कोणत्याही समाजातील कुठलाही धर्म चुकीच्या प्रकाराला आणि वृत्तीला समर्थन करत नाही असे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे भागवत वारकरी संमेलनात वारकऱ्यांना संबोधित करताना म्हटले आहे. या कार्यक्रम सोहळ्याचे अध्यक्ष हरिभक्त परायण दिनकर शास्त्री महाराज होते. यावेळी प्रमुख उपस्थिती खासदार अमोल कोल्हे , श्रीनिवास पाटील, …
Read More »काँग्रेसच्या कार्याध्यक्षांना विभागनिहाय जबाबदारीचे वाटप कुणाल पाटलांकडे अमरावती व नागपूर, प्रणिती शिंदे यांच्याकडे उत्तर महाराष्ट्र
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी प्रदेश कार्याध्यक्षांना विभागनिहाय जबाबदारीचे वाटप केले आहे. यात प्रदेश कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील यांच्याकडे अमरावती व नागपूर विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. माजी मंत्री व प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान यांच्याकडे कोकण आणि मराठवाडा, माजी मंत्री व प्रदेश कार्याध्यक्ष बस्वराज पाटील मुरुमकर यांच्याकडे …
Read More »मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ओबीसी समाजाची बैठक इतर मागास समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
इतर मागास समाजाच्या अर्थात ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची शासनाची भूमिका आहे. इतर मागास समाजाचे महामंडळ, सारथी, बार्टी, महाज्योती, टीआरटीआय या संस्थांना निधी वाटपात सुसुत्रता आणतानाच सर्व समाज घटकांना समप्रमाणात न्याय देण्यात येईल, केंद्र शासनाच्या विश्वकर्मा योजनेची सांगड घालत राज्यात त्याची प्रभावी अंमलबजावणी करून बारा …
Read More »शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचा खोचक सल्ला, सदावर्तेनी आरएसएसचा गणवेश परिधान करावा प्रवक्ते महेश तपासे यांची गुणवरत्न सदावर्ते यांच्यावर टीका
महात्मा गांधींची सत्य व अहिंसा, शांती व सद्भावना हा सुविचार सबंध जगाने स्वीकारली. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शासकीय कार्यक्रमात गांधी प्रतिमेसमोर पंतप्रधानांनाही नतमस्तक व्हावं लागतं व आरएसएसला खुलेआम गांधी विचारांचा विरोध करता येत नाही म्हणून गुणरत्न सदावर्ते सारखे काही एजंट आरएसएसने नेमले अशी घनाघाती टीका शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते …
Read More »रायगड जिल्ह्यातील शेकडो रिपाई कार्यकर्त्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश नाना पटोले यांची स्पष्टोक्ती, राहुल गांधी आणि मल्लिकार्जून खर्गे यांच्यावरील विश्वास वाढतोय
काँग्रेस पक्षात प्रवेश घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. काँग्रेस पक्षच सर्वांना बरोबर घेऊन जाऊ शकतो, सर्व जाती धर्मांच्या लोकांना न्याय मिळवून देऊ शकतो हा विश्वास दृढ होत आहे. राहुल गांधी, मल्लिकार्जून खर्गे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून इतर पक्षातील असंख्य नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहेत, असे प्रदेशाध्यक्ष …
Read More »राज ठाकरे म्हणाले, आम्हाला निषेध नोंदवणं माहीत नाही…. मराठी महिला स्त्रीला जागा नाकारल्याच्या घटनेचेनंतरचे पडसाद
गणेश अंनत चतुर्दशी दिवशी अख्खा महाराष्ट्र त्याच्या लाडक्या गणरायाला निरोप देण्याच्या कामात व्यस्त असताना मुलुंडमध्ये विशेषतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या शिवसदन इमारतीत मराठी महिलेला केवळ महाराष्ट्रीयन आहे म्हणून जागा देण्यास नकार देण्याचा प्रकार घडला. त्याचे राजकिय पडसाद चांगलेच उमटले. दरम्यान राज ठाकरे यांनी ट्विट करत …
Read More »अतुल लोंढे यांचा सवाल, भाजपा सत्तेत असतानाच ‘गोडसेच्या औलादी’ का फोफावतात ? अतिरेकी नथुराम गोडसेचे उदात्तिकरण करणाऱ्या सदावर्तेला बेड्या ठोका
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा खुनी अतिरेकी नथुराम गोडसेचा उदो उदो करण्याची प्रवृत्ती देशात बळावत चालली आहे. नथुराम गोडसे हा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा खुनी आहे हे जगजाहीर असताना त्याचे गुणगान गाण्याची हिम्मत फक्त भारतीय जनता पक्षाचे सरकार असतानाच होते. सदावर्ते नावाच्या एका विकृत इसमाने स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या वार्षिक अहवालावर …
Read More »डॉ स्वामीनाथन यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी या शब्दात वाहिली आदरांजली स्वामीनाथन यांच्या निधनाने शेतकऱ्यांसाठी आयुष्य वेचलेला सुपुत्र गमावला
‘भारताला कृषी क्षेत्रात आत्मसन्मान मिळवून देणारा. कोट्यवधींच्या अन्नसुरक्षेची काळजी वाहणारा. शेती आणि शेतकरी यांच्या प्रगतीसाठी आयुष्य वाहून घेतलेला महान सुपुत्र आज भारत मातेने गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पद्मविभूषण, ज्येष्ठ वैज्ञानिक, कृषितज्ज्ञ डॉ एम एस स्वामीनाथन यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. डॉ स्वामीनाथन यांना श्रद्धांजली अर्पण करताना …
Read More »मतदार नोंदणी सुरुः गृहनिर्माण सोसायट्यांध्ये मतदान केंद्र उभारणार विधान परिषदेच्या मुंबई, कोकण विभाग पदवीधर आणि नाशिक, मुंबई विभाग शिक्षक मतदारसंघांसाठी नोंदणीचा कार्यक्रम जाहीर
विधान परिषदेच्या मुंबई आणि कोकण विभागाच्या पदवीधर मतदारसंघासाठी तसेच नाशिक आणि मुंबई विभागाच्या शिक्षक मतदारसंघांसाठी मतदार नोंदणी ३० सप्टेंबरपासून सुरू होणार आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली. यासंदर्भात आज मंत्रालयात देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व नोंदणीकृत मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. या बैठकीत देशपांडे यांनी ही …
Read More »अनिल परब यांचा सवाल, आम्ही काय प्रत्येक वेळी सर्वोच्च न्यायालयातच जायचं का? विधानसभा अध्यक्षांच्या दिरंगाईवर ठाकरे गटाचा आरोप
शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर पक्षांतरबंदी कायदा आणि आमदार अपात्रतेचे प्रकरण थेट सर्वोच्च न्यायालयात गेले. सुनावणीनंतर न्यायालयाने संबधित यंत्रणेवर ताशेरे ओढत बंडखोर आमदारांच्या अपात्रते बाबतचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी योग्य वेळेत घ्यावा असे सांगितल्यानंतरही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर वेळकाढूपणा करीत असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी करत प्रत्येक वेळी आम्ही …
Read More »
Marathi e-Batmya