Breaking News

गृहमंत्र्यांकडून शिक्कामोर्तब, भाजपाचा “तो” पदाधिकारी बांगलादेशीच पोलिस तपासात आले सत्य समोर- गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई : प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाने नियुक्त केलेल्या उत्तर मुंबई अल्पसंख्याक विभागाचा अध्यक्ष रुबेल जोनू शेख हा बांगलादेशी असून, त्याने खोट्या कागदपत्रांच्या आधारे भारतीय नागरिकत्व घेतल्याची तक्रार मला पात्र झाली होती. त्या तक्रारीच्या आधारावर या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी चालु आहे. रुबेल जोनू शेख याला अटक करण्यात आली असून चौकशीत …

Read More »

शेतकरी, कामगारासह या प्रश्नावरून मुख्यमंत्री ठाकरेंनी पंतप्रधानांना ठणकावले नीती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला महत्वाचा मुद्दा

मुंबई: प्रतिनिधी लहरी पर्यावरणाचा फटका दिवसेंदिवस शेतकऱ्यांना बसत असून पीक विमा कंपन्यांच्या नफा आणि नुकसान याचे प्रमाण परत एकदा निश्चित करण्याची गरज आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगत नुकसानग्रस्तांना दिली जाणारी भरपाईची रक्कमही तोकडी असून त्याबाबतीतही  केंद्र सरकारने गांभीर्याने विचार करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा असे ठणकावून सांगत जवान, जय किसान मग …

Read More »

पदोन्नतीतील रिक्त जागा भरण्यावरून माजी मंत्र्याची टीका महाविकास आघाडी सरकारने आपला खरा चेहरा दाखविला

भंडारा: प्रतिनिधी राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे मागासवर्गिय समाजाचे अहित करणारे सरकार असून अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती च्या पदोन्नतीने भरण्याची ७० हजार पदे सर्व सामान्य कोट्यातुन भरण्याच्या दृष्टीने १८ फेब्रुवारी २०२१ ला या सरकारने निर्णय काढुन आपला खरा चेहरा दाखविल्याची टीका राज्याचे भाजपाचे माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी केली. …

Read More »

…तरच आपण आत्मनिर्भर बनू, केंद्राने धोरण तयार करावे मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी पंतप्रधानांना बैठकीतच ठणकावले

मुंबई: प्रतिनिधी राज्यांत स्पर्धा जरूर व्हायला हवी पण ती सवलती किती देतात अशी आर्थिक नसावी तर राज्यांच्या प्रशासकीय कार्यक्षमता आणि उपलब्ध सुविधांवर निकोप अशी व्हावी तरच सर्व राज्यांना त्याचा फायदा होईल असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, केंद्राने गुंतवणुकी संदर्भात काही निकष ठरवायला हवेत. केवळ पैशाच्या स्वरूपात गुंतवणुकीचा विचार …

Read More »

दिव्यांग, नेत्रहीन मुलांकडून छत्रपती शिवाजी महाराजांना अनोखी मानवंदना आर्ट इन्स्टॉलेशनच्या माध्यमातून केले अभिवादन

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मुंबई भारतीय जनता पार्टीच्या गुजराती सेलतर्फे आर्ट इन्स्टॉलेशन कार्यक्रम पार पडला. गुरुवार १९ फेब्रुवारी २०२१ रोजी महाराष्ट्र प्रदेश कार्यालय, नरीमन पॉईंट, मुंबई येथे आर्ट इन्स्टॉलेशन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. कागदी झेंडे, सूत, लाकूड, लोकर अशा पर्यावरणपूरक साधनांमधून हे …

Read More »

कोरोना : निर्बंध जाहिर केलेल्या जिल्ह्यांमध्ये बाधितांच्या संख्येत वाढ ६ हजार ११२ नवे बाधित, २ हजार १५९ बरे झाले तर ४४ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाने मुंबईसह मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात टप्प्यानुसार संचार बंदी लागू करत काही प्रमाणात निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला. निर्बंध घातलेल्या पहिल्याच दिवशी नाशिक मंडळ, औरंगाबाद, पुणे, नागपूर, लातूर आदी मंडळात कोरोना बाधित रूग्णांच्या संख्येत चांगलीच वाढ झाल्याचे दिसून …

Read More »

खा. सुप्रिया सुळेंचे आव्हान, एक फडणवीस क्या करेगा, महाराष्ट्र एक तरफ है ५५ वर्षात महाराष्ट्रातील जनतेने पवारसाहेबांना कधी अंतर दिले नाही

नवी मुंबई: प्रतिनिधी देवेंद्र फडणवीस म्हणाले होते पवारसाहेबांनी रिटायर्ड व्हावं. छान मार्गदर्शन केले होते. मात्र महाराष्ट्राने पवारसाहेबांना रिटायर्ड करायचं नाही हे ठरवलं होतं. त्यामुळे ‘एक देवेंद्र फडणवीस क्या करेगा महाराष्ट्र एक तरफ और देवेंद्र फडणवीस एक तरफ’ असा जोरदार टोला लगावतानाच पवार साहेब म्हटले असते मी आता देवेंद्र फडणवीस बोलत …

Read More »

नाना पटोले म्हणाले, फडणवीसांची वक्तव्य फारशी मनावर घ्यायची नसतात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या आरोपाला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचे प्रत्युत्तर

मुंबई: प्रतिनिधी केंद्रात युपीएचे सरकार असताना पेट्रोल-डिझेल दरवाढीवरून टीका करणारे बॉलीवूड अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षयकुमार आता केंद्रातील भाजपा सरकारने दरवाढ केली तरी टीका करत नसल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नुकताच या दोघांना इशारा दिला. त्या इशाऱ्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पटोले हे नवे नवे अध्यक्ष झाल्याचा …

Read More »

राज्याच्या महसूल उत्पन्नात २५ ते २८ टक्के घट: मात्र कर्जात वाढ केंद्रानेही घेतला हात आखडता

मुंबई : विशेष प्रतिनिधी राज्याचे अर्थसंकल्पिय अधिवेशन आगामी १ मार्च २०२१ पासून सुरु होत आहे. यापार्श्वभूमीवर वित्तीय परिस्थिती पुन्हा बिकट असल्याचे दिसून येत असून मागील ८ ते ९ महिने कडक लॉकडाऊन राहिल्याचा परिणाम म्हणून राज्याच्या तिजोरीत मोठ्या प्रमाणावर तूट आली आहे. तरीही लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्यामुळे काही प्रमाणात आर्थिक क्षेत्रे काही …

Read More »

कोरोना: महाराष्ट्रातील या जिल्ह्यात संचारबंदीसह हे निर्बंध जारी राज्य सरकार आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून जारी आदेश

मुंबई : प्रतिनिधी राज्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण पुन्हा वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जिल्ह्यांमध्ये यासंदर्भातील निर्बंध आदेश जारी करण्यात आले आहेत. अकोला जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी दर रविवार संपूर्ण तर रात्रीही संचारबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. यवतमाळ जिल्ह्यातही संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यात कोरोना रुग्ण तपासणीचा वेग वाढविण्याचे निर्देश देण्यात …

Read More »