राजकारण

अजित पवार यांचे आव्हान, महायुतीत सहभागी व्हा पत्र खोटं निघालं तर संन्यास घेईन… लोकांची कामे पूर्ण करण्याचा दबाव होता

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यापासून फारकत घेतल्यानंतर बीड येथे झालेल्या सभेला प्रत्युत्तर देण्यासाठी बीडऐवजी कोल्हापूरात हसन मुश्रीफ यांनी उत्तरदायित्व सभा आयोजित करण्यात आली. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, अजित पवार आणि काही लोकांनी वेगळा निर्णय का घेतला असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. आमच्यावर कसला दबाव होता अशी …

Read More »

पृथ्वीराज चव्हाण आणि अजित पवार यांच्यात रंगला शाब्दिक कलगीतुरा छत्रपतींचे पुरावे चालत नाही अन् निझामाचे चालतात....

मराठा आरक्षणप्रश्नी जालन्यात मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यासह राज्यातील कुणबी समाजातील सर्वांना मराठा आरक्षणाचा लाभ देण्याची मागणी केली. त्यावर राज्य सरकारने निजामकालीन नोंदी असलेल्या मराठा कुटुंबांना कुणबी दाखले देण्याची घोषणा केली. तर दुसऱ्याबाजूला याच मुद्यावरून जालन्यातील आंदोलन आणखी उग्र करत वंशावळीचा मुद्दा काढून टाकण्याची मागणीही करण्यात …

Read More »

शरद पवार यांचा नरेंद्र मोदींना सवाल, आता गेट वे इंडियाला काय म्हणायचं? इंडिया-भारत वादावर आणि जी २० परिषदेवरुन साधला निशाणा

मुंबईत विरोधकांच्या इंडिया आघाडीची बैठक संपन्न होत असतानाच केंद्रीतील मोदी सरकारने संसदेचं अधिवेशन बोलवलं. त्यातच जी २० या आंतरराष्ट्रीय नेत्यांची परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेच्या निमित्ताने मोदी सरकारने अचानक इंडिया या शब्दाऐवजी भारत शब्द वापरण्याचा निर्णय घेतला. त्यामवरून निर्माण झालेल्या वादंगाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी …

Read More »

अजित पवार म्हणाले, मराठा आरक्षण प्रश्नी सर्वपक्षिय बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावली बैठक

जालना येथील आंतरवाली सराटे येथे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण प्रश्नी उपोषणाचे आंदोलन पुकारले आहे. त्यांच्या या उपोषणाच्या आंदोलनाचा आज १४ वा दिवस असून आजपासून मनोज जरांगे पाटील यांनी वैद्यकीय उपचार आणि पाणीही त्यागले आहे. त्यातच राज्य सरकारने दोन वेळा सुधारणा केलेल्या राज्य सरकारचा निर्णय मनोज जरांगे पाटील यांनी …

Read More »

ॲड प्रकाश आंबेडकर यांचे नरेंद्र मोदी यांना प्रश्नावली, सांगा वाचवाल ना? जी २० परिषदेच्या निमित्ताने उपस्थित केले प्रश्न

“नरेंद्र मोदींनी #G20 शिखर परिषदेमध्ये भारताची नाचक्की होता होता कसंबसं “वाचवलं”, असं एक क्षण गृहीत धरूया”, असे म्हणत ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी देशातील महत्त्वाच्या आणि मूलभूत गोष्टी वाचवण्याची अपेक्षा व्यक्त केली असून, “नरेंद्र मोदी सांगा वाचवाल ना?” असा थेट सवाल करत आठ प्रश्न अॅड प्रकाश आंबेडकर यांनी नरेंद्र मोदी यांना …

Read More »

जयंत पाटील यांची टीका, सरकारला शेतकरी आत्महत्येचा कलंक पुसता येणार नाही शेतकरी आत्महत्या मुक्त राज्य करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा मात्र आत्महत्यांनी गाठला उच्चांक

राज्यातील वाढत्या शेतकरी आत्महत्यांच्या संख्येवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्यास सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे कितीही प्रयत्न केले तरी या सरकारच्या माथ्यावर लागलेला शेतकरी आत्महत्येचा हा ‘कलंक’ सरकारला पुसता येणार नाही असा हल्लाबोल त्यांनी सरकारवर केला आहे. एका बातमीचा आधार …

Read More »

उद्धव ठाकरे यांची टीका, शिवसेनेची स्थापना कमळाबाईला पालखीत… भाजपा आणि शिंदे गटावर केली सडकून टीका

शिवसेनेतील फुटीर गटाकडून आणि भाजपाकडून सातत्याने ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना शिवसेनेची काँग्रेस केल्याचा आरोप सातत्याने करण्यात येतो. त्या टीकेला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, २५ वर्षे ज्यांच्यासोबत राहिलो त्यांनी आतापर्यंत आमची दोस्तीच पाहिली. मात्र आता आमच्या मशालीची धगही सोसा असा गर्भित इशारा भाजपाला देत २५ …

Read More »

ग्रामविकासच्या भरतीप्रक्रियेतील उमेदवारांनी कोणत्याही प्रलोभनास बळी पडू नये मंत्री गिरीश महाजन यांचे आवाहन

ग्रामविकास विभागाची संपूर्ण भरतीप्रक्रिया शासनाने मान्यता दिलेल्या आय.बी.पी.एस. या कंपनीमार्फत राबविण्यात येत आहे. त्यामुळे सदर परीक्षा अत्यंत पारदर्शक व काटेकोर पद्धतीने होणार आहे. तथापि, काही समाजविघातक प्रवृत्तींच्या व्यक्तींकडून प्रलोभने दाखवून आर्थिक फसवणूक करण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा फसवणुकीपासून उमेदवारांनी दक्षता घ्यावी, तसेच अशाप्रकारच्या कोणत्याही प्रलोभनास बळी पडू नये, असे …

Read More »

जी-२० साठी मोदी सरकारच्या कृत्यावरून राहुल गांधी यांचे टीकास्त्र भटक्या कुत्र्यांना बांधले, मार्गावरील झोपडपट्ट्या झाकल्या

आंतरराष्ट्रीय स्तरावरील जी-२० देशाच्या राष्ट्रप्रमुखांची दोन दिवसीय परिषद नवी दिल्लीत होत आहे. या परिषदेच्या पार्श्वभूमी मोदी सरकारने परिषदेसाठी येणाऱ्या आंतरराष्ट्रीय पाहुण्यांना देशाची गरीबी आणि रस्त्यावरील भटकी कुत्री दिसू नयेत यासाठी दिल्लीत रस्त्यालगत असलेल्या झोपड्यांना लपविण्यासाठी लांबलचक पडदा बांधण्यात आलेला आहे. तसेच भटक्या कुत्र्यांना जबरदस्तीने पकडून त्यांना जनावरांच्या अॅम्ब्युलन्समधून हलविले जात …

Read More »

जी-२० मध्ये भारत- अरब राष्ट्र- युरोपीय संघाच्या नव्या कॉरीडॉरची घोषणा साऊथ एशियामध्ये चीनला पर्याय म्हणून भारताची रणनीती

आंतरराष्ट्रीय पातळीवर चीनचा वाढता आक्रमकपणा आणि अर्थनीतीमुळे भारतासह युरोप आणि अरब राष्ट्रांबरोबर अमेरिकेलाही झुंडावे लागत आहे. यापार्श्वभूमीवर सध्या नवी दिल्ली येथे सुरु असलेल्या जी-२० या राष्ट्रप्रमुखांच्या परिषदतेत चीनच्या वाढत्या दादागिरीला रोखण्यासाठी भारतीय उपखंड ते युरोपीयन महासंघ व्हाया अरब राष्ट्र असा नवा रस्ते आणि दळणवळणाच्या अनुषंगाने कॉरिडॉर उभारण्याच्यादृष्टीने तयारी दाखविली आहे. …

Read More »