राजकारण

सोमय्यांसह शिंदे गटावर निशाणा साधत संजय राऊत म्हणाले, चोरांना क्लिनचीट…सध्या ४० जणांच चोरमंडळ त्यासाठीच शिवगर्जना यात्रा सुरु केलीय

शिवसेनेतील फुटीच्या आणि राज्यातील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुनावणी सुरु आहे. त्यातच राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पिय अधिवेशन सुरु आहे. त्यातच ठाकरे गटाकडून सुरु करण्यात आलेल्या शिवगर्जना यात्रेच्या निमित्ताने खासदार संजय राऊत हे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी प्रसारमाध्यांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, शिंदे-भाजपा सरकारने तपास यंत्रणांच्या माध्यमातून किरीट सोमय्यांसारख्या २८ चोरांना …

Read More »

अजित पवार यांचा सवाल, एकाबाजूला एसटीच्या पगारासाठी पैसे नाहीत अन… अडीच दिवसांच्या दौऱ्यासाठी ४० कोटी रुपयांची उधळपट्टी का

दावोस येथील जागतिक गुंतवणूक परिषदेतील १९ कंपन्यांशी १ लाख ३७ हजार कोटी रुपये इतक्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार केल्याचा उल्लेख अभिभाषणात सरकारने केला आहे. मात्र यातील अनेक कंपन्या या महाराष्ट्रातल्याच आहेत. मग राज्यातील कंपन्यांशी करार करण्यासाठी दावोसला जाण्याची गरज काय, असा थेट सवाल उपस्थित करत ‘दावोस’च्या या अडीच दिवसांच्या दौऱ्यासाठी राज्याच्या …

Read More »

जितेंद्र आव्हाडांची मागणी, कुष्ठरुग्णांना अपंगत्वाच्या प्रमाणपत्रासह सरकारी नोकरीत आरक्षणही द्या मुख्यमंत्री शिंदेंकडून प्रमाणपत्रासाठी समिती स्थापन करण्याची घोषणा

कुष्ठरोगींना अपंगत्वाचे प्रमाणपत्र देण्यात यावे तसेच त्यांना सरकारी नोकरीत पाच टक्के आरक्षणही द्यावे अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे विधानसभेत केली. राज्यात एकाही कुष्ठरुग्णाला सरकारी नोकरी मिळालेली नाही हेसुध्दा त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. कुष्ठरोग झालेल्या व्यक्तींची बोटे झडतात. त्यांना अपंगत्व येते. त्यानंतरही त्यांना अपंगत्वाचे प्रमाणपत्र …

Read More »

मुख्यमंत्री शिंदेंचे आश्वासन, अंगणवाडी सेविकांच्या या मागण्या मान्य आश्वासनानंतर अंगणवाडी सेविका संघटनेकडून आंदोलन मागे

राज्यातील अंगणवाडी सेविकांना मानधनात १५०० रुपये वाढ तसेच अंगणवाडी सेविकांसाठी पेन्शन योजना तयार करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. विधानभवनात अंगणवाडी सेविकांच्या संघटनेबरोबर मुख्यमंत्र्यांची मंगळवारी बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी हे आश्वासन दिले आहे. मानधन वाढ, पेन्शन योजना लागू करावी यासह इतर मागण्यांसाठी राज्यातील अंगणवाडी सेविकांसह मदतनीस …

Read More »

शेकापचे माजी आमदार धैर्यशील पाटील यांचा भाजपामध्ये प्रवेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आदींच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

पेण ( जि. रायगड ) चे शेकाप चे माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी त्यांच्या असंख्य समर्थकांसह मंगळवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांचे स्वागत केले. याखेरीज शहादा (जि. नंदुरबार), परभणी, वसई विरार येथील काँग्रेस, अखिल भारतीय सेना या पक्षाच्या …

Read More »

आदित्य ठाकरे उभे राहताच मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ऐ खाली बस, काय कळत तुला… अजित पवारांनी उपस्थित केलेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उत्तर देताना शिंदेचा टोला

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना शेकडो टन कांदा बाजारात विकूनही २ रूपये मिळल्याचे आणि १ रूपया जास्तीचा भरावा लागल्याची घटना उघडकीस आली. तसेच कांद्याला भाव नसल्याने अनेक शेतकरी आपला कांदा रस्त्यावर टाकून देत आहेत. यापार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून विधानभवनात आणि दोन्ही सभागृहात शेतकऱ्यांचे प्रश्न आक्रमक पध्दतीने मांडत आहेत. अजित पवार यांनी विधानसभेत कांदासह …

Read More »

एकनाथ शिंदे यांच्या त्या पत्राचा संदर्भ देत ठाकरे गटाचा सर्वोच्च न्यायालयात दावा भरत गोगावले यांच्या प्रतोद निवडीलाच दिले आव्हान

मागील आठवड्यात महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सर्वोच्च न्यायालयात अर्धवट राहिलेली सुनावणी आज सोमवारी २८ तारखेपासून पुन्हा सुरु झाली. आज ठाकरे गटाकडून काही मुद्दे राहिले होते. त्यानुसार ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी घटनापीठासमोरील सुनावणीत एकनाथ शिंदे यांच्या एका पत्राचा संदर्भ दिला. तसेच या पत्राचा दाखल देत भरत गोगावले यांच्या प्रतोदच्या नियुक्तीला आव्हान …

Read More »

कांदा उत्पादक शेतकरी रस्त्यावर अजित पवारांच्या मागणीवर मुख्यमंत्री म्हणाले शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान रोखण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू असल्याचे आश्वासन

राज्यातला कांदा, कापूस, सोयाबीन, हरभरा, द्राक्ष उत्पादक शेतकरी प्रचंड अडचणीत आहेत. त्यांचा माल कवडीमोल दराने विकला जात आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांच्या या प्रश्नावर तातडीने सर्व कामकाज बाजूला ठेवून चर्चा करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात केली. कांदा उत्पादक शेतकऱ्याला तर दोन रुपये चेक दिल्याची बाब आम्ही सरकारच्या …

Read More »

कांदा, द्राक्षे, हरभरा, कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून ठाकरे गटाने कामकाज बंद पाडले शिंदे-फडणवीस सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नानी देणे घेणे नसल्याने प्रस्ताव चर्चेला येऊ दिला नसल्याचा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा आरोप

मागील काही दिवसांपासून कांदासह द्राक्षे, कापूस, हरभरा शेतकरी उत्पादनाच्या दरात मोठ्या प्रमाणावर घसरण होत आहे. त्यातच सोलापूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याला ८०० किलो कांदा विकून अवघ्या २ रूपयांचा चेक मिळाला तर दुसऱ्या एका शेतकऱ्याला खर्च वजा जाता एक रूपया जास्तीचा मोजावा लागला. यावरून कांदा उप्तादक, द्राक्षे, कापूस, हरभरा शेतकऱ्यांचे होणारे हे …

Read More »

सरकार प्रचारात व्यस्त, कांदा उत्पादक शेतकरी मात्र उध्वस्त… शेतकरी द्रोही सरकारचा निषेध असो गळ्यात कांद्याच्या आणि कापसाच्या माळा घालत महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक... जोरदार घोषणाबाजी...

सरकार प्रचारात व्यस्त, कांदा उत्पादक शेतकरी मात्र उध्वस्त… शेतकरी द्रोही सरकारचा निषेध असो… कांद्याला भाव मिळालाच पाहिजे… कापसाला भाव मिळालाच पाहिजे… हरभऱ्याला भाव मिळालाच पाहिजे… दोन रुपयाचा चेक देणार्‍या सरकारचा निषेध असो… शेतकऱ्यांची चेष्टा करणार्‍या सरकारचा निषेध असो… गद्दार सरकार जोमात, शेतकरी मात्र कोमात… कांदा, कापसाने रडवलं सरकारने कमावलं, वा …

Read More »