राजकारण

सतेज पाटील यांचे आव्हान; लांग घातली होती, तर कुस्ती खेळायची होती महाडिक गटाने आक्षेप घेताच, सतेज पाटील गटाचे २७ उमेदवार अपात्र

कोल्हापूरातील श्री छत्रपती राजाराम महाराज सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीतील रंगत आता चांगलीच वाढत चालली असून या निवडणुकीत काँग्रेस नेते सतेज पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. सत्ताधारी महाडिक गटाकडून पोटनियमातील तरतुदीनुसार २७ जणांवर हरकत घेतली होती. त्यांना आता अपात्र ठरवण्यात आलं आहे. यानंतर सतेज पाटील यांनी महाडिकांना थेट आव्हान देत …

Read More »

काँग्रेसचा गौप्यस्फोट, अदानी उद्योगात २० हजार कोटींची गुंतवणूक करणाऱ्यांमध्ये चीनी नागरिक अदानी घोटाळ्याची चौकशी संयुक्त संसदीय समितीकडून करण्यास मोदी सरकार का घाबरते ?: पवन खेरा

अदानी उद्योगसमुहात २० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक कोणाची? या गुंतवणुकीत चीनच्या एका नागरिकाचा समावेश आहे, तो चिनी नागरिक कोण? याची माहिती देशातील जनतेला झाली पाहिजे म्हणूनच राहुल गांधी यांनी हा मुद्दा उपस्थित केला आहे. अदानी घोटाळ्याचे ‘दूध का दूध व पाणी का पाणी’, करायचे असेल तर संयुक्त संसदीय समिती (JPC) …

Read More »

पर्यटन ठिकाणांच्या यादीत आता गोसीखुर्दचा समावेशः सामंजस्य कराराच्या निमित्ताने शिक्कामोर्तब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करारावर स्वाक्षरी

राज्यातील जलसंपदा प्रकल्पांच्या परिसरात पर्यटन विकासासाठी संधी असून या संधी विकसित करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. याचाच भाग म्हणून भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द प्रकल्पात जलपर्यटन विकास करण्यासाठी पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येईल, असे जलसंपदा मंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ …

Read More »

आता शिंदे-फडणवीस सरकारची सर्वसामान्यांसाठी ‘शासकिय योजनांची जंत्री’ शासकीय योजनांची जत्रा पोहचणार शेवटच्या व्यक्तीपर्यंत

सामान्य जनतेला शासकीय योजनांची माहिती, अर्ज केल्यावर लाभ कसा मिळतो, कुठे अर्ज करावा…कागदपत्रे काय जोडावीत…याची माहिती नसते. यामुळे काहीजण शासकीय योजनांपासून वंचित राहतात. याचा विचार करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शासकीय योजना गतिमान आणि शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘शासकीय योजनांची जत्रा’ हा उपक्रम राज्यभर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत आज …

Read More »

कर्नाटकचा निवडणूक रणसंग्राम जाहीरः एप्रिलमध्ये-मे महिन्यात सत्ताधाऱ्यांची परिक्षा आणि निकाल केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केला कार्यक्रम

मागील काही महिन्यांपासून कर्नाटकातील टीपू सुलतानचा वाद, हिजाब अनिवार्य करण्याचा आणि महाराष्ट्र आणि कर्नाटक दरम्यान असलेल्या सीमावादावरून चांगलेच रण माजल्याचे दिसून आले. त्यातच काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्या २०१९ सालच्या कोलार येथील एका वक्तव्याप्रकरणी गुजरातमधील सूरत न्यायालयाने सुनावली गेलेली शिक्षा आदी प्रकरणावरून कर्नाटकच्या निवडणूका कधीही जाहिर होऊ शकतात अशी …

Read More »

पुणे कॉस्मोपोलिटीयन शहराचे भाजपा खासदार गिरीश बापट यांनी घेतला अखेरचा श्वास सांस्कृतिक आणि आधुनिक वैचारिकतेशी नातं जोडणारा नेता म्हणून ओळख

महाराष्ट्राचे सांस्कृतिक आणि विद्रोही वैचारिकतेबरोबरच, कर्मठ विचारांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि या सगळ्या वैचारीक घुसळीणीशी एकाचवेळी समरस होणारे व अस्सल पुणेरी बाण्याचे भाजपाचे खासदार तथा माजी मंत्री गिरीश बापट यांचे वयाच्या ७२ व्या वर्षी आज सकाळी १०.३०च्या सुमारास प्रदिर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा, सून आणि …

Read More »

उच्च न्यायालयाच्या समन्सवर संजय राऊत यांचे तिरकस उत्तर, जनतेला हे माहित… न्यायालयात कायदेशीर उत्तर देऊ

सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या ४० आमदार आणि १० अपक्ष आमदारांना घेऊन जाण्यामागे नेमके कोणतं कारण आहे. यावरून बरीच चर्चा झडली. या दरम्यानच्या काळात राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या घराघरात पोहोचलेली ५० खोके… या घोषणेवरून शिंदे गटाने न्यायालयाचे दार ठोठावले. त्यावर ठाकरे गटाचे उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांना …

Read More »

महिलेच्या मृत्यूनंतर शिंदे सरकारला आली जाग, नागरिकांसाठी वेळा राखून ठेवण्याचे दिले आदेश सामान्य प्रशासन विभागाकडून सर्व अधिकारी-मंत्र्यांनाही केल्या सूचना

हिंदूत्ववादी आणि सावरकरवादी प्रेमात असलेल्या शिंदे-फडणवीस सरकारच्या व्यस्ततेमुळे काल तीन व्यक्तींनी मंत्रालयाच्या परिसरात येऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. यामध्ये एका अपंगाचा तर दोन महिलांचा समावेश होता. परंतु यातील एका महिलेचे आज उपचारा दरम्यान निधन झाल्याची माहिती बाहेर आली. त्यानंतर हिंदूत्ववादी आणि सावकरवादाच्या प्रेमात आखंड बुडालेल्या शिंदे-फडणवीस सरकारला अखेर काही काळासाठी का …

Read More »

लोकसभा हाऊस कमिटीच्या पत्राला राहुल गांधी यांनी ‘हे’ दिले खोचक उत्तर माझ्या अधिकाराबाबत कोणतीही गोष्ट आडवी न येता तुमच्या पत्रातील बाबींचे पालन करेल

सूरत न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर केंद्रातील मोदी सरकारने राहुल गांधी यांना कोणतीही संधी न देता लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आल्याचे आदेश जारी केले. त्यानंतर लगेच खासदारांसाठी असलेला बंगलाही रिक्त करण्याची नोटीस लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांना बजावली. या साऱ्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी आज पहिल्यांदाच लोकसभा हाऊस …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, …लक्ष हटवण्यासाठी भाजपाकडून सावरकरांचा मुद्दा महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भाजपाकडे उत्तर नाही

भारतीय जनता पक्षाकडे देशातील जनतेला भेडसावत असलेल्या ज्वलंत समस्यांवर कोणतेही उत्तर नाही. मोदी सरकार सर्वच आघाड्यांवर सपशेल अपयशी झालेले आहे. जनता महागाई, बेरोजगारीने त्रस्त आहे, त्यावर भाजपा उत्तर देऊ शकत नाही म्हणूनच जनतेच्या मुळ प्रश्नांवरून लक्ष हटवण्यासाठी भाजपाकडून सावरकरांचा मुद्दा पुढे करण्यात आलेला आहे, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले …

Read More »