राजकारण

चंद्रकांत खैरे यांचा फडणवीसांना टोला, त्यांना जनता सांभाळता येत नाही फक्त… महाविकास आघाडीच्या मेळाव्यात विग्न आणण्याचा प्रयत्न

काल रात्री उशीरा छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन गटात मोठा राडा झाला. यामध्ये समाजकंटकांनी पोलिसांची आणि नागरिकांची वाहने जाळली. तसेच अनेक वाहनांवर आणि पोलिसांवर दगडफेक करण्याच्या घटनाही शहरातील किराडपुरा भागात घडली. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. याप्रकरणावरून ठाकरे गटाचे नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री …

Read More »

छत्रपती संभाजीनगरमधील राड्याप्रकरणी पोलिस आयुक्तांनी दिली ‘ही’ माहिती दोन गटातील किरकोळ भांडण

छत्रपती संभाजीनगरमधील किराडपुरा भागात काल रात्री दोन गटात तुफान राडा झाला. यावेळी पोलिसांच्या वाहनांसह अनेक खासगी गाड्यांची जाळपोळ करण्यात आली. तसेच काही ठिकाणी दगडफेक झाल्याचंही बघायला मिळालं. दरम्यान, येथील परिस्थिती आता नियंत्रणात असून काल रात्री नेमकं काय घडलं, याबाबत संभाजीनगरचे पोलिस आयुक्त निखील गुप्ता यांनी माहिती दिली. रात्री झालेल्या राड्यानंतर …

Read More »

नाना पटोले यांचा टीका,…शिंदे-फडणवीस सरकारच्या अब्रुची लक्तरे वेशीवर राज्यातील ‘नपुंसक’ ईडी सरकारने तात्काळ राजीनामा द्यावा

राज्यातील भाजपाप्रणित शिंदे सरकारच्या ९ महिन्यातील कारभाराने महाराष्ट्राच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे. काही संघटनांच्या भडकाऊ भाषणांनी राज्यात धार्मिक वाद वाढत आहेत पण शिंदे-फडणवीस सरकार त्यावर काहीच कारवाई करत नाही. सर्वोच्च न्यायालयाने तर महाराष्ट्र सरकार नपुंसक आहे, ते काहीच करत नाही म्हणून धार्मिक वाद विकोपाला जात आहेत असा संताप व्यक्त …

Read More »

त्या टीपण्णीनंतर संजय राऊत यांची टीका, या सरकारची पत काय? बिनकामाचं आणि नपुसंक सरकार मी नाही तर आता न्यायालय आणि जनताही म्हणतेय

मागील काही दिवसात राज्यात मुंबईसह ठिकठिकाणी हिंदू जनआक्रोश मोर्चा काढत एका विशिष्ट जनसमुदायाच्या विरोधात वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न झाला. या पार्श्वभूमीवर नुकतीच सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर घेण्यात आलेल्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकार हे नपुंसकासारख वागतंय, वेळेवर पाऊले उचलत नसल्याची टीपण्णी केली. या टीपण्णीवरून ठाकरे गटाचे खासदार …

Read More »

राहुल गांधी यांच्यावरील कारवाईवरून आता अमेरिकेपाठोपाठ, जर्मनीही म्हणाली,.. लक्ष आहे केंद्र सरकारच्या निर्णयावर तिखट प्रतिक्रिया

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरील मानहानीचा खटला, त्यानंतर न्यायालयाने सुनावलेली शिक्षा आणि राहुल गांधी यांची रद्द झालेली खासदारकी यावरून आता देशातलं राजकारण चांगलंच तापलेले असून या केंद्र सरकारने केलेल्या या कारवाईवरून काँग्रेससह अनेक राजकिय पक्षांकडून केंद्रातील भाजपा सरकारवर टीकेची झोड उठविण्यास सुरुवात झाली आहे. तर दुसऱ्याबाजूला भाजपाचे नेते आणि राष्ट्रीय …

Read More »

सतेज पाटील यांचे आव्हान; लांग घातली होती, तर कुस्ती खेळायची होती महाडिक गटाने आक्षेप घेताच, सतेज पाटील गटाचे २७ उमेदवार अपात्र

कोल्हापूरातील श्री छत्रपती राजाराम महाराज सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीतील रंगत आता चांगलीच वाढत चालली असून या निवडणुकीत काँग्रेस नेते सतेज पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. सत्ताधारी महाडिक गटाकडून पोटनियमातील तरतुदीनुसार २७ जणांवर हरकत घेतली होती. त्यांना आता अपात्र ठरवण्यात आलं आहे. यानंतर सतेज पाटील यांनी महाडिकांना थेट आव्हान देत …

Read More »

काँग्रेसचा गौप्यस्फोट, अदानी उद्योगात २० हजार कोटींची गुंतवणूक करणाऱ्यांमध्ये चीनी नागरिक अदानी घोटाळ्याची चौकशी संयुक्त संसदीय समितीकडून करण्यास मोदी सरकार का घाबरते ?: पवन खेरा

अदानी उद्योगसमुहात २० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक कोणाची? या गुंतवणुकीत चीनच्या एका नागरिकाचा समावेश आहे, तो चिनी नागरिक कोण? याची माहिती देशातील जनतेला झाली पाहिजे म्हणूनच राहुल गांधी यांनी हा मुद्दा उपस्थित केला आहे. अदानी घोटाळ्याचे ‘दूध का दूध व पाणी का पाणी’, करायचे असेल तर संयुक्त संसदीय समिती (JPC) …

Read More »

पर्यटन ठिकाणांच्या यादीत आता गोसीखुर्दचा समावेशः सामंजस्य कराराच्या निमित्ताने शिक्कामोर्तब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करारावर स्वाक्षरी

राज्यातील जलसंपदा प्रकल्पांच्या परिसरात पर्यटन विकासासाठी संधी असून या संधी विकसित करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. याचाच भाग म्हणून भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द प्रकल्पात जलपर्यटन विकास करण्यासाठी पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येईल, असे जलसंपदा मंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ …

Read More »

आता शिंदे-फडणवीस सरकारची सर्वसामान्यांसाठी ‘शासकिय योजनांची जंत्री’ शासकीय योजनांची जत्रा पोहचणार शेवटच्या व्यक्तीपर्यंत

सामान्य जनतेला शासकीय योजनांची माहिती, अर्ज केल्यावर लाभ कसा मिळतो, कुठे अर्ज करावा…कागदपत्रे काय जोडावीत…याची माहिती नसते. यामुळे काहीजण शासकीय योजनांपासून वंचित राहतात. याचा विचार करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शासकीय योजना गतिमान आणि शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘शासकीय योजनांची जत्रा’ हा उपक्रम राज्यभर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत आज …

Read More »

कर्नाटकचा निवडणूक रणसंग्राम जाहीरः एप्रिलमध्ये-मे महिन्यात सत्ताधाऱ्यांची परिक्षा आणि निकाल केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केला कार्यक्रम

मागील काही महिन्यांपासून कर्नाटकातील टीपू सुलतानचा वाद, हिजाब अनिवार्य करण्याचा आणि महाराष्ट्र आणि कर्नाटक दरम्यान असलेल्या सीमावादावरून चांगलेच रण माजल्याचे दिसून आले. त्यातच काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्या २०१९ सालच्या कोलार येथील एका वक्तव्याप्रकरणी गुजरातमधील सूरत न्यायालयाने सुनावली गेलेली शिक्षा आदी प्रकरणावरून कर्नाटकच्या निवडणूका कधीही जाहिर होऊ शकतात अशी …

Read More »