आज जाहीर झालेला केंद्रीय अर्थसंकल्प हा लक्ष्मीची पावले सर्वसामान्यांच्या घरी घेऊन येणारा अर्थसंकल्प असल्याचे मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. एकनाथ शिंदे पुढे बोलताना म्हणाले की, लक्ष्मी येती घरा तोचि दिवाळी दसरा अशी भावना आज प्रत्येक घराघरात निर्माण झाली असेल, कारण १२ लाखापर्यंतचे उत्पन्न आयकर मुक्त झाल्याने सर्वसामान्याना मोठा …
Read More »वर्षा गायकवाड यांचा आरोप, अर्थसंकल्पात बिहारचा उल्लेख पण मुंबई व महाराष्ट्राच्या… भाजपा सरकारचा केंद्रीय अर्थसंकल्प आघाडी सरकार वाचवण्यासाठी केलेली धडपड
भाजपा आघाडी सरकारचा अर्थसंकल्प हा आघाडी सरकार वाचवण्याच्या उद्देशाने सादर करण्यात आला आहे. संपूर्ण अर्थसंकल्पात फक्त बिहारचीच चर्चा करण्यात आली असून मुंबई व महाराष्ट्राचे नाव एकदाही घेतले गेले नाही. मोदी सरकारचा हा अर्थसंकल्प महाराष्ट्रासाठी निराशाजनक असून मुंबई व महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे, असा आरोप मुंबई काँग्रेस अध्यक्षा …
Read More »अर्थसंकल्पावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले पंतप्रधान मोदींचे अभिनंदन ग्रामीण भारताचा चेहरामोहरा बदलणारा, नागरिक केंद्रीत गुंतवणुकीला प्रोत्साहन देणारा अर्थसंकल्प
देशातील मध्यमवर्गासाठी स्वप्नवत अर्थसंकल्प आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला. १२ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करुन एक मोठा दिलासा मध्यमवर्गाला दिला. ग्रामीण भारताचा चेहरामोहरा बदलणारा आणि नागरिककेंद्रीत गुंतवणुकीला प्रोत्साहन देणारा हा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी बोलताना व्यक्त केली. …
Read More »अजित पवार यांचा दावा, अर्थसंकल्पातून महाराष्ट्रातील मेट्रो, हायस्पीड रेल्वेला निधी केंद्रीय अर्थसंकल्पातून विकसित भारताची पायाभरणी
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात बारा लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करुन मध्यमवर्गीय देशवासियांना मोठी भेट दिली आहे. अर्थसंकल्पातील नव्या कररचनेमुळे १२ लाख उत्पन्न असलेल्या करदात्यांना ८० हजारांची सूट दिल्याने त्यांना शंभर टक्के करमाफी मिळणार आहे. १८ लाख उत्पन्नधारकांना ७० हजारांचा फायदा होणार आहे. २५ लाख उत्पन्न असलेल्यांचा कर १ …
Read More »नाना पटोले यांची टीका, केंद्रीय अर्थसंकल्प…वरवर आकर्षक वाटणारे बजेट केवळ गोलमाल महागाई व बेरोजगारी दूर करण्यासाठी आणि रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी ठोस पावलांचा अभाव
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आठव्यांदा अर्थसंकल्प सादर करताना मोठमोठे दावे केले, अत्यंत चमकदार अंदाजात सादर करुनही अर्थसंकल्प समाधानकारक झाला नाही, या बजेटने गुंतवणूकदार प्रभावित झाले नाहीत. तसेच शेतकरी, व्यापारी व सामान्य नागरिकाचीही निराशाच केली आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही आणि शेतमालाच्या हमीभावाबदद्लही काहीच नाही. केंद्रीय अर्थसंकल्प फक्त आकड्यांचा भुलभुलैया …
Read More »काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांची टीका, अर्थसंकल्प म्हणजे…. बिल्ली चली हज को मध्यवर्ग आणि इतर घोषणांवरून खर्गे यांची अर्थमंत्री सीतारामण आणि पंतप्रधान मोदींवर टीका
केंद्रातील भाजपा प्रणित नव्या एनडीए सरकारचा अर्थसंकल्प केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामण यांनी आज सादर केला. यावेळी १२ लाखाचे उत्पन्न कमाविणाऱ्या नव्या मध्यमवर्गाला दिलासा देत १२ लाख रूपये कमविणाऱ्या नोकरदारांचे उत्पन्न करमुक्त असल्याचे जाहिर केले. यावरून आणि एकदंरच अर्थसंकल्पातील विविध तरतूदींवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी अर्थमंत्री सीतारामण आणि पंतप्रधान मोदी …
Read More »अर्थमंत्री निर्मला सीतारामण म्हणाल्या, अर्थसंकल्प जीडीपीच्या ४.४ तूटीचा चार क्षेत्रांवर लक्ष ठेवून अर्थसंकल्प संसदेत सादर
वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांनी शनिवारी (१ फेब्रुवारी २०२५) सलग ८ व्यांदा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला, ज्यामध्ये विकसित भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी कृषी, एमएसएमई, गुंतवणूक आणि निर्यात या चार इंजिनांवर लक्ष केंद्रित केले गेले. करदात्यांना दिलासा देण्यासाठी, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी घोषणा केली की नवीन कर प्रणाली अंतर्गत वार्षिक १२ लाख …
Read More »कर दात्यांना स्वतःच्या मालकीच्या दोन मालमत्तांचे वार्षिक मूल्य शून्य दाखविता येणार अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून नवी कर सवलत
मध्यमवर्गीय कुटुंबांवरील घरमालकीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि कर भार कमी करण्यासाठी एका मोठ्या कर सुधारणात, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २०२५ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात घोषणा केली की करदात्यांना आता दोन स्वतःच्या ताब्यात असलेल्या मालमत्तेचे वार्षिक मूल्य शून्य म्हणून दावा करता येईल. हा महत्त्वपूर्ण बदल मागील नियमाची जागा घेतो, जिथे फक्त एका स्वतःच्या …
Read More »अर्थसंकल्पातून निर्मला सीतारामण यांनी केल्या या घोषणाः या वस्तू होणार स्वस्त लिथियम बॅटरीवर सवलत, मोबाईल, एलईडी-एलडी टीव्ही, चमड्याच्या वस्तूंचा समावेश
देशात तिसऱ्यांदा स्थानापन्न झालेल्या भाजपाप्रणित एनडीए सरकारचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज सादर केला. हा अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारामण यांनी लोकांच्या जीवनावश्यक बनलेल्या आणि रोजगार निर्मितीच्या अनुषंगाने इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरील करात कपात केली. तसेच या वस्तूंच्या देशांतर्गत आणि परदेशातून आयात होणाऱ्या वस्तूंवरील करात कपातही केली आहे. त्यामुळे साहजिकच …
Read More »करदात्यांसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्याकडून मोठी घोषणाः ही औषधे करमुक्त संसदेत अर्थसंकल्प मांडताना निर्मला सीतारामण यांची माहिती
१० वर्षापूर्वी देशात नवी कर पद्धती लागू केल्यानंतर आणि करदात्यांसाठी जूनी कर प्रणाली आणि नवी करप्रणाली अशा दोन करप्रणालीचा पर्याय दिल्यानंतर देशातील तमाम नव्या सरकारचा अर्थसंकल्प आज निर्मला सीतारामण यांनी अर्थसंतकल्प सादर केला. यावेळी अर्थमंत्री सीतारामण यांनी कर दात्यांसाठी नवी घोषणा करत केली आहे. करदात्यांसाठी पुढील आठवड्यात नवे विधेयक संसदेत …
Read More »
Marathi e-Batmya