राजकारण

भाजपा आणि काँग्रेस कार्यकर्त्यांच्या राड्यात ९ जण जखमी काँग्रेसचे ३, भाजपा २,कार्यकर्त्ये जखमी आणि दोन पोलिस व दोन पत्रकार जखमी

छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना टिपू सुलतानशी करण्‍याच्‍या काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या विधानाविरोधात पुण्यात भाजपा कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना भिडले. रविवारी (१५ फेब्रुवारी २०२६) आंदोलनादरम्यान दगडफेकीचा आरोप विरोधी पक्षाने केला. सह पोलिस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी पत्रकारांना सांगितले की, या हाणामारीत तीन काँग्रेस कार्यकर्ते, दोन भाजपा कार्यकर्ते, दोन पोलिस …

Read More »

डॉ श्रीकांत शिंदे यांचे थेट आव्हान, खुमखुमी असेल तर लोकसभेत आमच्यासमोर या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील टीकेनंतर दिले आव्हान

“जर एवढीच खुमखुमी असेल तर पुढील लोकसभा निवडणुकीत कल्याण लोकसभा, ठाणे लोकसभा किंवा हवे त्या मतदारसंघातून आमच्यासमोर येऊन निवडणूक लढवावी.” असे थेट आव्हान खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी मंत्री गणेश नाईक यांना दिले. गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्यावर केलेल्या आरोपांनंतर अंबरनाथमध्ये माध्यमांशी बोलताना …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, निवडणुकीत भाजपाच्या पोस्टर्स, बॅनर्सवर टिपू सुलतानचा फोटो कसा चालतो? सावरकर व कोश्यारींनी केलेल्या वक्तव्याबदद्ल भाजपा त्यांचे पुतळे कधी जाळणार?

छत्रपती शिवाजी महाराज हे आपले दैवत आहेत, आन, बान, शान आहेत, त्यांचा पराक्रम अद्वितीय आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या प्रेरणेतून संविधानाची निर्मिती झाली आहे. भाजपकडून आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज शिकण्याची गरज नाही. एपस्टिन फाईल्समध्ये भाजपाच्या नेत्यांची नावे आली आहेत, अमेरिकेबरोबरचा व्यापार कराराचा मुद्दा आहे आणि राज्यातही …

Read More »

पुण्यात टीपू सुलतानवरून काँग्रेस-भाजपाचे कार्यकर्त्ये आमने-सामने भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून राज्यभर निदर्शने

महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावर असताना भगतसिंग कोश्यारी यांनी छ्त्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु म्हणून समर्थ रामदासाचे नाव घेतले, तसेच शिवाजी महाराज हे जून्या काळातील आदर्श होते, अशी विधाने करत मुंबईच्या उभारणीत बिगर मराठी लोकांचे योगदान जास्त असल्याचे वक्तव्य केले होते. त्यावेळी राज्यातील भाजपाने भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात कोणतीच भूमिका घेतली नाही. …

Read More »

‘नरेगा’ अंतर्गत मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद रस्त्यांना मोठा दिलासा रोहयो मंत्री भरत गोगावले यांची माहिती

ग्रामीण भागातील शेतमाल वाहतूक अधिक सुलभ आणि सुरक्षित करण्यासाठी ‘नरेगा’ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘मातोश्री ग्रामसमृद्धी’ पाणंद रस्ता कामांवर असलेली ‘दहा कामांची मर्यादा’ आता लवकरच हटवण्यात येणार आहे. केंद्र सरकारने या प्रस्तावाला तत्त्वतः मंजुरी दिली असून, यामुळे कामांना गती मिळणार असल्याचे रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांनी सांगितले. राज्यात मागील काही …

Read More »

शशिकांत शिंदे यांची खंत, चर्चा करणाराच नेता आता राहिलेला नाही, चर्चा करण्यात अर्थ नाही दोन्ही राष्ट्रवादीच्या विलनीकरणावर प्रदेशाध्यक्ष शिंदे यांचे मत

विलीनीकरणाच्या चर्चेवर ज्यांनी आक्षेप घेतला त्यांना विचारलं पाहिजे. आम्ही भावना व्यक्त केली. अनेकांनी भावना व्यक्त केली. निवडणूक झाल्यानंतर यावर अंतिम निर्णय घेतला जाणार होता. विलीकरणाचं सूत्र कसं असेल याबाबत चर्चेत ठरवलं जाणार होतं. चर्चा करणाराच नेता आता राहिलेला नाही, त्यामुळे आम्ही जर-तर वर चर्चा करण्यात अर्थ नाही. आता यावर आम्हाला …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, मेट्रो स्लॅब दुर्घटनेची जबाबदारी विकास पुरुष देवेंद्र फडणवीसांनी घ्यावी महायुती सरकारमध्ये भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणावर

वडाळा-कासारवडवली मुंबई मेट्रो- ४ या ग्रीन लाइनवरील मुलुंड मधील एलबीएस रोडवर बांधकाम सुरू असलेल्या मेट्रोचा स्लॅब कोसळल्याच्या घटनने भाजपाच्या विकासाची पोलखोल केली आहे. मुलुंडच्या घटनेत एकाचा मृत्यू तर तीनजण गंभीर जखमी झाले आहेत. युती सरकारमध्ये सर्वत्र भ्रष्टाचार सुरु असून स्लॅब कोसळण्याची घटना निकृष्ट बांधकामाचे उदाहरण आहे. तथाकथीत विकास पुरुष मुख्यमंत्री …

Read More »

अनिल देशमुख यांची टीका, परमबीर सिंगाच्या “पापाचा घडा” भरला लीलावती रूग्णालय़ाने अपमानास्पदरित्या बदतर्फ केल्याने त्यांचे चारित्र्य जनतेसमोर

ज्या परमबीर सिंग याने मी गृहमंत्री असतांना माझ्यावर खोटे आरोप करून मला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले होते, त्याच पममबीर सिंगाचे भ्रष्टाचारी कारनामे आता एकामागून एक समोर येत आहेत. मुंबईतील प्रख्यात लीलावती रुग्णालयाने त्याला ज्या पद्धतीने अपमानास्पद रित्या बडतर्फ केले आहे, त्यावरून त्यांचे चारित्र्य आता महाराष्ट्राच्या जनतेसमोर उघडे पडले आहे. त्याच्या …

Read More »

अंतराळ संशोधन क्षेत्रात ग्रामीण विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी इस्रो विज्ञान सहल विज्ञान प्रेरणा अभियानांतर्गत ‘विजाभज’ आश्रमशाळेतील १०० विद्यार्थी सहलीत सहभागी होणार

इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या “विज्ञान प्रेरणा अभियान” अंतर्गत विजाभज आश्रमशाळांमधील १०० गुणवंत विद्यार्थ्यांना भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) येथे विशेष शैक्षणिक विज्ञान सहलीचे १५ ते २० फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आयोजन करण्यात आल्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी सांगितले. मंत्री अतुल सावे म्हणाले, ग्रामीण व वंचित …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन, तंत्रज्ञान, उत्पादन आणि सेवा उद्योगासाठी वाकायामा प्रांताशी सहकार्य जपानच्या वाकायामाचे राज्यपाल मियाझाकी इजुमी यांच्या भेटी दरम्यान दिले आश्वासन

महाराष्ट्र आणि जपानच्या वाकायामा प्रांतामधील संबंध मैत्रीपूर्ण आहेत. तंत्रज्ञान, उत्पादन आणि सेवा उद्योग क्षेत्रात सहकार्य अधिक वाढवून हे संबंध येणाऱ्या काळात अधिक दृढ करण्यात येतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. जपानसोबतचे आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध अधिक मजबूत करण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला. जपानच्या वाकायामा प्रांताचे राज्यपाल मियाझाकी इजुमी यांनी जपानच्या …

Read More »