राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाने जनतेला काय दिले तर ‘राजा उदार झाला आणि हाती भोपाळा दिला’, असेच म्हणावे लागेल. राज्यात गुन्हेगारी वाढली आहे, महिला सुरक्षित नाहीत, ड्रग्जचा सुळसुळाट जोरात सुरु आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, कर्जमाफी, पीकविमा, बेरोजगारी यातील एकाही प्रश्नावर ना सविस्तर चर्चा झाली ना काही निर्णय. हे अधिवेशन लक्षात राहिल …
Read More »विजय वडेट्टीवार यांची टीका, महाराष्ट्र २० टक्के कमिशनचे राज्य झाले काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची अंतिम आठवडा प्रस्तावात सरकारवर टीका
पुण्यात कोयत्या गँगने धुमाकुळ घातला होता, पण दुसरीकडे सत्ताधाऱ्यांची टॉवेल बनियन गँग आता कार्यरत झाली आहे. त्यांच्या मनासारखे नाही झाले की ते ठोसे देतात. जेवण चांगले मिळाले नाही म्हणून मारहाण केली असेच गळकी एसटी बघून परिवहन मंत्र्यांचे काय करायचं? निकृष्ट बांधकाम करणाऱ्या मंत्र्यांचे, दवाखान्यात औषध नाही मिळाले की आरोग्य मंत्र्याला …
Read More »संसदेच्या लेखा समितीकडून आधार बायोमेट्रिकबाबत व्यक्त केली चिंता अनेक लाभार्थी योजनेतून वगळले जाण्याची शक्यता
संसदेच्या सार्वजनिक लेखा समितीने भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) च्या कामकाजाचा आढावा घेण्याची मागणी केली आहे, ज्यामध्ये आधार बायोमेट्रिक पडताळणीच्या उच्च दरासह अनेक चिंता व्यक्त केल्या आहेत ज्यामुळे अनेक लाभार्थी सामाजिक कल्याणकारी योजनांमधून वगळले जाऊ शकतात. गुरुवारी (१७ जुलै, २०२५) झालेल्या बैठकीत, ज्येष्ठ काँग्रेस नेते के.सी. वेणुगोपाल यांच्या अध्यक्षतेखालील समितीला …
Read More »नाना पटोले यांचा विधानसभेत गौप्यस्फोट, मंत्रालय, ठाणे, नाशिक हनी ट्रॅपचे केंद्र पेन ड्राईव्ह दाखवित मंत्री, अधिकारी गुंतल्याचा आरोप
मंत्रालय, नाशिक आणि ठाणे हे हनी ट्रॅपचे केंद्र बनले आहे. या माध्यमातून राज्यातील गोपनीय दस्तऐवज थेट असामाजिक तत्वांच्या हाती पोहोचत आहेत, असा गौप्यस्फोट काँग्रेसचे जेष्ठ आमदार नाना पटोले यांनी गुरुवारी विधानसभेत औचित्याच्या मुद्द्यावर बोलताना केला. यावेळी नाना पटोले यांनी हनी ट्रॅपचे चित्रीकरण असलेला पेन ड्राइव्ह सभागृहात दाखवला. काँग्रेस नेते नाना …
Read More »चंद्रशेखर बावनकुळे यांचे आश्वासन, झुडपी जंगल क्षेत्रावर घर असलेला कुणीही बेघर होणार नाही सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाननुसार काँग्रेस नेते नाना पटोले यांच्या प्रश्नावरील उत्तरा दरम्यान माहिती
सर्वोच्च न्यायालयाने २२ मे २०२५ रोजी आदेश पारित करून विदर्भातील झुडपी जंगल जमीन वन क्षेत्र म्हणून घोषित केलेले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे पालन करीत झुडपी जंगल क्षेत्रावर घर असलेल्या नागरिकांना शासन बेघर होऊ देणार नाही, अशी ग्वाही विधानसभेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली. विदर्भातील सहा जिल्ह्यातील …
Read More »राहुल गांधी यांच्या विरोधातील याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका वाचण्याचे निर्देश राहुल गांधी यांना द्यावे म्हणून याचिका
मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी एक जनहित याचिका (पीआयएल) फेटाळून लावली ज्यामध्ये विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हिंदुत्ववादी विचारवंत विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल “अपरिपक्व” टिप्पणी करून याचिकाकर्त्याच्या अधिकारांचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला होता. अभिनव भारत काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष डॉ. पंकज फडवणीस यांनी दाखल केलेल्या याचिकेत राहुल गांधी यांना विनायक दामोदर …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा, काँग्रेस पक्ष प्रत्येक जिल्ह्यात जनसुरक्षा कायद्याची होळी करणार सरकारच्या चुकीच्या निर्णयाविरोधात आवाज उठवणाऱ्यांना नक्षलवादी ठरवून जेलमध्ये टाकण्याच्या उद्देशानेच कायदा
अर्बन नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी जनसुरक्षा कायदा आणल्याचा सरकारचा दावा अत्यंत हास्यास्पद आहे. हा कायदा आतून बाहेरून काळा असून सामान्यांची गळचेपी करणारा आहे, त्यामुळे काँग्रेस पक्षाने सुरुवातीपासूनच त्याला विरोध आहे. सभागृहात सत्ताधारी पक्षाकडे बहुमत असल्याने त्यांनी बहुमताच्या जोरावर रेटून नेत कायदा मंजूर करून घेतलेला आहे. सरकारने कायदा मंजूर करून घेतला असला …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही, प्रविण गायकवाड यांच्यावरील हल्लेखोर पोलिसांच्या ताब्यात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या मागणीवर मुख्यमंत्री फडणवीस यांचे उत्तर
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांच्यावर काही जणांनी हल्ला केला. तसेच त्यांच्या तोंडाला आणि अंगावर शाई टाकण्यात आली. त्या विषयीचा मुद्दा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत उपस्थित केला. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सदर घटनेची माहिती मिळताच पोलिस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. घटनेच्या ठिकाणाहून पोलिसांनी एका जागेवरच अटक केली. सध्या सर्व …
Read More »विजय वडेट्टीवार यांची मागणी, प्रवीण गायकवाड यांच्यावर भ्याड हल्ला करणाऱ्यावर कडक कारवाई करा विधानसभेत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट इथे सकल मराठा समाजाच्या कार्यक्रमासाठी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड गेले होते. तिथे त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. त्यांना गाडीतून बाहेर खेचून पाडण्यात आले काळे फासण्यात आले. हा त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न होता असा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. विजय वडेट्टीवार पुढे बोलताना …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, प्रविण गायकवाड यांच्यावर हल्ला करणा-या गुंडांना तात्काळ अटक करा सरकारी पाठिंब्याने महाराष्ट्रात वाढलेल्या विखारी वृत्ती महाराष्ट्राला अशांत करत आहेत
महाभ्रष्ट महायुती सरकारच्या काळात राज्यात मोठ्या प्रमाणात गुंडाचा सुळसुळाट वाढला आहे. सरकारी पाठिंब्याने वाढलेल्या विखारी वृत्ती महाराष्ट्राला अशांत करण्याचा प्रयत्न करत आहेत. पुरोगामी विचारवंत, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष शिवश्री प्रविण गायकवाड यांच्यावर गुंडांनी केलेला भ्याड हल्ला याचेच प्रतिक आहे. सरकारने या हल्लेखोरांच्या मुसक्या आवळून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी काँग्रेस …
Read More »
Marathi e-Batmya