मुंबई

आणि मंत्रालयात अधिकारी-कर्मचाऱ्यांना पुन्हा करावा लागला मुक्काम कालच्या पावसामुळे सगळीकडेच पाणी

मुंबई: प्रतिनिधी राज्याचे मुख्यालय असलेल्या मंत्रालयात ४७ वर्षातील रेकॉर्ड ब्रेक पाऊस काल पडला. तसेच मंत्रालयातील प्रमुख तीन प्रवेशद्वारावर निसर्गाने अवकृपा दाखविल्याने अनेक अधिकारी-कर्मचाऱ्यांना बाहेरच पडता आले नाही. त्यामुळ‌े अखेर या १५ टक्के उपस्थिती राहीलेल्या बहुतांष अधिकारी-कर्मचाऱ्यांना रात्री मंत्रालयातच मुक्काम ठोकावा लागला. काही महिन्यापूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे तिन्ही मार्गावरच्या उपनगरीय रेल्वे …

Read More »

मुंबई आणि परिसरात पडणाऱ्या पावसाचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा महापालिका प्रशासनाला सतर्कतेचा आदेश

मुंबई: प्रतिनिधी मुंबई व परिसरात  सुरू असलेल्या संततधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी घेत मुंबई महानगरपालिकेला अधिक सतर्क राहण्याबाबत सूचना त्यांनी दिल्या. कालपासून  जोरदार पाऊस कोसळत असून आजही पावसाने मुंबईला झोडपले. उद्या देखील पावसाचा जोर कायम राहील असे भारतीय हवामान खात्याने कळविले आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगावी …

Read More »

राम प्रधानांच्या निधनाने शरद पवारांना झाले दु:ख, आठवणी जागवित वाहीली श्रध्दांजली सकाळी ९२ व्या वर्षी प्रधानांचे निधन

मुंबई: प्रतिनिधी राम प्रधान यांच्या जाण्याने महाराष्ट्रातील प्रशासकीय सेवेतील एक बुध्दिमान व व्यासंगी व्यक्तिमत्व हरपले अशा शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. माजी केंद्रीय गृह सचिव व महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्य सचिव राम प्रधान यांच्या निधनाचे वृत्त ऐकून मनस्वी दुःख झाल्याचे शरद पवार यांनी म्हटले …

Read More »

माजी केंद्रीय गृहसचिव आणि अनेक समित्यांचे प्रमुख राम प्रधान यांचे निधन ९२ व्या वर्षी वार्धक्यामुळे घेतला शेवटचा श्वास

मुंबई: प्रतिनिधी माजी केंद्रीय गृहसचिव राम प्रधान यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी आज सकाळी ८.३० वाजता वार्धक्यामुळे राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलं असा परिवार आहे. माजी केंद्रीय गृहसचिव होण्यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री स्व.यशवंतराव चव्हाण यांचे खाजगी सचिव म्हणून त्यांनी काम पाहिले. नंतरच्या काळात ते महाराष्ट्राचे मुख्य सचिव …

Read More »

महिला लोकप्रतिनिधींशी झालेल्या असभ्य वर्तनाचा निषेध: आंदोलन तीव्र करणार बेस्टला भाजपाने दिला इशारा

मुंबई: प्रतिनिधी २३ जुलै रोजी भाजपचे मुंबई शहरातील नगरसेवक बेस्ट महाव्यवस्थापकांकडे वीज दरवाढ आणि नागरिकांची वीज तोडण्याच्या धमक्यांचा विरोध करण्यासाठी गेले असता यावेळी बेस्ट महाव्यवस्थापक आणि अन्य कर्मचाऱ्यांनी भाजप लोकप्रतिनिधींशी असभ्यवर्तन करत दुर्वव्यवहार केला. पोलिस बळाचा वापर करून घेराव मधून बेस्ट महाव्यवस्थापकांनी पळ काढताना, भाजपच्या महिला लोकप्रतिनिधींशी पोलिसांनी व अन्य …

Read More »

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी ९ ऑगस्टपर्यत अर्ज करा महामंडळाचे आवाहन

मुंबई: प्रतिनिधी मुंबई शहर-उपनगर जिल्हयातील मातंग समाजातील मांग, मातंग. मिनी मादीग, मादींगा, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधे मांग, मांग गारुडी, मांग गारोडी, मादगी, मादिगा या १२ पोटजातीतील विद्यार्थ्यांनी सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षात शिक्षण घेतलेल्या व सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झालेल्या इयत्ता १० वी,१२ वी,पदवी, पदव्युत्तर वैद्यकीय व अभियांत्रिकी इ. करिता महामंडळाकडुन सरासरी ६० पेक्षा जास्त गुण असलेल्या …

Read More »

संपूर्ण वीजबिल माफ झालेच पाहिजे भीम आर्मीची ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांच्याकडे निवेदनामार्फत मागणी

मुंबई: प्रतिनिधी कोरोनामुळे राज्यात लॉकडाऊन अद्यापही आहे. त्यामुळे अनेकांचे रोजगार गेलेले आहेत. तर काहीजणांना कमी वेतनात काम करावे लागत आहे. यापार्श्वभूमीवर वीजेचा वापर वाढणे सहाजिकच आहे. मात्र वीज वितरण विभागाकडून वीज ग्राहकांना अव्वाच्या सव्वा वीज बिले पाठविण्यात आल्याने ही सर्वसामान्य नागरिकांना वीज बिल भरणे अवघड बनले असल्याने वीज बिलेच माफ …

Read More »

मुंबई उपनगरातील बेरोजगारांनों या संकेतस्थळावर नावे नोंदवा कौशल्यविकास मंत्री नवाब मलिक यांचे आ‌वाहन

मुंबई : प्रतिनिधी राज्य शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या http://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर रोजगार इच्छूक उमेदवारांना नाव नोंदणीची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. तथापि मुंबई उपनगर जिल्ह्यातील आतापर्यंत नोंदणी केलेल्या बहुसंख्य उमेदवारांनी आपल्या आधार क्रमांकाची नोंद केलेली नाही. तरी अशा उमेदवारांना आपल्या नोंदणी क्रमांकास आधार क्रमांकही जोडावा लागणार आहे, अन्यथा 15 ऑगस्ट नंतर …

Read More »

सावधान ! मॅट्रीमॉनिअल संकेतस्थळावरून फसवणूकीची शक्यता सावधगिरी बाळगण्याचे सायबर विभागाचे आवाहन

मुंबई : प्रतिनिधी मॅट्रीमॉनिअल संकेतस्थळावर सायबर भामट्यांकडून लोकांची आर्थिक फसवणूक होऊ शकते. त्यापासून सावधगिरी बाळगावी, असे आवाहन महाराष्ट्र सायबरतर्फे करण्यात येत आहे. सध्याच्या काळात बऱ्याच उपवर मुलं /मुलींचे पालक आपल्या पाल्याच्या लग्नासाठी योग्य जोडीदार निवडीसाठी अनेक मॅट्रीमॉनिअल संकेतस्थळावर नोंदणी करतात, तसेच विवाह जमविणाऱ्या बऱ्याच संस्थांनीही स्वतःचे संकेतस्थळ सुरु केले आहे. यावर उपवर मुले-मुलींच्या पालकांना …

Read More »

३० जुलैपासून क्यु आर कोडचा पास असेल तरच लोकलमध्ये प्रवेश अर्ज करून पास काढून घेण्याचे राज्याच्या मुख्य सचिव संजय कुमार यांचे आवाहन

मुंबई : प्रतिनिधी अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या अधिकारी/ कर्मचारी वर्गातील प्रवाशांना ये – जा करण्यासाठी ठराविक लोकल रेल्वे सेवा सुरु करण्यात आली आहे. यापुढे मात्र अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांकडे ‘क्यु-आर’ कोडचा ई-पास (ईलेक्ट्रॉनिक) असणे आवश्यक आहे. असे ई-पास देण्यासाठी संबंधित कार्यालये, आस्थापनांनी आपल्या कर्मचाऱ्यांची माहिती एकत्रितरीत्या कार्यालय प्रमुखाकडे सादर करावी. संबंधित …

Read More »