महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभा राज्यभर होत असून छत्रपती संभाजीनगर व नागपूर येथील सभेनंतर तिसरी सभा मुंबईत होत आहे. दोन्ही सभेला जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता आता मुंबईतील सभेच्या तयारीसाठी प्रदेश काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली असून मुंबईतील सभेच्या तयारीचा आढावा यावेळी घेण्यात आल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. पत्रकारांनी …
Read More »संजय राऊतांच्या त्या वक्तव्यावर शिंदे गटाच्या मंत्र्याने लगावला टोला, ते अंतरयामी झाले का ? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हलविण्याची पडद्यामागे हालचालीच्या वक्तव्यावर लगावला टोला
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हटविण्याच्या हालचाली दिल्लीत पडद्यामागे सुरु असल्याचा गौप्यस्फोट ठाकरे गटाचे खासदार तथा प्रवक्ते संजय राऊत यांनी केले. तसेच भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाला अपेक्षित असलेले जनमत निर्माण करण्यात शिंदे हे कमी पडत असल्याचे वक्तव्य केले. त्यावर शिंदे गटाचे मंत्री शंभुराज देसाई यांनी संजय राऊत यांच्या त्या गौप्यस्फोटावर खोचक …
Read More »काँग्रेसची भूमिका स्पष्ट, भाजपाविरोधात लढण्यासाठी जे एकत्र येतील त्यांच्यासह लढू हिम्मत असेल तर खारघर घटनेची उच्च न्यायालयातील न्यायाधीशांकडून चौकशी करा
राज्यात आणि देशात भारतीय जनता पक्षाचे सरकार हुकूमशाही पद्धतीने काम करत आहे. लोकशाही, संविधान संपुष्टात आणण्याचे काम सुरु आहे. भाजपाच्या या मनमानी कारभाराविरोधात एकत्र येऊन लढा देण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतलेला आहे. काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट असून या लढ्यासाठी जे पक्ष बरोबर येतील त्यांना एकत्र घेऊन लढा दिला जाईल, असे …
Read More »संजय राऊत यांचा फडणवीसांना टोला तर पवारांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण, माझे बोलणे झाले… देवेंद्र फडणवीसांना इशारा जास्त तोंड उघडायला लावू नका
उद्धव ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना विविध राजकीय मुद्द्यांवर भाष्य केलं. देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्यावर केलेल्या अप्रत्यक्ष टीकेलाही त्यांनी यावेळी प्रत्युत्तर दिलं. देवेंद्र फडणवीसांनी रविवारी अहमदनगरमधील छत्रपती शिवराय केसरी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी केलेल्या राजकीय वक्तव्याला संजय राऊतांनी …
Read More »शरद पवार यांचे पुन्हा संभ्रमातित वक्तव्य; २०२४ ला मविआ म्हणून लढण्याचा निर्णय….. राजकिय वर्तुळात तर्त-वितर्कांना उधाण
राज्यातील विरोधकांकडून एकाबाजूला भाजपाला हरविण्यासाठी विविध पातळीवर मोट बांधण्याचे प्रयत्न सुरु असतानाच महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना (ठाकरे गट) आणि काँग्रेस यांच्यात परस्पर विरोधी भूमिका असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात सध्या संभ्रमावस्था निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. अदानीप्रकरणी जेपीसी काँग्रेसची भूमिका असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा …
Read More »संजय राऊत यांचा खोचक सवाल, फडणवीसांना नेमकी कोणती अडचण…घोटाळेबाज आणि गुंडांची… मुंबईला गेल्यावर कागदपत्रे फडणवीसांकडे पाठविणार
गेल्या काही दिवसांपासून खासदार संजय राऊत सातत्याने शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळातील सदस्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. मंत्री दादा भुसे आणि आमदार राहुल कुल यांच्यानंतर आता संजय राऊतांनी गुलाबराव पाटलांवर ४०० कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे. या आरोपांवरून त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीकास्र सोडलं. जळगावात माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी …
Read More »विनायक राऊत म्हणाले, पिकनिकमुळे अनेकवेळा आले आणि… फारशी दखल घ्यावी असं वाटत नाही
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ६ मे रोजी कोकण दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी ते रत्नागिरीत जाहीर सभा घेणार असल्याची माहिती नितीन सरदेसाई यांनी दिली आहे. कोकणातील विविध समस्यांवर ही सभा होणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून कोकणात संघटन वाढवण्याकरिता मनसेकडून हालचाली सुरू असल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर …
Read More »संजय राऊत यांचा हल्लाबोल, गुलाबो गँग….पालकमंत्री असताना ४०० कोटींचा भ्रष्टाचार काही दगड आमच्याकडे सोनं म्हणून होते पण ते दगडच निघाले
राज्यातील सत्तांतरानंतर आणि शिवसेनेतील फुटीनंतर ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे हे पहिल्यांदाच जळगावातील पाचोऱ्यात आज येत आहेत. या निमित्ताने ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि शिंदे गटाचे मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यात सभेपूर्वीच एकमेकांवर टीका टीपण्णीचे वाक्ययुध्द चांगलेच रंगल्याचे चित्र पाह्यला मिळत आहे. या सगळ्या वाक्ययुध्दात खासदार संजय राऊत …
Read More »अतुल लोंढे यांचा सवाल, ‘२ दिवसात आरक्षण देतो’ म्हणणारे फडणवीस कोणत्या बिळात लपले? भाजपा इमानदार असेल तर आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवण्याचा संसदेत कायदा करा
मराठा आरक्षण प्रश्नी सर्वोच्च न्यायालयाने पुनर्विचार याचिका फेटळाल्याने शिंदे-फडणवीस सरकारने क्युरेटिव्ह पिटीशन दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. वास्तविक अशी कोणतीही याचिका दाखल करुन आरक्षण मिळणार नाही. मराठा समाजाला आरक्षणाला लाभ मिळण्यासाठी ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी लागेल आणि ही मर्यादा सर्वोच्च न्यायालयात नाही तर संसदेतून हटवली जाते. त्यामुळे भारतीय जनता पक्ष …
Read More »सत्यपाल मलिक यांच्या आरोपावर अमित शाहंनी सोडले मौन म्हणाले, पदावर असताना….. सत्तेत असताना विवेक जागा होत नाही
जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी नुकताच ‘द वायर’ला दिलेल्या मुलाखतीत जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती आणि पुलवामा हल्ल्याबाबत मोदी सरकारवर गंभीर आरोप केले होते. मोदी सरकारच्या बेजबाबदारपणामुळे पुलवामा हल्ला झाल्याचा आरोप केला. त्यांच्या या आरोपांनंतर देशाच्या राजकारणात खळबळ उडाली असताना याप्रश्नावर भाजपाचे अनेक बड्या नेत्यांनी गप्प राहणे पसंत केले. मात्र मलिकांच्या आरोपांना …
Read More »
Marathi e-Batmya