मुंबई

उच्च न्यायालयात याचिका, निवासी भागातील रेडी मिक्स्ड काँक्रिट प्लांट बंद करा गोवंडी, देवनार आणि चेंबूर भागातील वायू प्रदूषणाची पातळी चिंताजनक

मुंबईतील निवासी भागात कार्यरत रेडी मिक्स्ड काँक्रिट (आरएमसी) प्लांट बंद करण्याची मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. या प्लांटमुळे गोवंडी, देवनार आणि चेंबूर भागातील वायू प्रदूषणाची पातळी खालावल्याचा आणि श्वसानाशी संबंधित आजार बळावल्याचा दावाही याचिकेत केला आहे. अर्थ सेवाभावी संस्थेच्यावतीने उच्च न्यायालयात ही जनहित याचिका करण्यात आली …

Read More »

अजित पवारच उतरले नवाब मलिक आणि सना मलिक यांच्या प्रचारासाठी भाजपाच्या नाकावर टिच्चून नवाब मलिक यांना एबी फॉर्म दिला

भारतीय जनता पार्टीचा विशेषता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रचंड दबाव आणि कडाडून विरोध असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्टवादी काँग्रेसने नवाब मलिक यांना एबी फॉर्म दिला आणि सना मलिक यांच्या निवडणूक प्रचारार्थ आयोजित पदयात्रेत अजित पवार सहभागी झाले. अजित भाजपाच्या दबावाला अजिबात बळी पडले नाहीत. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची …

Read More »

मुख्यमंत्र्यांच्या नाही तर पालिका अधिकारी कोणाच्या आदेशाचे पालन करतात ? उच्च न्यायालयाची बृहन्मुंबई महानगरपालिकेला सवाल

विकास आराखडा (डीपी) रस्ता संरेखित करण्याबाबत खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश देऊनही बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करीत असतील, तर मग पालिका अधिकारी नेमके कोणाच्या आदेशाचे पालन करतात? असा सवाल नुकतेच उच्च न्यायालयाने मुंबई महानगरपालिका प्रशासानाला केला. पालिका अधिकाऱ्यांना कसलीच भिती नाही राहिली आहे का?, खुद्द राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आदेश …

Read More »

नेरळ ते माथेरान दरम्यान धावणारी मिनी ट्रेन पुन्हा सुरु जाणून घ्या गाडीचे वेळापत्रक

मध्य रेल्वेने ६ नोव्हेंबर २०२४ पासून नेरळ-माथेरान नॅरो गेज मार्गावरील सेवा पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली आहे. हे पुन्हा सुरू केल्याने नेरळ आणि माथेरानला जोडणाऱ्या लोकप्रिय मिनी ट्रेन सेवा परत आणण्यासाठी सेट केले आहे, ज्यामुळे प्रवाशांना पुन्हा एकदा निसर्गरम्य मार्गाचा आनंद घेता येईल. . नेरळ-माथेरान डाऊन गाड्या खालील वेळापत्रकानुसार दररोज …

Read More »

केंद्र आणि राज्य सरकारला उच्च न्यायालयाची नोटीस मालवणी झोपडपट्टीवासियांच्या घरावरील कारवाईचे प्रकरण:

गेल्यावर्षी ऐन पावसाळ्यात मालाडच्या मालवणी येथील अंबुजवाडीतील झोपडपट्टीवासीयांची घरे पाडण्यात आली होती. त्यांच्या पुनर्वसनाची मागणी करणारी याचिका ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी केली आहे. त्या याचिकेची गंभीर दखल घेऊन उच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकारला नोटीस बजावून भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले. शहरातील विकास प्रकल्पाच्या नावाखाली गेल्यावर्षी जून महिन्यात …

Read More »

भाजपा माजी खासदार प्रज्ञासिंग ठाकूर यांच्याविरोधात वॉरंट एनआयए न्यायालयाकडून वॉरंट जारी

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील खटल्याची कार्यवाही शेवटच्या टप्प्यात आली असून राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) विशेष न्यायालयासमोर या खटल्यावर अंतिम युक्तिवाद सुरू आहे. तसे असतानाही या खटल्यातील मुख्य आरोपींपैकी एक आणि भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांना एनआयए न्यायालयाने १० हजार रुपयांचे जामीनपात्र वॉरंट बजावले आहे. येत्या १३ नोव्हेंबरपर्यंत प्रज्ञासिंग ठाकूर न्यायालयात …

Read More »

निवडणूक मुख्याधिकारी यांची स्पष्टोक्ती, कोणत्या पदावर कोणाला ठेवायचे याचे अधिकार आयोगाकडे शरद पवार यांच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे आदेश, सर्व गाड्या तपासा

दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने बारामतीत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना सरकारी पोलिसी वाहनातून रसद पुरवली जात असल्याचा खळबळजनक आरोप राज्यातील महायुती सरकारवर केला. त्यासंदर्भात आज निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांनी सांगितले की, त्या आरोपानंतर राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सर्व वाहने तपासण्याचे …

Read More »

निवडणूक आयोगाकडून पोलिस महासंचालक पदी संजय वर्मा यांची नियुक्ती रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात आल्यानंतर केली नियुक्ती

काँग्रेस महाविकास आघाडीकडून राज्याच्या पोलिस महासंचालक पदावरून रश्मी शुक्ला यांना हटविण्याची मागणी करण्यात येत होती. त्यानुसार उशीरा का होईना निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांना पोलिस महासंचालक पदावरून हटविले. तसे आदेश राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी नव्या नावाची घोषणा करण्यासंदर्भात तीन आयपीएस अधिकाऱ्यांची सादर करण्याचे आदेश राज्याच्या गृहविभागाला दिले. त्यातून …

Read More »

उच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल, वेळेआधी उमेदवारांचे अर्ज नाकारले कसे ? मंगळवारी भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ३० ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजेनंतर अर्ज भरणाऱ्या राज्यातील विविध पक्षांच्या उमेदवारांचे अर्ज कोणत्या कारणास्तव फेटाळले ?, अशी विचारणा उच्च न्यायालयाने सोमवारी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे (ईसीआय) केली. तसेच त्याबाबत मंगळवारी भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा ३० ऑक्टोबर शेवटचा दिवस होता. …

Read More »

मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात १०५ अंतिम उमेदवार तर उपनगर जिल्ह्यातील २६ विधानसभा मतदारसंघात ३१५ अंतिम उमेदवार

मुंबई शहर जिल्ह्यातील धारावी, सायन कोळीवाडा, वडाळा, माहिम, वरळी, शिवडी, भायखळा, मलबार हिल, मुंबादेवी, कुलाबा या दहा विधानसभा मतदारसंघांमध्ये विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ साठी आज उमेदवारी मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर अंतिम १०५ उमेदवार आहेत, अशी माहिती मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी आज दिली. उमेदवारी अर्ज …

Read More »