मुंबई: विशेष प्रतिनिधी कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटे मुळे अत्यावश्यक असेल तरच बदली करण्याचा आदेश राज्य सरकारने दिले होते. मात्र आता त्यात थोडीशी शिथिलता आणत फक्त १५ टक्के कर्मचारी-अधिकाऱ्यांची बदली करण्यास राज्य सरकारने सर्व विभागांना परवानगी दिली असून ज्यांचा कालावधी विहित कालावधी पेक्षा जास्त झाला आहे अशांनाच प्राधान्य देण्याची सूचना …
Read More »ओबीसी आरक्षण लढाईतील पहिला विजय: पोटनिवडणुकांना स्थगिती आहे त्या स्थितीत निवडणूकांना आजपासून स्थगितीचा राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय
मुंबई : प्रतिनिधी पाच जिल्ह्यातील ओबीसी आरक्षण संपुष्टात आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या रिक्त झालेल्या जागांसाठी पुन्हा पोट निवडणूका घेण्याचे आदेश दिल्यानंतर राज्यातील राजकिय वातावरण चांगलेच ढवळून निघाले. त्यामुळे अखेर राज्य सरकारने पुन्हा सर्वोच्च न्यायालयात धाव घेत या निवडणूका पुढे ढकलण्याची विनंती केली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानेही याबाबतचा निर्णय राज्य निवडणूक आयोगावर …
Read More »डब्बे बदलण्यापेक्षा देशाला खड्यात घालणारे इंजिनच बदलण्याची वेळ ! रस्त्यावर चुली मांडून केला मोदी सरकारचा निषेध : नाना पटोले
पुणे : प्रतिनिधी मोदी सरकार मागील ७ वर्षात देश अधोगतीकडे घेऊन गेले आहे. ७० वर्षात काँग्रेसच्या सरकारांनी देशाला विविध योजना व प्रकल्पाच्या माध्यमातून एक समृद्ध राष्ट्र म्हणून उभे केले होते. परंतु मोदी सरकारने ७० वर्षातील हे वैभव अवघ्या ७ वर्षात विकण्याचा सपाटा लावला आहे. नोटबंदी, जीएसटीने मोठे नुकसान केले. महागाई, …
Read More »मुंबईतल्या ५०० गृहनिर्माण सोसायट्या प्रशासकांची एसआयटीमार्फत चौकशी करा भाजपा नेते माजी मंत्री आमदार अॅड आशिष शेलार यांची सहकार आयुक्तांकडे मागणी
मुंबई: प्रतिनिधी कोविडचा फायदा घेत मुंबईत ५०० गृहनिर्माण सोसायटीमध्ये प्रशासकांनी सर्वसाधारण सभा, सोसायटी सदस्यांनी निवडलेली व्यवस्थापन समिती न करता परस्पर पुनर्विकासाचे प्रस्ताव बिल्डरांना मंजूर करुन दिले. २ हजार कोटींच्या गौडबंगालाला तातडीने स्थगिती देऊन एसआयटी मार्फत चौकशी करा, असे मागणी करणारे पत्र भाजपा नेते, माजी मंत्री आमदार अॅड आशिष शेलार यांनी आज सहकार आयुक्त अनिल …
Read More »राणे, कृपाशंकर सिंह, खडसेंबद्दल पहिल्यांदाच फडणवीस म्हणाले दुसऱ्या पक्षातून आलेले आधी कोणाच्या तरी विरोधात बोलतातच ना
पुणे : प्रतिनिधी काँग्रेसचे वादग्रस्त नेते कृपाशंकर सिंह, नारायण राणे यांनी भाजपावर खरपूस टीका केलेली असतानाही त्यांना पक्षात प्रवेश दिला. तर नारायण राणे यांना केंद्रात मंत्रीपद दिल्याने राज्याच्या राजकारणात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे, कृपाशंकर सिंह यांच्या पक्ष प्रवेशाचे समर्थन करत …
Read More »म्हाडा अध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात ? मंत्र्याच्या कि शिवसेना आमदाराच्या गृहनिर्माण मंत्री, सुनिल राऊत आणि सुनिल शिंदे यांच्यापैकी कोणाची लागणार वर्णी
मुंबई: विशेष प्रतिनिधी मुंबईसह राज्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या घरांच्यादृष्टीने नेहमीच आशेच्या ठिकाणी राहिलेल्या म्हाडाच्या अध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेकडून चांगलीच मोर्चेबांधणी सुरु आहे. त्यासाठी राष्ट्रवादीचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि शिवसेनेतून सुनिल शिंदे-सुनिल राऊत यांच्यात चांगलीच रस्सीखेच सुरु झाल्याची चर्चा म्हाडात रंगली आहे. काही महिन्यापूर्वी म्हाडाचे अध्यक्ष पद विद्यमान उच्च …
Read More »मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास कार्यक्रमातंर्गत २० हजार जणांना प्रशिक्षण मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
मुंबई : प्रतिनिधी कोरोना परिस्थितीत आवश्यक असलेल्या हेल्थकेअर, नर्सिंग, पॅरामेडिकल यांसारख्या क्षेत्रामध्ये विविध ३६ अभ्यासक्रमांमधून येत्या तीन महिन्यात २० हजार इतके प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास कार्यक्रमाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य क्षेत्राचे महत्व …
Read More »…आणि मंत्र्यांनीच केला नर्सेसचा सत्कार तुम्ही लोकांसाठी अहोरात्र झटताय... म्हणत मंत्री जयंतराव पाटलांनी परिचारिकांचा केला सत्कार
मुंबई : प्रतिनिधी तुम्ही लोकांसाठी अहोरात्र झटताय… तुम्ही पुढे या… म्हणत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सभागृहाच्या कोपर्यात उभ्या असलेल्या परिचारिकांचा पुष्पगुच्छ देत सन्मान केला… विशेष म्हणजे त्यांच्या आग्रहाखातर त्यांच्यासोबत जयंतराव पाटील यांनी फोटोही काढले हा प्रसंग मुंबईच्या गोरेगाव येथील श्री साई क्लिनिक आणि पार्वतीबाई शंकरराव चव्हाण हॉस्पिटलच्यावतीने सुरू करण्यात …
Read More »केंद्रात फक्त मंत्री नव्हे तर पंतप्रधानच बदलण्याची गरज ! काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची टीका
नागपूर: प्रतिनिधी केंद्रातील मोदी सरकारने कृत्रिम महागाई निर्माण करून सामान्य जनतेला आर्थिकदृष्ट्या कमकुवत केले आहे. या सामान्य माणसाच्या वेदना दिल्लीच्या सरकारपर्यंत पोहवण्यासाठी तसेच सामान्य जनतेच्या हक्कासाठी ऊन पावसाची तमा न बाळगता काँग्रेस पक्ष मोदी सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरला आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस व जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती भरमसाठ वाढवल्याने सर्व प्रकारची …
Read More »संपूर्ण शहराचा पुनर्विकास करणारे ठाणे शहर हे देशातील पहिले शहर ठरणार क्लस्टर पु्र्नविकासाच्या यशस्वी अंमलबजावणीने वाटचाल शाश्वत विकासाकडे
क्लस्टरचा रिडेव्हलेपमेंट अर्थात समुह पुर्नविकासाचे धोरण ठाणेकरांसाठी ऐतिहासिक ठरणार आहे. समुह पुर्नविकासासंतर्गत जुन्या मोडकळीस आलेल्या अनेक इमारतींचा एकत्रितरित्या पुर्नविकास करणे सहजशक्य होणार आहे. अशा इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना चांगले हक्काचे घर मिळणे हा त्यांचा हक्क असून ठाणेकरांच्या जीविताशी निगडित असल्याने त्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न क्लस्टरच्या माध्यमातून सोडविण्याचे उत्तरदायित्व राज्य शासनाने आणि राज्याच्या …
Read More »
Marathi e-Batmya