अतिवृष्टी व महापूरामुळे झालेल्या नुकसानीपोटी महायुती सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. सरकारने जाहीर केलेले ३२ हजार कोटी रुपयांचे पॅकेज हे फसवे आहे त्याचप्रमाणे आज मंत्रिमंडळ बैठकीत ११ हजार कोटी रुपयांच्या वितरणाला दिलेली मान्यताही फसवीच आहे. महायुती सरकार शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत असून हेक्टरी सरसकच ५० हजार रुपये दिले पाहिजे याचा …
Read More »सचिन सावंत यांचा आरोप, मोदी-फडणवीसांकडून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक सोयाबीनला प्रति क्विंटल ६,००० रुपये हमीभावाची मागणी करणारे फडणवीस सत्तेत असूनही भाव का देत नाहीत ?
मोदी सरकारने या वर्षी सोयाबीनसाठी केवळ ५३२८ रुपये प्रति क्विंटल इतका हमीभाव जाहीर केला आहे. परंतु २०१३ साली भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी दिंडी काढून सोयाबीनला ६,००० रुपये हमीभाव देण्याची मागणी केली होती. त्या दिंडीला आज १२ वर्षे झाली, आणि मोदी सरकार सत्तेत येऊन ११ वर्षे उलटली तरीही …
Read More »दत्तात्रय भरणे यांची माहिती, कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी सोलापूरात लाभार्थ्यांची निवड योजनेत निवड झालेल्या सर्व लाभार्थ्यांनी लाभ घेण्याचं आवाहन
महाडीबीटी पोर्टलवरील प्रथम येणा-यास प्रथम प्राधान्य या तत्वानुसार कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी सोलापूर जिल्ह्यात पावनेतीन लाख तर राज्यात बत्तीस लाख लाभार्थ्यांची कृषी विभागातर्फे निवड करण्यात आली आहे. कृषी विभागाच्या इतिहासात एवढ्या मोठ्या प्रमाणावर कृषी यांत्रिकीकरण योजनेत लाभार्थ्यांची निवड होण्याची ही पहिलीच वेळ आहे. शेतातील कामे जलदगतीने व वेळेत पुर्ण होण्यासाठी निवड …
Read More »आता तीन हेक्टरपर्यंतचे बाधित क्षेत्र; ६४८ कोटी १५ लक्ष ४१ हजार रुपयांच्या निधी वितरणाला मान्यता आता तीन हेक्टरपर्यंतचे बाधित क्षेत्र; ६४८ कोटी १५ लक्ष ४१ हजार रुपयांच्या निधी वितरणाला मान्यता-मंत्री मकरंद जाधव-पाटील
यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टी पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून या बाधित शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे. अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत व्हावी म्हणून राज्य शासनाने तातडीने मदत देण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी दोन हेक्टरपर्यंत मदत देण्यासाठी मान्यता दिली असून आता या शेतकऱ्यांना तीन हेक्टरपर्यंतच्या बाधित क्षेत्रासाठीही विशेष बाब …
Read More »ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून माणुसकीची दिवाळी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी क्यू आर कोड द्वारे अधिकारी-कर्मचाऱ्यांनी केले स्वेच्छा निधी संकलन
यावर्षी अतिवृष्टीमुळे मराठवाड्यासह महाराष्ट्र राज्यातील अनेक भागातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यांना मदत करण्यासाठी म्हणून महाराष्ट्र शासनासह विविध संस्था, व्यक्ती पुढे सरसावले आहेत. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयही या मदतकार्यात क्यू आर कोडच्या माध्यमातून पुढे सरसावले आहे. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, निवासी …
Read More »भाजपा महायुती सरकारविरोधात काँग्रेसचे २० ऑक्टोबरला राज्यभर पिठलं भाकर आंदोलन फसवे पॅकेज देऊन शेतकऱ्याची काळी दिवाळी करणाऱ्या महायुती सरकारचा धिक्कार करणार
राज्यातील बळीराजावर यावर्षी मोठे संकट ओढवले आहे. शेतकरी उद्ध्वस्थ झाला असताना त्याला भरीव पॅकेज व कर्जमाफी देण्याची आवश्यकता होती. परंतु सरकारने जाहीर केलेले पॅकेज अत्यंत तुटपुंजे आहे आणि जे जाहीर केले तेही शेतकऱ्यांना अद्याप मिळालेले नाही. जगाचा पोशिंदा बळीराजावर काळी दिवाळी करण्याची वेळ आहे आणि या परिस्थितीला शेतकरी विरोधी महायुती …
Read More »विजय वडेट्टीवार यांची टीका, शेतकऱ्यांची दिवाळी काळी, सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक सरकारने शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर केलं तरी दिलेली मदत ही तुटपुंजी
राज्य सरकारने शेतकऱ्यांना भरघोस मदत करणार सांगत ३१ हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा केली. आज दिवाळीला सुरुवात झाली तरी प्रत्यक्षात सरकारने मात्र १८०० कोटी पर्यंतच्या मदतीचे जीआर आले आहेत. सरकारने जी मदत दिली आहे, त्यात ही कुठलीही वाढ केलेली नाही. राज्य सरकार केवळ हेक्टरी १० हजार रुपये मदत दिली आहे त्यामुळे …
Read More »शरद पवार यांचा निर्धार, दिवाळी साजरी करायची नाही शेतकऱ्यांच्या दुःखात आमची संघटना सहभागी
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सगळ्या संघटनेच्या सहकाऱ्यांनी बसून एक निर्णय घेतला. तो निर्णय म्हणजे आजचा दिवस दिवाळी साजरी करायची नाही असे राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुख शरद पवार यांनी बारामती येथे पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले. शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, त्याचं महत्त्वाचं कारण गेले महिनाभर महाराष्ट्रातील …
Read More »मकरंद जाधव-पाटील यांची माहिती, नैसर्गिक आपत्तीग्रस्त या जिल्ह्यांसाठी १३५६ कोटींच्या रकमेस मान्यता सातारा, कोल्हापूर, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड जिल्ह्यांचा समावेश
सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या सातारा, कोल्हापूर, बीड, धाराशिव, लातूर, परभणी आणि नांदेड जिल्ह्यातील २१ लाख ६६ हजार १९८ शेतकऱ्यांच्या १५ लाख १६ हजार ६८१.२१ हेक्टर वरील बाधित पिकांच्या मदतीसाठी १३५६ कोटी ३० लाख २२ हजार रुपयांची मदत वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आल्याची माहिती मदत …
Read More »दत्तात्रय भरणे यांची माहिती, कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी ३२ लाख लाभार्थ्यांची निवड योजनेतून विक्रमी शेतक-यांना मिळणार लाभ
महाडीबीटी पोर्टवरील कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी ३२ लाख ६७ हजार २२५ लाभार्थ्यांची कृषी विभागातर्फे निवड करण्यात आली आहे. कृषी यांत्रिकीकरण योजनेत एवढ्या मोठ्या प्रमाणावर लाभार्थ्यांची निवड होण्याची ही पहिलीच वेळ आहे. तेंव्हा, या सर्व लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले. तसेच कृषी यंत्रे/औजारांवरील जीएसटी च्या …
Read More »
Marathi e-Batmya