मुंबई

खेळाच्या मैदानावरील दांडीया संकटात क्रिडा विभागाला भूमिका मांडण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

मुंबईः प्रतिनिधी शहरात मुलांसाठी खेळाची मैदाने मोठ्या मुश्किलीने उपलब्ध होत असताना नवरात्रोत्सवाचे निमित्त पुढे करत राज्य सरकारने ही मैदाने दांडियासाठी उपलब्ध करून देण्याचे धोरण स्विकारले आहे. त्यामुळे मुलांवर खेळापासून वंचित राहण्याची पाळी आहे. या धोरणाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात पत्रकार विनायक सानप यांनी जनहित याचिका दाखल केली असून क्रिडा विभागाला …

Read More »

झोपडीधारकांना मिळणार आता ३०० चौ.फुटाचे घर राज्य सरकारचा निर्णय

मुंबईः प्रतिनिधी राज्य सरकारकडून राबविण्यात येत असलेल्या झोपडपट्टी पुर्नवसन योजनेच्या माध्यमातून झोपडीधारकांना मिळणाऱ्या घरांच्या क्षेत्रफळात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यापूर्वी झोपु योजनेतून झोपडीधारकांना २६९ चौ.फुटाचे घर देण्यात येत होते. या क्षेत्रफळात आता वाढ करण्यात येणार असून २६९ ऐवजी ३०० चौरस फुटाचे घर झोपडीधारकांना देण्यात येणार असल्याची माहिती …

Read More »

म्हाडा, एसआरए इमारतींच्या पुर्नविकासासाठी आता ५१ टक्क्याची अट मुंबईसाठीच्या सारभूत स्वरुपाच्या फेरबदलांनाही राज्य सरकारची मंजुरी

मुंबई: प्रतिनिधी सुधारित विकास नियंत्रण नियमावली अंतर्गत 33 (5), 33 (7), 33 (10) या नियमानुसार विकसित करावयाच्या प्रकरणांत 51 टक्के संमतीची अट समाविष्ट केली आहे. जेणेकरुन म्हाडाच्या जुन्या इमारती, उपकर प्राप्त इमारती, झोपडपट्ट्या यांचा पुनर्विकास सहजतेने होऊ शकेल. त्यामुळे निवाऱ्याचा प्रश्न सुटण्यास मदत होईल. खाजगी अनआरक्षित जागांवर संक्रमण शिबीर (Transit camp) उभारण्याची तरतूद केली असून …

Read More »

प्रकल्प अर्धवट सोडणाऱ्या विकासकांचे प्रकल्प म्हाडाने ताब्यात घ्यावे आमदार समितीची राज्य सरकारला शिफारस

मुंबई : प्रतिनिधी मुंबई शहर व उपनगरातील म्हाडा इमारतींच्या पुर्नविकासाचे अनेक प्रकल्प सध्या रखडलेल्या अवस्थेत आहेत. तर या अनेक प्रकल्प विकासकांनी असेच सोडून दिलेले असल्याने विकासकांनी अर्धवट सोडलेले प्रकल्प म्हाडाने ताब्यात घेवून त्याचा पुर्नविकास करावा अशी शिफारस मुंबई शहरातील पुर्नविकासाचे प्रकल्प मार्गी लागावेत यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमलेल्या आमदार …

Read More »

मुंबई मेट्रोच्या ९ आणि ७ अ च्या प्रकल्पाला मान्यता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरी

मुंबई : प्रतिनिधी मुंबई मेट्रो मार्ग 9 (दहिसर ते मीरा-भाईंदर) आणि मेट्रो मार्ग 7 चा विस्तार असलेला मेट्रो मार्ग 7 अ (अंधेरी ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ) या मेट्रो प्रकल्पांची मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत अंमलबजावणी करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या दोन्ही मार्गांची एकूण लांबी …

Read More »

झोपु योजनेची सविस्तर माहीती आता प्रत्येकाच्या हातात ‘आसरा’ ॲप्लीकेशनमुळे संपूर्ण कामकाजात पारदर्शकता : मुख्यमंत्री

मुंबई : प्रतिनिधी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने तयार केलेल्या ‘आसरा’ या मोबाईल ॲप्ल‍ीकेशनचा उपयोग झोपडपट्टीधारकांना होऊन या प्राधिकरणाच्या संपूर्ण कामकाजात पारदर्शकता येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालयात सांगितले. ते आज झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने तयार केलेल्या ‘आसरा’ मोबाईल ॲप्लीकेशनचा शुभारंभ करताना बोलत होते. यावेळी गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता, गृहनिर्माण राज्यमंत्री …

Read More »

अखाद्य बर्फाचा वापर केल्यास कारवाई मत्स्य व्यवसाय आयुक्तांचा इशारा

मुंबई: प्रतिनिधी खाण्यायोग्य तसेच खाण्याचे पदार्थ साठविण्यासाठीचा बर्फ आणि खाद्योपयोगी नसलेला (अखाद्य) बर्फ यात फरक करता यावा यासाठी अखाद्य बर्फामध्ये निळा रंग टाकण्याची तरतूद अन्न सुरक्षा व मानके अधिनियमात करण्यात आलेली आहे. माशांच्या साठवणुकीसाठी खाण्यायोग्य बर्फाचा वापर करणे आवश्यक आहे. अखाद्य अशा निळ्या बर्फाचा वापर केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा …

Read More »

टीआयएटी आणि एएमआयएन एव्हिएशनचे ’विमान सुरक्षा उपकरण प्रदर्शन’ प्रदर्शनात ड्रोनची प्रात्यक्षिके दाखविली

मुंबई : प्रतिनिधी ठाकूर इंस्टिट्युट ऑफ एव्हिएशन टेक्नॉलॉजी येथे एईएसआयच्या (एरोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडिया) मुंबई शाखेद्वारे आणि टीआयएटी आणि एएमआयएन एव्हिएशनद्वारे विमान सुरक्षा उपकरणाच्या डेमोचे आयोजन करण्यात आले होते. विमान सुरक्षा उपकरण प्रदर्शन’ सह सेमीनारचे उद्घाटन टीआयएटीचे वरिष्ठ प्रशिक्षक आणि एईएसआयच्या मुंबई शाखेचे मा. संयुक्त सचिव विवेक कुलकर्णी यांनी केले …

Read More »

मंत्रालयाच्या दारात महिलेचा रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न पोलिसांकडून कारवाई करण्यात येत नसल्याच्या निषेधार्थ महिलेकडून पाऊल

लग्न होवूनही पती सोबत राहत नसल्याच्या आणि सय्यद मोहम्मद अन्सारी हा त्रास देत असल्याच्या विरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल करूनही त्यावर पोलिसांकडून कोणतीच कारवाई करण्यात येत नाही. त्यामुळे मंत्रालयात दाद मागण्यासाठी आलेल्या महिलेने मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावरच महिलेने अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच धावाधाव केल्याने पुढील अनर्थ टळला. …

Read More »

अतिवृष्टीमुळे कॉलेज, शाळा यांच्या प्रवेशाची तारीख वाढविणार मुख्यमंत्री फडणवीस यांची शिक्षण मंत्री तावडे यांना सूचना

नागपूर : प्रतिनिधी राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत मागील दोन दिवसात अतिवृष्टी झाल्याने पश्चिम उपनगराची लोकल रेल्वेसेवा बंद करण्याची पाळी आली आहे. तसेच शहरात ठिकठिकाणी पाणी मोठ्या प्रमाणावर साचले आहे. त्यामुळे काही अघटीक घटना घडू नये यादृष्टीकोनातून कॉलेज महाविद्यालयाचे प्रवेशाचे वेळापत्रक तपासून त्याची नव्याने तारीख जाहीर करावी आणि ज्या ठिकाणी …

Read More »