शासनाच्या सन २०२२ च्या शुद्धिपत्रकामुळे प्रदीर्घ काळ प्रशासनाची सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यास त्याच्या वयाच्या ५० वर्षानंतर सेवानिवृत्तीपूर्वी पदोन्नतीची संधी उपलब्ध होईल, हा हेतू साध्य झाला आहे. शासनाने सदर शुद्धिपत्रक हे व्यापक हीत लक्षात घेऊन काढलेले असून विभागीय परीक्षेतून सूट देण्याच्या शासनाच्या अनुषंगाने न्यायाधिकरणात दोन स्वतंत्र मागणीसाठी दोन मूळ अर्ज दाखल केले …
Read More »देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती, …आमच्यासाठी ते भिडे गुरूजी आहेत, काही अडचण आहे का ? अमरावतीत गुन्हा दाखल, जितेंद्र आव्हाड यांनीही गुन्हा दाखल केला असून त्याची चौकशी सुरु
राज्यातील संभाजी भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी यांना पोलिसांनी अद्याप अटक का केली नाही असा सवाल काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केला. त्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभा कलम ३२ अन्वये विधानसभा अध्यक्षांना नोटीस दिली. त्यावर निर्णय देताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सदरची नोटीस फेटाळून लावली. त्यानंतर उफमुख्यमंत्री तथा …
Read More »नाना पटोले यांचा सवाल, महापुरुषांचा अपमान करण्याचे लायसन भाजपाने संभाजी भिडेला दिले का ? लोकांना जीवे मारण्याचे हिंदुत्व भाजपा व फडणवीसांना मान्य आहे का?
मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे हा व्यक्ती राजरोस महापुरुषांचा अपमान करत आहे परंतु भाजपाचे सरकार त्यावर कारवाई करत नाही. राष्ट्रपिता महात्मा गांधी, महात्मा जोतीबा फुले, सावित्रीबाई फुले, साईबाबा यांच्यासंदर्भात गरळ ओकणारा भिडे नावाचा इसम अजून मोकाटच आहे. महापुरुषांचा अपमान करण्याचे लायसन भाजपाने संभाजी भिडेला दिले आहे का ? असा संतप्त …
Read More »अतुल लोंढे यांची मागणी, परिक्षा पुन्हा घ्या, महाज्योतीच्या परिक्षेत गडबड घोटाळा प्रशासकीय अधिकारी बनण्याच्या गरिब मुलांच्या स्वप्नावर पाणी फेरणाऱ्यांना कडक शिक्षा व्हावी
महाज्योती, सारथी, बार्टी या संस्था गरिब कुटुंबातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षा देऊन मोठ्या प्रशासकीय पदावर जाता यावे म्हणून शासनाने सुरु केल्या आहेत. पण महाज्योतीच्या नुकतीच पार पडलेल्या परिक्षेत गडबड घोटाळा झाला आहे. या परिक्षेतील भ्रष्टाचार मोडून काढून परिक्षा पुन्हा घ्यावी व विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अन्यथा मोठे आंदोलन केले जाईल, असा इशारा …
Read More »पंतप्रधानांसमोरच शरद पवार म्हणाले, देशातील पहिला सर्जिकल स्ट्राईक शिवरायाच्या काळात लोकमान्य टिळक यांनी एक नवीन इतिहास तयार करण्याचं काम केलं
देशातील पहिला सर्जिकल स्ट्राईक शिवरायाच्या काळात लाल महालात झाला. शिवरायांनी लाल महालात शाहिस्तेखानाची बोटं कापली. हिंदवी स्वराज्याचा पाया शिवरायानीच रचला. त्यांनी रयतेचे राज्य निर्माण केलं. लोकमान्यांनी स्वराजाचे आंदोलन केले. केसरी आणि मराठा या वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांनी इंग्रजाना घाम फोडला. टिळक आणि महात्मा गांधींचे योगदान आम्ही विसरु शकत नाही असे राष्ट्रवादी …
Read More »नाना पटोले यांचा सवाल, मोदीजी, गेल्या ९ वर्षात १०० लाख कोटी रुपयांचे कर्ज केले ते विसरलात का ? कर्नाटकवरचे कर्ज ४० टक्के कमीशनवाल्या भाजपा सरकारचेच
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्याच्या कार्यक्रमात काँग्रेस पक्षावर खोटे आरोप केले. कर्नाटक व राजस्थान सरकारने कर्जाचा डोंगर उभा केल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला आहे. वास्तविक पाहता कर्नाटकात काँग्रेसचे सरकार येऊन दोन महिनेच झाले आहेत. त्याआधी कर्नाटकात भाजपाचे सरकार होते. कर्नाटकातील ४० टक्के कमीशनवाल्या भाजपा सरकारनेच कर्जाचा डोंगर उभा करुन …
Read More »नूहमध्ये कर्फ्यू, रात्रभर फ्लॅग मार्च, चार जिल्ह्यांमध्ये आज शैक्षणिक संस्था बंद हरियाणातील मेवात येथील नूह येथे घडली हिंसाचाराची घटना
हरियाणाच्या मेवात जिल्हा मुख्यालय नूह येथे सोमवारी झालेल्या हिंसाचारानंतर परिस्थिती तणावपूर्ण आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी नूहमध्ये कर्फ्यू लावावा लागला आहे. राज्य सरकारने मंगळवारी नूह, गुरुग्राम, पलवल आणि फरीदाबाद जिल्ह्यातील सर्व सरकारी आणि खाजगी शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचा आदेश जारी केला आहे. आज दोन्ही समुदायांच्या प्रतिनिधींमध्ये शांतता चर्चेची दुसरी फेरी होणार …
Read More »प्रकाश आंबेडकर यांचा आरोप, मणिपूरचा हिंसाचार हे गुजरातचे मॉडेल हिंसाचार प्रकरणात बरेचसे साम्य
आरएसएस आणि भाजपा संत्तेत आल्यापासून देशात मुस्लिम दलित आदीवासी विरोधी धार्मिक ध्रुवीकरण मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. सध्या मणिपुर मध्ये सुरू असलेला हिंसाचार २००२ मध्ये झालेल्या गुजरात हिंसाचाराचे मॉडेल आहे.गुजरातमध्ये मुस्लिम विरोध होता तर मणिपुरमध्ये मैतेईचा वापर होत आहे.असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले. प्रदेश कार्यालयात …
Read More »अतुल लोंढे यांचे स्पष्ट मत,… शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची कानउघाडणी करावी मोदी जे काही करत आहेत ते टिळकांच्या विचारसणी विरोधात आहे हे पवारांनी मोदींना सांगावे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना १ ऑगस्ट रोजी पुण्यातील एका कार्यक्रमात लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी उपस्थित रहावे की नाही हा त्यांचा व त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे. परंतु शरद पवार या …
Read More »शिर्डीत आलो अन कोल्हापूरात…केसरकरांच्या वक्तव्यावर भुजबळ म्हणाले, या आमच्याकडे… शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या वक्तव्यावर छगन भुजबळ यांचा मिश्किल टोला
राज्यातील शिंदे गटातील आमदार मंत्र्यांना काय झालेय कळायला मार्ग नाही. शिंदे गटाचा एक आमदार सकाळी म्हणाला त्या स्त्रीचे सौंदर्य पाहून खासदारकी दिली. तर मंत्री म्हणतो शिर्डीत आलो अन् कोल्हापूरात पूराच्या पाण्यात एका फुटानेही वाढ झाली नाही. शिंदे गटाच्या या मंत्र्याचा मात्र अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी मिश्किल टोला …
Read More »
Marathi e-Batmya