राजकारण

एकनाथ शिंदे यांचे निर्देश अधिछात्रवृत्ती आणि शिष्यवृतीची दहा दिवसात जाहिरात प्रसिद्ध करा उच्च व तंत्रशिक्षण विभागामार्फत नियुक्त समितीने तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश

राज्यातील बार्टी, टीआरटीआय, सारथी, महाज्योती, अमृत, आर्टी या स्वायत्त संस्थांमार्फत देण्यात येणाऱ्या अधिछात्रवृत्ती, शिष्यवृत्तीचा लाभ मिळवण्याबाबत मार्गदर्शक तत्वे निश्चित करण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने समिती नियुक्त केली आहे. या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर दहा दिवसात जाहिरात प्रसिद्ध करण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. या स्वायस्त संस्थांमध्ये …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन, शेतकऱ्यांना ११ हजार कोटींचे पंधरा दिवसांत वितरण आतापर्यंत आठ हजार कोटी वितरीत, मंत्रिमंडळ बैठकीनंतर दिली माहिती

राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी जवळपास ३२ हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. यात आतापर्यंत ८ हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय वितरित करण्यात आले असून, याचा लाभ ४० लाख शेतकऱ्यांना होतो आहे. आणखी ११ हजार कोटी रुपये वितरित करण्यास आज मंत्रिमंडळ बैठकीत विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही फसवेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेते व पदाधिकाऱ्यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश

अतिवृष्टी व महापूरामुळे झालेल्या नुकसानीपोटी महायुती सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. सरकारने जाहीर केलेले ३२ हजार कोटी रुपयांचे पॅकेज हे फसवे आहे त्याचप्रमाणे आज मंत्रिमंडळ बैठकीत ११ हजार कोटी रुपयांच्या वितरणाला दिलेली मान्यताही फसवीच आहे. महायुती सरकार शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत असून हेक्टरी सरसकच ५० हजार रुपये दिले पाहिजे याचा …

Read More »

प्रशांत किशोर यांना निवडणूक आयोगाची नोटीस बिहार निवडणूकीच्या रणधुमाळीत आयोगाची नोटीस ३ दिवसात उत्तर देण्याची मुदत

बिहार विधानसभा निवडणूकीची एकाबाजूला रणधुमाळी सुरु असताना आणि प्रत्येक राजकीय पक्षांकडून तशी जोराची तयारी करण्यात येत आहे. मात्र जनसुराज्य पक्षाचे सर्वेसर्वा प्रशांत किशोर हे दोन राज्यांचे मतदार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे बिहार मध्ये खळबळ उडाली आहे. प्रशांत किशार हे दोन राज्यांचे मतदार असल्याच्या दाव्यानंतर विरोधकांनी जोरदार टीका सुरु केली. त्यानंतर …

Read More »

उद्धव ठाकरे यांची निवडणूक आयुक्तांना इशारा, गुन्हा दाखल झाला पाहिजे, सजा झाली पाहिजे निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवरून केली टीका

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात निवडणूक विषयक राजकारणाला गती आली आहे. मुंबईतील वरळीतील डोम मध्ये शिवसेना उबाठा गटाच्या वतीने निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्यावरही टीका केली. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी देशातील आणि राज्यातील मतदार …

Read More »

शंभूराज देसाई म्हणाले की, माथेरान येथे ई रिक्षा सुरु करण्याची कार्यवाही गतीने करा माथेरान मधील समस्या आणि सुविधांबाबत घेतला आढावा

माथेरान येथील पर्यटन विषयक पायाभूत सुविधांची कामे स्थानिक प्रशासनाने गतीने करावीत. सर्वोच्च न्यायालयाने माथेरान येथे ई- रिक्षा सुरू करण्याबाबतचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार माथेरान येथे पर्यटन वाढीच्या दृष्टीकोनातून ई-रिक्षा सुरू करण्यासाठीची कार्यवाही गतीने करण्याच्या सूचना पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या. सह्याद्री अतिथीगृह येथे माथेरान येथील पर्यटन विषयक पायाभूत सुविधा व …

Read More »

सचिन सावंत यांचा टोला, केस सीबीआयकडे देण्यास धर्मवीर-२ सरकारला तीन वर्षे का लागली ? अभिनेता सुशांतसिंह प्रकरणाच्या चौकशीला सीबीआयला ५ वर्षे लागली; पालघर साधू प्रकरणाला किती वर्षे लागणार?

भाजपा सरकारने सीबीआय सारख्या केंद्रीय तपास यंत्रणांचा केवळ आपल्या राजकीय फायद्यासाठी गैरवापर केला आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूत व पालघर साधू प्रकरणात मविआ सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न भाजपाने केला. सुशांतसिंह प्रकरणाची चौकशी करण्यास सीबीआयला ५ वर्षे लागली आता पालघर साधू प्रकरणाला किती वर्षे लागणार, असा प्रश्न उपस्थित करून पालघर साधूंची केस …

Read More »

अमित शाह यांची ग्वाही, नवीन सागरी इतिहास घडवण्यासाठी भारत सज्ज ‘इंडिया मेरीटाईम वीक - २०२५’ चे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई हे भारताच्या सागरी क्षेतातील महत्वाचे स्थान असून ‘इंडिया मेरीटाईम वीक- २०२५’ च्या निमित्ताने मुंबईमध्ये भारत नवीन सागरी इतिहास घडवण्यासाठी सज्ज असल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले. तर मुंबई ही देशाच्या सागरी शक्तीचा केंद्रबिंदू असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. यावेळी नेस्को, गोरेगाव येथे आयोजित ‘इंडिया मेरीटाईम …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, मुख्यमंत्री फडणवीसांनी केलेली टीका राजधर्माला शोभत नाही फलटणची घटना राजकारणाचा विषय नाही तर महिला सुरक्षेची म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी फलटणच्या महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी ज्या संवेदना व्यक्त केल्या आहेत, तेवढ्या सर्वांच्या मनात असल्या पाहिजेत. राहुल गांधी यांनी व्यक्त केलेल्या भावना योग्यच आहेत. हा राजकारणाचा विषय नसून महिला सुरक्षेचा विषय आहे, त्याअनुषंगाने राहुल गांधी यांचे ट्विट मार्गदर्शक म्हणून पहावे असे प्रतिपादन करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी …

Read More »

एकनाथ शिंदे यांची स्पष्टोक्ती, धंगेकर- मोहोळ हा विषय आता संपला, महायुतीमध्ये मतभेद नको आळंदीमध्ये वारकऱ्यांसाठी उत्कृष्ट सुविधा उभारल्या जातील

कार्तिकी एकादशी आणि त्यानिमित्त होणाऱ्या वारीदरम्यान आळंदीत लाखो वारकरी येतात. या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांसाठी उत्कृष्ट सुविधा उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, त्या दर्जेदार असतील, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.आळंदीतील भक्तनिवास, घाट विकास कामांचे भूमिपूजन आणि रुग्ण तपासणी केंद्राचे उद्घाटन शिंदे यांच्या हस्ते पार पडले. त्यानंतर पत्रकारांशी बोलत होते. यावेळी एकनाथ …

Read More »