राजकारण

प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपती भवनातील ‘अॅट होम’ सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील चार जणांना आमंत्रण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्याकडून निमंत्रण

भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रपती भवनात आयोजित होणाऱ्या अत्यंत प्रतिष्ठित ‘अॅट होम’ स्वागत समारंभासाठी महाराष्ट्रातील चार मान्यवरांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या वतीने रायगड जिल्ह्यातील सगुणा बागचे चंद्रशेखर भडसावळे, नांदेडचे सर्पदंश तज्ज्ञ डॉ. दिलीप पुंडे, जळगावचे अरविंद गुलाब चौधरी आणि मुंबईचे स्टार्टअप उद्योजक आकाश शहा यांना …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सुशासन, विकास आणि पारदर्शकतेचा विजय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपा प्रदेश कार्यालयात विजयोत्सव साजरा

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात झालेल्या महापालिका निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी सर्वाधिक जागा जिंकत क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे. भाजपा-महायुतीच्या विकास, सुशासन आणि पारदर्शक कारभाराला मुंबई आणि इतर महापालिका क्षेत्रातील जनतेने स्पष्ट कौल दिल्याबद्दल मतदारांचे आभार मानतो, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केले. भाजपा प्रदेश कार्यालयात साज-या झालेल्या विजयोत्सवावेळी मुख्यमंत्री …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, भाजपा महायुतीच्या विजयात बोगस मतदान, फिक्सिंग काँग्रेसचे पाच शहरात महापौर तर ३५० नगरसेवक; १० ठिकाणी सत्तेत सहभागी होऊ

महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मिळालेले यश समाधानकारक नसले तरी यश अपयशाची पर्वा न करता आम्ही वैचारिक लढाई लढलो. जनतेचा विश्वास व कार्यकर्त्यांचा निर्धाराचा लढा या जोरावर काँग्रेस पक्ष राज्यातील सर्वात मोठा विरोधी पक्षाच्या भूमिकेत दिसत आहे. पाच शहरात काँग्रेसचा महापौर तर ३५० नगरसेवक आणि १० ठिकाणी सत्तेत सहभागी होऊ असे …

Read More »

महायुतीला बहुमत मिळाल्याबद्दल रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे केले अभिनंदन राज्यभरातील २९ महानगरपालिकांमध्ये भाजपा अव्वल

अत्यंत प्रतिष्ठेची निवडणुक ठरलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजप शिवसेना रिपाइं महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्याबद्दल रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज वर्षा बंगल्यावर भेट घेवून हार्दिक अभिनंदन केले. राज्यातील २९ महापालिकांपैकी २६ महापालिकांमध्ये महायुतीला बहुमत मिळाल्याबद्दल रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र …

Read More »

मुंबईत ठाकरे बंधूंना, तर पुण्यात पवार काका-पुतण्याला भाजपाचा धक्का काटे की टक्कर देत मुंबई आणि पुण्यात भाजपाने सत्तेची दारं स्वतःसाठी उघडली

साधारणतः आठ ते नऊ वर्षानंतर अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणूका पार पडल्या. या निवडणूकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने १५ जानेवारी रोजी मतदान घेतले. त्यानंतर आज या सर्व निवडणूकांचे निकाल आज जाहिर होत आहेत. मागील १० ते १५ वर्षापासून मुंबई महापालिकेची सत्ता ताब्यात घेण्यासाठी जंगजंग पछाडणाऱ्या भाजपाला अखेर यश …

Read More »

राज्यातील २९ महापालिकांमध्ये दुपारी ३.३० पर्यंत ४१ टक्के मतदानः राहिलेली टक्केवारी उद्या उर्वरित वेळेतील मतदानाची टक्केवारी उद्या जाहिर होण्याची शक्यता

राज्यातील मुंबई महापालिकेसह २९ विविध महापालिकांसाठी आज ७ ते ८ वर्षानंतर मतदान पार पडले. मात्र ज्या पद्धतीने केंद्रीय निवडणूक आयोगाकडून लोकसभा आणि विधानसभेसाठी मतदान पार पडून दोन दोन दिवस मतांची अंतिम टक्केवारी काही केल्या जाहिर केली जात नव्हती. त्यामुळे विधानसभा निवडणूकीवेळी भाजपाला मिळालेल्या मतांच्या टक्केवारवरून संशय व्यक्त करण्यात आला. आता …

Read More »

मुंबईचा महापौर कोणाचा महायुती की ठाकरे बंधूंचा? एक्झिट पोल्स काय म्हणतात १३० जागा महायुतीला मिळणार असल्याचा दावा

बहुतेक एक्झिट पोलनुसार, भाजपा-शिवसेना युती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) या प्रतिष्ठेच्या लढाईत विजय मिळवण्याची शक्यता आहे. आशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिकेत ही युती १३० पेक्षा जास्त जागा जिंकेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ॲक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलने भाजप-शिवसेना युतीला १३१-१५१ जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे, तर जेव्हीसीने या युतीसाठी १३८ …

Read More »

टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच अभिरक्षा कक्षातून बाहेर काढणार राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार कारवाई होणार

बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ – २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी – २१ (प्रभाग क्रमांक २०० ते २०६) यांनी टपाली मतपत्रिकांबाबत ८ जानेवारी २०२६ रोजी सर्व उमेदवारांना पाठविलेले पत्र अनावधानाने प्रसारित झाले होते. पत्र तात्काळ मागे घेण्यात आले असून त्याऐवजी सुधारित पत्र निर्गमित करण्यात आले आहे. त्यानुसार, गुरुवार, १५ जानेवारी …

Read More »

शाई पुसून गैरकृत्य करणाऱ्यास पुन्हा मतदान करता येणे शक्य नाही राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची स्पष्टोक्ती

बोटावर लावण्यात आलेली शाई पुसण्याचा प्रयत्न करून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करणे हे गैरकृत्य आहे. त्याचबरोबर बोटावरची शाई पुसून एखादी व्यक्ती पुन्हा मतदान करण्यासाठी आल्याचे आढळल्यास त्यावर योग्य ती कायदेशीर कार्यवाही केली जाईल, असे स्पष्टिकरण राज्य निवडणूक आयोगाने केले आहे. बोटावरची शाई पुसून कोणी गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केला तरी …

Read More »

महानगरपालिका मतदानावेळी गोंधळात गोंधळ, नावे गायब, शाई पुसली जाण्याचा प्रकार नवा विरोधकांकडून गोंधळावर भाष्य करताच, सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांची खिल्ली

जवळपास ७ वर्षानंतर राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी निवडणूकीसाठी आज मतदानाची प्रक्रिया पार पडत होती. मात्र राज्यातील अनेक निवडणूक केंद्रावर भल्या सकाळीच ईव्हीएम मशिन्स बंद पडल्या त्यामुळे उशिराने मतदानाची प्रक्रिया सुरु झाली. यामध्ये मुंबईतील मतदान केंद्रांपासून ते विदर्भातील काही मतदान केंद्रापर्यंत अशा घटना घडल्याचे पाह्यला मिळाले. तसेच अनेक ठिकाणी मतदारांची नावे दरवेळीच्या …

Read More »