र फडणवीस आणि भाजपा नेतेच असल्याची चर्चा राज्याच्या वर्तुळात सुरु झाली. त्यावेळी फडणवीस यांच्यासह भाजपा नेत्यांनी कानावर हात ठेवत शिंदेंच्या बंडखोरीशी कोणताही संबध नसल्याचा सांगत हात झटकण्याचा प्रयत्न …
Read More »सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर संजय राऊत म्हणाले, …अखेर न्यायालयाला ठरवावं लागेल ठाकरे गटाची मागणी पाच सदस्यी घटनापीठाने फेटाळली
महाराष्ट्रासह देशाच्या दृष्टीने महत्वपूर्ण बनलेल्या शिंदे आणि ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकांवर सलग तीन दिवस सुनावणी घेतली. या दरम्यान, नबाम रेबिया खटल्याचा संदर्भ देण्यात आला. तसेच पक्षांतर बंदी कायद्याच्या अनुषंगाने परिशिष्ट १० चा मुद्दा प्रकर्षाने पुढे आला. या साऱ्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने प्रकरण किचकट असल्याचे स्पष्ट करत ही याचिका ७ …
Read More »सर्वोच्च न्यायालयः निर्णय कोणाच्या बाजूने? शिंदे गटाच्या की ठाकरे गटाच्या युक्तीवादानुसार सकाळी १०.३० वाजल्यापासून सुनावणी सुरू
मागील तीन दिवसांपासून राज्यातील सत्तासंघर्षात एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या ४० आमदारांनी केलेल्या बंडखोरीला नबाम रेबिया खटल्याचा निकाल लागू होणार की ठाकरे गटाने केलेल्या मागणीनुसार परिशिष्ट १० तील तरतूदीनुसार हे ४० आमदार अपात्र ठरणार याविषयी युक्तीवाद सर्वोच्च न्यायालयात आज दोन्ही गटाकडून पूर्ण करण्यात आला. या युक्तीवादावर सर्वोच्च न्यायालयाने अद्याप निकाल राखून …
Read More »उज्वल निकम म्हणाले, स्वायत्त संस्थाचा अधिकार सर्वोच्च न्यायालय घेईल का? हा प्रश्न नबाम रेबिया, परिशिष्ट १० पेक्षा स्वायत्त संस्थांचे अधिकाराबाबतचा प्रश्न महत्वाचा
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर गेले तीन दिवस झालं, सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. या सत्तासंघर्षाची सुनावणी ५ की ७ जणांच्या न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे सोपवायची, यावरचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे. पण, तिनही दिवसांच्या सुनावणीत नबाम रेबिया प्रकरणावरून ठाकरे आणि शिंदे गटाकडून जोरदार युक्तीवाद करण्यात आला आहे. यावर आता ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम …
Read More »देवेंद्र फडणवीसांच्या त्या वक्तव्यावर अजित पवारांची स्पष्टोक्ती, मी माझ्या मतावर ठाम पहाटेच्या शपथविधीबाबत मला वाटेल तेव्हाच मी सांगणार
तीन वर्षापूर्वी एकाबाजूला महाविकास आघाडीची सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली सुरु असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या मदतीने देवेंद्र फडणवीस यांनी औट घटकेचे सरकार स्थापन केले. त्यासाठी पहाटेचा शपथविधी उरकण्यात आला. या शपथविधीप्रकरणावरून आतापर्यंत ४ पुस्तके निघाली. त्यातच देवेंद्र फडणवीस यांनी या शपथविधीप्रकरणावरून शरद पवार यांचे थेट नाव घेत एकच …
Read More »राज्यातील राजकिय पेचप्रसंगावर नबाम रेबिया की परिशिष्ट १०? विधिज्ञ म्हणाले, ते दोन्ही संदर्भ…. सर्वोच्च न्यायालय मात्र उद्या निर्णय देण्याची शक्यता
राज्यात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार उलथविण्यासाठी शिवसेनेत मोठी फूट पाडण्यात आली. त्यामुळे खरी शिवसेना कोणाची, विधिमंडळाच्या उपाध्यक्षांना कोणते अधिकार यासह सर्वच गोष्टींवर ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून नबाम रेबिया आणि किहोतो खटल्यातील निर्णयाचा संदर्भ देण्यात येत आहे. मात्र या निकालानंतर संसदेत मंजूर करण्यात आलेल्या परिशिष्ट …
Read More »न्यायालयाने निर्णय राखून ठेवताच संजय राऊत म्हणाले, अजूनही या देशात न्याय जिवंत आमचा न्यायालयावर विश्वास
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाविरोधात एकनाथ शिंदे यांच्यासह ४० जणांनी बंड पुकारत शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्ह असलेल्या धनुष्यबाणावरच दावा ठोकला. याप्रश्नी ज्या नबाम रेबिया या खटल्याचा संदर्भ देण्यात येतो त्या खटल्याची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाच्या ७ सदस्यीय खंडपीठा समोर झाली होती. मात्र आता परिशिष्ठ १० मधील सुधारणेनंतर या याचिकेची सुनावणीही …
Read More »सर्वोच्च न्यायालयः शिंदे विरूध्द ठाकरे प्रकरणात नाबिया निकालाचे मापदंड नाही ठाकरे गटाचा युक्तीवाद पूर्ण उद्या शिंदे गटाकडून युक्तीवाद
शिवसेनेतील बंडखोरीप्रकरणी आणि विधासभा उपाध्यक्षाच्या विरोधात आणलेला अविश्वासाच्या ठरावाच्या अनुषंगाने सध्या सर्वोच्च न्यायालयातील याचिकेवर सुनावणी सुरु आहे. उध्दव ठाकरे गटाने केलेल्या मागणीनुसार ७ सदस्यीय खंडपीठाकडे सरदची याचिका पाठवावी अशी मागणी करण्यात आली. त्यावर सध्या नेमण्यात आलेल्या ५ सदस्यीय घटनापीठासमोर दोन्ही गटाना बाजू मांडण्याचे आदेश दिले. त्यानुसार आज सुनावणी दरम्यान ठाकरे …
Read More »
Marathi e-Batmya