साखरेच्या बाबतीत सध्याचे खुले निर्यात धोरणच सुरु ठेवावे. कोटा पद्धतीने साखर निर्यात करण्यास महाराष्ट्रातील साखर कारखानदारांचा विरोध असून यामुळे कारखान्यांना मर्यादा येतील, यासंदर्भात आपण हस्तक्षेप करून वाणिज्य तसेच ग्राहक संरक्षण आणि अन्न व सार्वजनिक मंत्रालयाला योग्य तो निर्णय घेण्याची विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली. आपल्या …
Read More »सर्वसामान्यांची दिवाळी गोड होणार, फक्त दोन दिवस शिधाजिन्नस संच रेशनिंग दुकानांवर उपलब्ध होणार-अन्न व नागरी मंत्री रविंद्र चव्हाण
राज्यातील सर्व सामान्यांची दिवाळी गोड जावी आणि रेशनिंग दुकानांवर धान्य घेणाऱ्या लाखो नागरिकांना दिवाळी सणानिमित्त चार वस्तू फक्त १०० रुपयांत देण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतला. सरकारने हा निर्णय घेतल्यानंतर या वस्तू जनसामान्यांपर्यंत अल्पकालावधीत पोहोचविण्याच्या दृष्टीने विभागाचे प्रयत्न सुरु आहेत. सर्वांची दिवाळी गोड व्हावी हेच आमचे ध्येय आहे. १९ व २० …
Read More »अजित पवार म्हणाले, मी संविधान, कायदा मानणारा… मी संविधान, कायदा मानणारा त्यामुळे जे कुणी चौकशी करतील त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याची माझी तयारी
राज्यात सत्ताबदल होताच पुन्हा एकदा शिखर बँकेतील आर्थिक घोटाळ्याची चौकशी करणार असल्याचे वृत्त पुढे आले. विशेष म्हणजे शिखर बँकेच्या संचालक मंडळावर ७५ जण होते. या सर्वांची चौकशी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या चौकशीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांना विचारले असता ते म्हणाले, मी …
Read More »विलंबाने जीएसटी भरणाऱ्या करदात्यांवर कठोर कारवाई
वस्तू आणि सेवा कर कायदा, २०१७ अंतर्गत नोंदणीकृत करदात्याने जीएसटी विवरणपत्राद्वारे सरकारी तिजोरीत जमा करणे अनिवार्य असताना अनेक करदाते विलंबाने जीएसटी भरतात. यामुळे करचोरी व गैरमार्गांना वाव मिळत असल्याने अशा करदात्यांवर कार्यवाही केली जाणार असल्याचे महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. जीएसटी विवरणपत्र भरण्याची प्रक्रीया सोपी …
Read More »अजित पवार म्हणाले, या सरकारला १०० दिवस झाले तरी यांच्यासमोर भलतीच कामे.. दोन्ही पिके वाया गेली ओला दुष्काळ आणि मदत जाहीर करा
महाराष्ट्रात पावसाने शेतकऱ्यांचे खरीप व रब्बी ही दोन्ही पिके वाया गेली असून सरकारने ओला दुष्काळ जाहीर करतानाच आपला शेतकरी राजा कसा उभा राहिल यासाठी तातडीची मदत जाहीर करावी अशी मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज पत्रकार परिषदेत केली. मुंबईतील बॅलार्ड पिअर्स येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार …
Read More »‘नव्या पुण्याच्या शिल्पकारांनी‘ केलेला विकास पुण्याच्या रस्त्यावरून वाहतोय
पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात मागील २४ तासापेक्षा जास्त काळ सतत पाऊस पडत आहे. त्यामुळे पावसाचे पाणी गटारीतून वाहण्याबरोबरच पुण्याच्या रस्त्यावर आणि घराघरात पाणी शिरले. तर अनेक ठिकाणी पावसाच्या पाण्याचे तळे झाले. तर अनेक नागरीकांची वाहने पावसाच्या पाण्यात वाहून जाताना दिसत होते. त्यामुळे पुणे पावसाच्या पाण्यात बुडाल्याचे दिसत होते. या …
Read More »राज्य सरकारीसह राज्यातील ‘या’ विभागाच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी वेतन
काही दिवसांपू्र्वी राज्य सरकारी कर्मचाऱ्याना दिवाळीचा अग्रिम देण्याचा निर्णय घेत कर्मचाऱ्यांना खुषखबर दिली. त्यानंतर आज राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी आनंदात जावी याकरिता दिवाळीपूर्वीच कर्मचाऱ्यांना चालू महिन्याचे वेतन देण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय राज्य सरकारीसह शिक्षक, जिल्हा परिषदा मान्यता प्राप्त शैक्षणिक संस्था, कृषी आणि अकृषी विद्यापीठांमधील कर्मचाऱ्यांचे वेतनही दिवाळीपूर्वी देण्यात येणार …
Read More »अंधेरी पोटनिवडणूकः भाजपाच्या उमेदवारासह ७ जणांचे अर्ज मागे, ७ अद्यापही रिंगणात
अंधेरी विधानसभेच्या पोटनिवडणूकीत आज भाजपाने जाहिर केल्याप्रमाणे ऋतुजा लटके यांच्या विरोधातील भाजपा उमेदवार मुरजी पटेल यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. मुरजी पटेल यांच्यासह इतर ७ उमेदवारांनीही अर्ज मागे घेतले. त्यामुळे ऋतुजा लटके यांच्यासह ७ जणांमध्ये आता निवडणूक होणार आहे. अंधेरी पूर्व या मतदारसंघाच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक होत असून याकरिता …
Read More »ग्रामपंचायत निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपाच नंबर वन, निर्विवाद आघाडी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रतिपादन
राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीतील उपलब्ध ८८९ ग्रामपंचायतींच्या निकालांपैकी सर्वाधिक ३९७ ग्रामपंचायती जिंकून भारतीय जनता पार्टी पुन्हा एकदा नंबर वन पक्ष ठरला आहे. या यशाबद्दल आपण मतदारांचे आभार मानतो व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी सांगितले. ते म्हणाले की, सोमवारी मतगणनेनंतर जिल्ह्याजिल्ह्यातून मिळालेल्या माहितीनुसार भाजपा आणि मुख्यमंत्री एकनाथ …
Read More »महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत लाभ योजनेचा २० ऑक्टो.पासून शुभारंभ
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत अल्प मुदतीच्या पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना रु. ५० हजारापर्यंत प्रोत्साहनपर लाभ येाजनेचा शुभारंभ २० ऑक्टोबर, २०२२ रोजी सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती सहकार मंत्री अतुल सावे यांनी दिली. सुमारे …
Read More »
Marathi e-Batmya