राजकारण

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे महत्वाचे निर्णय बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कोल्हापूरमध्ये होणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम विकासवाडी येथील १२ हेक्टर ७६ आर जमीन देणार कोल्हापूर जिल्ह्यातील मौजे विकासवाडी (ता. करवीर) येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडीयम उभारणी करण्यासाठी १२ हेक्टर ७६ आर इतकी शासकीय जमीन विनामुल्य देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. शालेय शिक्षण व …

Read More »

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारी पासून अर्थसंकल्प ६ मार्च रोजी सांसदीय कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय

राज्य विधिमंडळाचे मुंबईत होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज सोमवार, २३ फेब्रुवारी ते बुधवार, २५ मार्च २०२६ पर्यत निश्चित करण्यात आले आहे. ६ मार्च रोजी अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे, असा निर्णय कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात  आला. विधानभवन येथे विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. बैठकीला विधान परिषद सभापती प्रा.राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री …

Read More »

प्रताप सरनाईक यांचे निर्देश, राज्यभर अवजड वाहनांवर धडक तपासणी मोहीम राबवा अपघात रोखण्यासाठी परिवहन आणि पोलिसांना दिले कडक निर्देश

मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावरील आडोशी बोगद्याजवळ घडलेल्या भीषण अपघाताच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील अवजड वाहनांवर व्यापक आणि पारदर्शक तपासणी मोहीम राबवण्याचे आदेश प्रताप सरनाईक यांनी दिले. मंत्रालयात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत मोटार परिवहन व पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी स्पष्ट शब्दांत सूचित केले.अपघात रोखायचे असतील तर नियमांची केवळ अंमलबजावणी नव्हे, तर जागरूकतेची चळवळ उभी राहिली …

Read More »

सिंचन प्रकल्पांसाठी साडेसात हजार कोटींचे कर्जास मंत्रिमंडळाची मान्यता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

राज्यातील अपूर्ण ५७ सिंचन प्रकल्प पूर्ण करणे, कालवे आणि वितरण प्रणालीमध्ये सुधारणा करण्यासाठी नाबार्डकडून साडेसात  हजार कोटी रुपयांचे कर्ज घेण्यास मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. कर्ज उपलब्ध होऊन प्रत्यक्ष कामे मार्गी लागल्यास  राज्यात आठ लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. राज्यात  बांधकाम सुरू असलेले जलसिंचन प्रकल्प पूर्ण  करण्यासाठी …

Read More »

उपमुख्यमंत्री पदाचा पदभार सुनेत्रा अजित पवार यांनी आज स्वीकारला अजित पवार यांच्या प्रतिमेला अभिवादन करताना भावूक...

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज मंत्रालयात पदभार स्वीकारला. त्या अगोदर सकाळी आपल्या पक्षाच्या नेत्यांसह सिध्दीविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर चैत्यभूमीवर जाऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना नतमस्तक झाल्या. सिध्दीविनायक मंदिर आणि चैत्यभूमीवर गेल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात जाऊन दादांच्या …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाचा निर्णयः तिसऱ्या मुंबईसाठी भूसंपादन–भूवाटप धोरणास मान्यता एमएमआर क्षेत्रात नियोजित शहरीकरण आणि गुंतवणुकीला गती

नवी मुंबईच्या शेजारी उभ्या राहणाऱ्या  तिसऱ्या मुंबईसाठी अर्थात अटलबिहारी वाजपेयी शिवडी–न्हावा शेवा अटल सेतू (मुंबई पारबंदर प्रकल्प) प्रभाव क्षेत्रासाठी नियुक्त ‘नवनगर विकास प्राधिकरण’  तसेच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत भविष्यात राबविण्यात येणाऱ्या सर्व विकास प्रकल्पांसाठी भूसंपादन आणि  भूवाटपाबाबतच्या सर्वसमावेशक धोरणास मंगळवारी झालेल्या राज्य  मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या निर्णयामुळे …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, शिवसेना (उबाठा) च्या भुमिकेप्रमाणे परभणीत काँग्रेसने वागायचे का? चंद्रपूर महापौर निवडणुकीबाबत निरीक्षकाकडून अहवाल मागवणार

चंद्रपुरमध्ये महापौरपदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने घोडेबाजार करून विजय मिळवला आहे. काँग्रेस पक्षाकडे ३१ सदस्य आहेत. शिवसेना (उबाठा) महाविकास आघाडी व इंडिया आघाडीतील पक्ष असल्याने काँग्रेसला पाठिंबा द्यायला हवा होता पण त्यांनी भाजपाला पाठिंबा दिला तर एमआयएमने तटस्थ राहून भाजपला मदत केली. आमचा नवा मित्र पक्ष वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक …

Read More »

चंद्रपूरात भाजपाच्या महापौराला शिवसेना उबाठाचा पाठिंबा भाजपाशी अगदी शेवटच्या क्षणी शिवसेना उबाठाने केली युती

राज्यात आणि देशात भाजपाच्या घंटा बडवणारे हिंदूत्ववादावरून आणि राजकिय हेवेदाव्यातून शिवसेना उबाठा आणि भाजपाची २५ वर्षाची युती तुटली. त्यानंतर भाजपा आणि शिवसेना उबाठा या दोघांमध्ये टोकाचा संघर्ष निर्माण झाला. मात्र चंद्रपूर महापालिकेत काँग्रेस पक्षातच सत्तेपूर्वीच दोन गटात संघर्ष सुरु झाला. त्यामुळे भाजपाने या संधीचा फायदा घेत थेट शिवसेना उबाठाशी आणि …

Read More »

अजित पवार यांच्या प्लेन क्रॅशवरून रोहित पवार यांचा गौप्यस्फोट, विमान आधी गुजरातला गेलेले ऐनवेळी दोन्ही पायलटची अदला बदली, शेवटच्या काही सेंकद मुख्य पायलट शांत होता

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील मृत्यूच्या घटनेला आज तेरा दिवस झाले. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या जाहिर केल्या प्रमाणे आज पत्रकार परिषद घेत या विमान अपघाताचा घटनाक्रम सांगत अजित पवार यांना बारामतीला घेऊन येणारे विमान आधी गुजरातला गेले होते असे सांगत या …

Read More »

राज ठाकरे यांचा मोहन भागवत यांना टोला, गुजरातमध्ये समरसतेचे धडे का नाही दिलेत? आजवर का कोणी असल्या रटाळ प्रवचनांना आले नाहीत ?

८ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबईतल्या एका कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांनी, भाषेबद्दल आग्रही राहणे, त्यासाठी वेळेस आंदोलन करणे हा एक आजार आहे अशा आशयाचं विधान केलं.  या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांना बोलावण्यात आले होते, त्यातले काही हजर देखील होते ! परंतु मोहनराव भागवतांना एक गोष्ट सांगू इच्छितो की ती सर्व …

Read More »