राज्यातील अनेक घटक सध्या आरक्षणाची मागणी करत आहेत. मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाज आरक्षण मागत आहेत. याविषयी सातत्याने बाहेर बोलण्यापेक्षा विशेष अधिवेशन बोलवावं. इस्रायल-पॅलेस्टाईनमधील वाद, रशियाचा वाद यासंदर्भात चर्चा करण्यासाठी तातडीने संसदेचं अधिवेशन किंवा सर्वपक्षीय बैठक सरकारने बोलवली पाहिजे. तसंच, महाराष्ट्रात आरोग्य, शिक्षण, आरक्षणाचे मुद्दे अशी गंभीर आव्हानं राज्यासमोर …
Read More »नाना पटोले यांचा सवाल, आरक्षणाचा निर्णय घेण्यासाठी भाजपा सरकारला १० वर्ष का लागावी ? आरक्षणप्रश्नी सरकारने भूमिका स्पष्ट करुन मराठा व ओबीसी समाजाची दिशाभूल थांबवावी
राज्यात सध्या आरक्षणाच्या प्रश्नावरून मराठा व ओबीसी समाज एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. ट्रिपल इंजिन सरकारची आरक्षणप्रश्नी स्पष्ट भूमिका नसल्याने हा गुंता वाढत चालला आहे. समाजा-समाजात संशय वाढत चालला आहे. राज्य सरकारमध्येच आरक्षण प्रश्नावरून एकवाक्यता नाही. सरकारमधील मंत्री बोलतात एक तर दुसरीकडे जाहिरात देऊन वेगळाच संदेश देत आहेत, ही गोंधळाची परिस्थिती …
Read More »प्रविण दरेकर यांचा शरद पवार यांना सल्ला, बावनकुळे यांच्यावर टीका करू नका ज्येष्ठ नेते सोडून का गेले याचा विचार करावा
आमचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांना तिकिट जरी पक्षाने दिलं नसलं तरी त्यांना प्रदेशाचं नेतृत्व भाजपाच्या श्रेष्ठीनं दिलंय याची आठवण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भाजपाचे आमदार प्रविण दरेकर यांनी करून देत आमच्या नेत्यावर टीका करू नये असा सल्लाही दिला. पुढे बोलताना प्रविण दरेकर म्हणाले की, शरद पवार यांनी त्यांच्या …
Read More »राज्य सरकारच्या जाहिरातीवर अशोक चव्हाण यांचा हल्लाबोल मराठा आरक्षणासाठी संसदेत घटनादुरुस्ती करण्याची मागणी
मराठा समाजाने आरक्षण मागण्याऐवजी १० टक्के आर्थिक दुर्बल घटकांच्या आरक्षणाचा पर्याय निवडावा, अशी राज्य सरकारची भूमिका आहे का? असा सवाल करून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी राज्य सरकारच्या जाहिरातीवर हल्लाबोल केला आहे. राज्य सरकारने आज प्रमुख वर्तमानपत्रांमध्ये आर्थिक दुर्बल घटकांच्या आरक्षणासंदर्भात ठळकपणे प्रकाशित केलेल्या जाहिरातीवर प्रतिक्रिया देताना अशोक चव्हाण म्हणाले …
Read More »अजित पवार यांच्या नेतृत्वाचे शरद पवार यांनी केले कौतुक शरद पवार यांच्या हस्ते अनंतराव पवार इंग्लिश मीडियम स्कूल इमारतीचे उद्घाटन
राष्ट्रवादी काँग्रेसमधील पक्षफुटीनंतर पवार कुटुंबिय आज पहिल्यांदाच दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथील विद्या प्रतिष्ठान संस्थेने उभारलेल्या अनंतराव पवार इंग्लिश मीडियम स्कूलच्या नव्या इमारतीच्या उद्घाटना निमित्ताने एकत्र आले होते. यावेळी या नव्या इमारतीचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, सुमित्राताई पवार, प्रतिभाताई …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांचे भावनिक आवाहन, …भावांनो टोकाचे पाऊल उचलू नका मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील...
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दोन दिवस शिल्लक राहिल्याची आठवण करून दिली. तसेच २५ तारखेला मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नी पुढील रणनीती जाहिर करणार असल्याची घोषणा करत आमरण कडक उपोषण करणार असल्याचे जाहिर केले. तसेच जोपर्यंत मराठा समजाला आरक्षण देत नाही तोपर्यंत गावाची सीमाही शिवू देणार नाही असा …
Read More »मोदी सरकारचा फतवाः अधिकाऱ्यांनो रथयात्रा काढा, काँग्रेसची टीका सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना सरकारच्या कामाचा प्रचार करण्याचे निर्देश
आगामी पाच राज्यातील विधानसभा निवडणूकांचे वेळापत्रक जाहिर झाले आहे. त्यानुसार निवडणूक प्रक्रियाही सुरु झाली आहे. देशभरातील प्रमुख राजकिय पक्ष निवडणूकीच्या प्रचाराला लागले आहेत. मात्र नेहमीप्रमाणे मोदी सरकारमधील बहुसंख्य खासदार, मंत्री आणि विविध राज्याचे मुख्यमंत्री यासह स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ही प्रचाराच्या कामात व्यस्त राहणार आहेत. त्यामुळे केंद्र सरकारच्या अखत्यारित …
Read More »ट्विट करत रोहित पवार यांचा देवेंद्र फडणवीस यांना टोला, राजकारणापायी…. निधी वाटपावरून साधला निशाणा
राज्यात शिवसेनेतील एकनाथ शिंदे यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस मधील अजित पवार गटानेही भाजपाच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार अजित पवार हे सत्तेत सहभागीही झाले. मात्र अजित पवार हे जरी राज्याचे गृहमंत्री असले तरी त्यांना पूर्ण अधिकार अद्यापही दिले नसल्याचे आता स्पष्ट होत आहे. याच मुद्यावरून शरद पवार समर्थक रोहित पाटील यांनी …
Read More »मनोज जरांगे पाटील यांची सरकारवर टीका, आम्हाला येडे समजता का?….. २५ तारखेपासून पाणी, अन्न आणि औषधे न घेता कडक आमरण उपोषण करणार
मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी १७ दिवस उपोषण केले. त्यानंतर मराठावाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये दौरा केले. त्यानंतर आज आंतरावली सराटी येथे आयोजित मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, सरकारने आम्हाला एक महिना मागितला आम्ही ४० दिवस दिले. त्याची मुदत उद्या २४ तारखेला संपत आहे. …
Read More »विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल, हमीभावाचे गाजर दाखवून… शेतकऱ्यांची चेष्टा थांबवा; अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील
देशातील शेतकऱ्यांना हमीभावाचे गाजर दाखवून केंद्र सरकारने सत्ता मिळविली. केंद्रीय मंत्रिमंडळाने १८ ऑक्टोबरला हंगाम २०२४-२५ च्या रब्बी पिकांचे हमीभाव जाहीर केले. ही हमीभावाची वाढ केवळ कागदी खेळ आहे. नऊ वर्ष जनता केंद्र सरकारला सहन करत आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांची दिशाभूल करू नये. आता शेतकऱ्यांची चेष्टा थांबवावी. अन्यथा सरकारला याचे गंभीर …
Read More »
Marathi e-Batmya