दक्षिण मुंबईतील पश्चिम रेल्वेवरील चर्नी रोड स्थानकाबाहेरील प्रस्तावित पादचारी पुलाचे काम पुढील आदेश येईपर्यंत करू नये, असे आदेश नुकतेच उच्च न्यायालयाने मुंबई महानगरपालिकेला दिले. चर्नी रोड स्थनकाच्या पूर्व प्रवेशाद्वाराबाहेर महर्षी कर्वे रोड ओलांडून सैफी रुग्णालयासमोर उतरणाऱ्या या प्रस्तावित पादचारी पुलाच्या बांधकामाला सैफी रुग्णालयाच्या वतीने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्या …
Read More »रविंद्र वायकर विरोधातील प्रकरण बंदचा अहवाल न्यायालयाने स्वीकारला जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी किरीट सोमय्या यांच्या आरोपावरून दाखल केला गुन्हा
जोगेश्वरी येथील सुप्रिमो क्लबचा गैरवापर करून पंचतारांकित हॉटेल बांधताना माहिती दडवल्याचा आणि बनावट माहितीच्या आधारे महापालिकेकडून वेगवेगळ्या परवानग्या मान्य केल्याप्रकरणी शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) खासदार रविंद्र वायकर आणि त्यांच्या पत्नीविरोधात दाखल प्रकरण बंद करण्याबाबत मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेचा अहवाल महानगरदंडादाधिकारी न्यायालयाने मान्य केला. त्यामुळे, रविंद्र वायकर यांना दिलासा मिळाला आहे. …
Read More »छोटा राजनच्या मेहुण्यासह एकाची पुराव्याअभावी सुटका व्यापारी संजय गुप्ता यांच्या हत्येप्रकरण : विशेष सीबीआय न्यायालयाचा निर्णय
नवी मुंबईतील केबलच्या व्यापारी संजय गुप्तांच्या साल २००५ मधील हत्येप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) विशेष न्यायालयाने नुकतीच छोटा राजनचा मेहुणा जयंत मुळे आणि सध्या तुरुंगात असलेला टोळीतील कथित सदस्य संतोष भोसले यांची पुराव्याअभावी सुटका करण्याचे आदेश दिले. दोघा आरोपीवरील आरोप सिद्ध करण्यासाठी सादर केलेले पुरावे पुरेसे नसल्याचे निरीक्षण विशेष सत्र …
Read More »नवाब मलिक यांच्या अडचणी वाढण्याची शक्यताः दोन आठवड्यानंतर सुनावणी नियमित जामीन अर्जावर उच्च न्यायालयात दोन आठवड्यांनी सुनावणी
माजी राज्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते नवाब मलिक सध्या अंतरिम वैद्यकीय जामीनावर बाहेर आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मिळाल्याने ते सध्या कोणत्याही आडकाठीविना प्रचारात व्यग्र असल्याच्या दाव्याची उच्च न्यायालयाने गुरूवारी दखल घेतली. मलिक यांनी नियमित जामीनासाठी काही महिन्यांपूर्वी केलेल्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याचे आणि गुणवत्तेच्या आधारे त्यावर निर्णय देण्याचे …
Read More »कॉ पानसरे हत्याप्रकरणी उच्च न्यायालयाची खंत, फरारी आरोपी वगळता तपासात काहीच नाही पानसरे हत्या प्रकरणाचा सर्व पैलूंनी तपास- एटीएसचा उच्च न्यायालयात दावा
कॉ.गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या सर्व पैलूंनी तपास केला असून त्यात नवे काहीच आढळले नसल्याचा दावा राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) गुरूवारी उच्च न्यायालयात केला. त्यानंतरही, पानसरे कुटुंबीयांच्या तपासावर न्यायालयीन देखरेख ठेवण्याबाबत आग्रही भूमिकेनंतर प्रकरणातील दोन फरारी आरोपींचा मुद्दा वगळता तपास करण्यासारखे काहीच उरलेले नसल्याची टिप्पणी न्यायालयाने केली. उच्च न्यायालयाच्या न्या. अजय …
Read More »मुंबईतील निवडणूक कर्तव्यावरील पोलीस कर्मचाऱ्यांच्या टपाली मतदानाला प्रारंभ पोलीस कर्मचाऱ्यांचे सुविधा केंद्रामध्ये टपाली मतपत्रिकेद्वारे उत्साहात मतदान
राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अंमलबजावणीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. निवडणूक कर्तव्यावरील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी मुंबई शहर जिल्ह्यातील धारावी, सायन कोळीवाडा, शिवडी, भायखळा, मलबार हिल, मुंबादेवी, कुलाबा या सात विधानसभा मतदारसंघात सुविधा केंद्रामध्ये (Facilitation Centre) आजपासून टपाली मतदानाला प्रारंभ झाला. राज्यात एका टप्प्यात येत्या २० …
Read More »वरळी बीएमडब्ल्यू हिट अँण्ड रन प्रकरण : आरोपी मिहिर शहाच्या याचिकेवर उच्च न्यायालयाने ठेवले बोट युक्तिवाद पूर्ण; निर्णय ठेवला राखून
एखाद्या व्यक्तीला गुन्हा करताना प्रत्यक्ष पाहिले किंवा पकडले गेल्यास (रंगेहात) त्याला अटकेच्या कारणांची माहिती देणे, ही निव्वळ एक औपचारिकता ठरते, असे निरीक्षण नोंदवून उच्च न्यायालयाने गुरुवारी वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहिर शहाच्या याचिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि याचिकेवरील निर्णय राखून ठेवला. याचिकाकर्त्याला गुन्हा करताना प्रत्यक्ष पाहिले गेले आहे. …
Read More »जयदीप आपटे आणि डॉ चेतन पाटील यांच्या जामीन अर्जावर उच्च न्यायालयातच सुनावणी मालवण येथील शिवपुतळा दुर्घटना
मालवण शिवपुतळा दुर्घटना प्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे आणि पुतळ्याचे बांधकाम सल्लागार डॉ. चेतन पाटील यांच्याविरोधात नुकतेच आरोपपत्र दाखल झाले असून दोघांनीही कनिष्ठ न्यायालयात जामिनासाठी दाद मागावी, असे राज्य सरकारकडून मंगळवारी उच्च न्यायालयात सांगण्यात आले. परंतु, न्यायालयाने दोघांच्या जामिनासाठीच्या याचिकेवर उच्च न्यायालयातच सुनावणी होणार असल्याचे स्पष्ट केले आणि आरोपपत्राची पत्र सादर …
Read More »आयपीएलदरम्यान सुरक्षा शुल्क कमी करण्याचा निर्णय समर्थनीय कसा? उच्च न्यायालयाची राज्य सरकारला विचारणा
राज्यातील आयपीएल सामन्यांसाठी उपलब्ध केलेल्या पोलीस सुरक्षेचे शुल्क कमी करण्याचा तसेच त्याबाबतचा निर्णय २०११ पासून पूर्वलक्ष्यी पद्धतीने लागू करण्याच्या निर्णयाचे समर्थन कसे केले जाऊ शकते?,अशी विचारणा मंगळवारी न्यायालयाने राज्य सरकारला केली. तसेच यासंदर्भात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसआय) आणि मुंबई क्रिकेट असोशिएशनला (एमसीए) प्रतिज्ञापत्राद्वारे भूमिका स्पष्ट करण्याचेही आदेश दिले. राज्यातील …
Read More »निवडणूक काळात आयोगाकडून ५०० कोटींहून अधिक मालमत्ता जप्त वाहन तपासणीसाठी ६,००० पथके तैनात
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यासाठी राज्यभर स्थिर व भरारी सर्वेक्षण पथके तैनात केली आहेत. एकूण ६ हजार पथकांमार्फत वाहनांची तपासणी करून संशयास्पद वस्तू जप्त केल्या जात आहेत, ज्यात आतापर्यंत ५०० कोटी रुपयांहून अधिक बेकायदा मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. निवडणूक काळात लागू असलेल्या आदर्श आचारसंहितेनुसार राजकीय पक्ष …
Read More »
Marathi e-Batmya