Breaking News

प्रकाश आंबेडकर वंचितपासून तीन महिने राहणार दूर आघाडीची सारी सुत्रे आता रेखा ठाकूर यांच्याकडे

मुंबई: प्रतिनिधी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड.प्रकाश आंबेडकर हे पक्षापासून तीन महिने लांब राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुढील तीन महिने ते वंचितच्या कोणत्याही दैंनदिन कार्यक्रमात सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट करत पुढील कालावधींकरीता रेखा ठाकूर यांच्या हाती सारी सुत्रे हस्तांतरीत केले. तसेच आगामी ५ जिल्ह्यातील पोट निवडणूका पूर्ण ताकदीनीशी लढण्यासाठी …

Read More »

जयंत पाटील म्हणाले, हे तर एकनाथ खडसेंच्या विरोधात भाजपाचे कुंभाड राष्ट्रवादीत प्रवेश दिल्याने भाजपा केंद्रीय एजन्सीचा गैरवापर करतेय-जयंत पाटील यांची टीका

मुंबई: प्रतिनिधी भोसरी येथील जमिन खरेदीप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या जावयाला काल ईडीने अटक केल्यानंतर आज खडसे यांनाच ईडीने चौकशीला पाचारण करण्यात आले. तसेच सकाळपासून त्यांची ईडी कार्यालयात अद्यापही चौकशी सुरु असल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले की, केवळ राष्ट्रवादीत एकनाथ खडसेंना सन्मानाने …

Read More »

राणेंकडे एमएसएमई तर गडकरीकडील एक खाते काढले डॉ.कराड नवे अर्थ राज्यमंत्री, पाटील पंचायत राज्यमंत्री, तर पवार आरोग्य राज्यमंत्री

नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात महाराष्ट्रातील चार जणांचा समावेश करण्यात आला. नारायण राणे यांच्याकडे मायक्रो-स्मॉल अॅण्ड मिडियम एंटरप्रायझेस अर्थात एमएसएमई या खात्याचा पदभार सोपविण्यात आला आहे. तर गडकरी यांच्याकडील रस्ते महामार्ग वगळता शिपींग कार्पोरेशन, पोर्ट आणि आयुष मंत्रालयाची जबाबदारी सरबानंद सोनोवाल यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. याशिवाय डॉ.भागवत कराड यांच्याकडे …

Read More »

बेरोजगार शिक्षकांसाठी खुषखबर: एसईबीसी आरक्षणासह शिक्षण सेवकांची होणार भरती तीन हजार पदे भरण्यास सामान्य प्रशासन विभागाचे मंजूरी

मुंबई: प्रतिनिधी कोरोनामुळे रखडलेल्या प्रत्येक विभागातील भर्ती प्रक्रियेला हळुहळू सुरुवात होत असून सामान्य प्रशासन विभागाने नुकतीच शिक्षण सेवक भरतीला मान्यता दिली. त्यामुळे सुमारे तीन हजार शिक्षण सेवकांची पदे भरली जाणार आहेत. गुणवत्ताधारक उमेदवारांसाठी पवित्र प्रणालीच्या माध्यमातून पारदर्शकपणे ही प्रक्रीया राबविण्यात येणार आहे. शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांच्या पुढाकारामुळे …

Read More »

१२ आमदारांच्या निलंबनाचा प्रश्नी न्यायालयात जाणार महाविकास आघाडीच्या विरोधात मागणार दाद अॅड आशिष शेलार यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्र विकास आघाडीच्या ठाकरे सरकारने सूडबुद्धीने, षडयंत्र रचून भाजपाच्या १२ आमदारांचे निलंबन केले असून त्या विरोधात आम्ही न्यायालयात दाद मागणार असल्याचे भाजपा नेते आमदार अॅड. आशिष शेलार यांनी आज प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी माजी मंत्री आमदार गिरीश महाजन, मुंबईचे प्रभारी आमदार अतुल भातखळकर, आमदार योगश …

Read More »

मंत्रिमंडळ विस्तार: मोदींचे मागासवर्गीय, आदीवासी, ओबीसी आणि अल्पसंख्याक कार्ड ४३ नव्या मंत्र्यांचा राष्ट्रपती भवनात शपथविधी

नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी मागील दिड वर्षापासून असलेल्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या आर्थिक संकट, लसीकरण पुरवठा, कोरोना रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाय योजना, स्थलांतरीत कामगार यासह अनेक महत्वाच्या प्रश्नी पंतप्रधान कार्यालयाकडून निर्णय घेवूनही आणि परिस्थिती हाताळण्यात अपयश आले. या अपयशाची जबाबदारी १२ मंत्र्यांवर निश्चित करत ३६ नव्या चेहऱ्यांना आणि ७ …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रातल्या मंत्र्यांसह या १२ जणांचे राजीनामे घेतले प्रकाश जावडेकर, रवीशंकर प्रसाद, संतोष गंगवार, डॉ.हर्षवर्धन, निशांख, गहेलोत यांचा समावेश

नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी मागील दोन दिवसांपासून केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येत असलेल्या चर्चेला अखेर आज मुर्त स्वरूप आले आहे. नव्या मंत्रिमंडळात एकूण ४३ जणांचा समावेश करण्यात येणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रकाश जावडेंकर यांच्यासह १२ जणांचा राजीनामा पंतप्रधान मोदी यांनी आज सकाळी घेतले. दिड वर्षापासून कोरोना काळात आपल्या मंत्री पदानुसार योग्य …

Read More »

जगणे महाग करणाऱ्या जुलमी मोदी सरकारच्या विरोधात काँग्रेसचा एल्गार इंधनदरवाढ व महागाईविरोधात काँग्रेसचा १० दिवस आंदोलनाचा धडाका

मुंबई: प्रतिनिधी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या मागील ७ वर्षांच्या काळात महागाईने लोकांचे जगणे कठीण केले आहे. पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस, खाद्यतेल, डाळींच्या किमती सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. मोदी सरकारने निर्माण केलेल्या या कृत्रिम महागाईविरोधात काँग्रेस राज्यव्यापी आंदोलन करणार असून गुरुवार ८ जुलैपासून दहा दिवस विविध आंदोलनाच्या रुपाने मोदी सरकारच्या …

Read More »

अभिनयाचे विद्यापीठ असलेल्या दिलीप कुमारांची जगाच्या पडद्यावरून एक्झिट वयाच्या ९८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबई : प्रतिनिधी स्वातंत्र्योत्तराच्या काळात हिंदी चित्रपटसृष्टीला वटवृक्ष बहरत असतानाच दिलीपकुमार नावाची रत्नाची खाण मिळाली. बॉलीवूडसह सिनेरसिकांच्या जवळपास ३ पिढ्याहून अधिक जणांना आपल्या अभिनयाची भुरूळ घालणारे आणि अभिनयाचे विद्यापीठ म्हणून ओळखले जाणारे दिलीप कुमार उर्फ मोहम्मद युसुफ खान यांचे आज सकाळी वयाच्या ९८ व्या वर्षी निधन झाले. तर संध्याकाळी त्यांच्यावर …

Read More »

कृषी सुधारणा विधेयके विधानसभेत सादर विधेयकावर जनता, शेतकरी, सामाजिक संस्था आणि संघटनांच्या सूचना मागवल्या

मुंबईः प्रतिनिधी केंद्र सरकारने आणलेले तीन काळे कृषी कायदे हे शेतक-यांच्या नाही तर फक्त मुठभर मोठ्या उद्योगपतींच्या फायद्याचे आहेत. या कायद्यामुळे शेतकरी उद्धवस्त होणार आहे. वास्तविक पाहता कृषी संबंधी कायदे हा राज्यांचा विषय असून केंद्र सरकारने त्यावर अतिक्रमण केले आहे. त्यामुळे राज्यातील शेतक-यांना वाचवण्यासाठी व शेतक-यांच्या हितासाठी महाराष्ट्र विकास आघाडी …

Read More »