Tag Archives: एसआयआर

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, एमपीएससीच्या अनागोंदी कारभाराप्रकरणी अध्यक्ष व सचिवांची हकालपट्टी करा एमपीएससीच्या भोंगळ कारभाराला कंटाळून धाराशीव जिल्ह्यातील प्रथमेश देशमुखची आत्महत्या हा सरकारने घेतलेला बळी, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

भाजपा सरकारच्या काळात पेपरफुटीने विद्यार्थ्यांच्या भविष्याचा खेळखंडोबा करून ठेवला आहे. पेपरफुटीने त्रस्त विद्यार्थ्यांना MPSC च्या भोंगळ कारभाराचाही फटका बसला आहे. एमपीएससीच्या कारभाराविरोधात लाखो विद्यार्थी रस्त्यावर उतरले तरीही सरकारला जाग येत नाही. राज्य सरकारने यात हस्तक्षेप करून MPSC चे अध्यक्ष व सचिव यांची हकालपट्टी करण्याची मागणी होत आहे, पण अध्यक्ष मुख्यमंत्र्यांचे खास असल्यानेच त्यांच्यावर कारवाई होत …

Read More »

काँग्रेसची मागणी, एसआयआरमधील दावे-हरकतींसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ द्या सुनावणीचे योग्य व्यवस्थापन, मतदार यादीत पारदर्शकता आणण्याची महाराष्ट्र काँग्रेसची मागणी

महाराष्ट्रात सुरू असलेल्या SIR (Special Intensive Revision) मोहिमेअंतर्गत मोठ्या संख्येने मतदारांची नावे प्रारूप मतदार यादीतून वगळण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर दावे-हरकती दाखल करण्यासाठी पुरेसा कालावधी देण्यात यावा, सुनावणी प्रक्रिया सुलभ करण्यात यावी आणि संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबविण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस ॲड. संदेश कोंडविलकर यांनी राज्याचे मुख्य …

Read More »

प्रारूप मतदार यादीतील संशयास्पद (Anomalis) व Unmapped मतदारांची यादी प्रसिद्ध करा काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे मागणी

एसआयआर मोहिमेंतर्गत महाराष्ट्रातील प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीमध्ये संशयास्पद (Anomalis) व Unmapped मतदारांची नावे सुद्धा आहेत; परंतु कोणत्याही प्रकारची खूण त्या नावांवर मारलेली नाही. त्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होईल,याच मतदारांना नोटीस देऊन सुनावणीसाठी बोलावण्यात येणार आहे. ज्या मतदारांना नोटीस देण्यात येणार आहे, अशा मतदारांची बूथनिहाय यादी तातडीने प्रसिद्ध करावी व ती राजकीय पक्षांना …

Read More »

अरविंद केजरीवाल यांची टीका, निवडणूक आयोग एसआयआरच्या माध्यमातून देशाची लोकसंख्या कमी करतेय दिल्लीतील निवडणूक आयोगाच्या एसआयआरच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि ‘आप’चे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरावलोकन (SIR) प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दिल्लीच्या मतदार यादीच्या मसुद्यातून ४७ लाखांहून अधिक मतदारांची नावे वगळण्यात आल्यानंतर त्यांनी हे विधान केले. मसुदा यादी प्रसिद्ध झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना अरविंद केजरीवाल म्हणाले की, सुमारे दीड कोटी मतदारांपैकी ४७ …

Read More »

वर्षा गायकवाड यांची मागणी, एसआयआर नोंदणी, रोल बॅक व दावे हरकतीसाठी कालावधी वाढवून द्या ‘शहरी नक्षलवादी’, ‘दिमागी नक्षलवादी’, असे शब्द पंतप्रधानांच्या तोंडी येतातच कसे? देशाचे भविष्य असलेले विद्यार्थी दिमागी नक्षलवादी आहेत का?

महाराष्ट्रात पुढील तीन वर्षांत कोणत्याही निवडणुका होणार नाहीत, असे असताना निवडणूक आयोग ‘एसआयआर’ (SIR) प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इतकी घाई का करत आहे? मुंबईतील प्रत्येक नागरिकाचे नाव योग्यरित्या नोंदवले जाईपर्यंत ही प्रक्रिया सुरुच ठेवली पाहिजे. मतदान हा प्रत्येकाचा घटनात्मक अधिकार आहे आणि तो हिरावून घेण्याचा अधिकार कोणालाही नाही, त्यामुळे १७ ऑगस्टची …

Read More »

डॉ पंकज भोयर यांचा दावा, मतदार यादी पुनर्रिक्षण कामामुळे शिक्षकांच्या अध्यापनावर परिणाम नाही उपाययोजनांसाठी लवकरच बैठक घेणार

मतदार यादी पुनर्रिक्षण कामासाठी शिक्षकांच्या सेवा घेण्याबाबत निर्माण झालेल्या प्रश्नावर संबंधित विभागांची तातडीची बैठक घेऊन योग्य उपाययोजना करण्यात येतील. तसेच शिक्षकांच्या निवडणूक कामकाजाचा त्यांच्या अध्यापनावर कोणताही परिणाम होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल, असे आश्वासन राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी विधानपरिषदेत दिले. या संदर्भात नियम ९२ अन्वये अर्धा तास चर्चेदरम्यान …

Read More »

खासदार वर्षा गायकवाड यांची मागणी, मुंबईत ४० टक्केही मॅपिंग झालेले नाही, ते पूर्ण करा

वर्षा गायकवाड

लोकशाही व्यवस्थेत निवडणुका हा एक उत्सव आहे, या उत्सवात सर्वांचा सहभाग असला पाहिजे परंतु एसआयआर मोहिम राबविताना पक्षपातीपणा केला जात असल्याचे दिसून आले आहे. एसआयआर (SIR) मोहिम राबविताना काही बाबींकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. महाराष्ट्रात पुढील तीन-चार वर्षात कोणत्याच निवडणुका नाहीत, त्यामुळे मुंबईत एसआयआर (SIR) मोहिम राबविताना घाईघाईत न करता त्यासाठी वेळ द्यावा …

Read More »

वर्षा गायकवाड यांची मागणी, एसआयआर (SIR) प्रक्रियेतून एकाही मुंबईकराचे नाव वगळले जाणार नाही याची खबरदारी घ्या जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवा

लोकशाही व्यवस्थेत मतदानाचा अधिकार हा केवळ घटनात्मक अधिकार नाही, तर भारतीय लोकशाहीचा आत्मा आहे. परंतु भाजपा सरकार निवडणूक आयोगाच्या माध्यमातून मतदार याद्यांमध्येही घोटाळा करत आहे. विविध राज्यात राबवण्यात आलेल्या एसआयआर प्रक्रियेतून मोठ्या संख्येने मतदार वगळण्यात आलेले आहेत. अशी परिस्थिती मुंबईकरांवर ओढवू नये, यासाठी एसआयआर प्रक्रियेवर बारीक नजर ठेवावी व एकाही मुंबईकराचे नाव …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा, मतदार यादीत घोळ करणा-यांना आगामी काळात जेलमध्ये जावे लागेल SIR मोहिमेसंदर्भात काँग्रेसचे प्रमुख नेते, खासदार आमदार व BLA1 ची राज्यस्तरीय रणनीती बैठक टिळकभवन येथे संपन्न

भाजपाने निवडणूक आयोगाच्या मदतीने वोटचोरी करून महाराष्ट्रात सत्ता मिळवली. बिहार आणि बंगालमध्येही मतदारांची नावे वगळून भाजपने विजय मिळवला. मतदार यादी पुनरिक्षणाच्या माध्यमातून निवडणूक प्रक्रियेवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न सुरु आहे. लोकशाहीची हत्या करणाऱ्या आणि मतदार यादीत घोळ करणाऱ्यांना आगामी काळात जेलमध्ये जावे लागेल असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन …

Read More »

एस. चोकलिंगम यांची माहिती, मतदार याद्या होणार अधिक पारदर्शक १ लाख २५३ बुथ परिसरातील मतदारांचे राज्यभर विशेष सखोल पुनरिक्षण

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्रात विशेष सखोल मतदार पुनरिक्षण (एसआयआर) मोहीम राबविण्यात येणार असून राज्यातील सुमारे ९ कोटी ६८ लाख मतदारांच्या नोंदींची घराघरात जाऊन पडताळणी केली जाणार आहे. त्यासाठी राज्यातील १ लाख २५३ बुथ परिसरातील मतदारांचे विशेष सखोल मतदार पुनरिक्षण करण्यात येणार असल्याचे अपर मुख्य सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी एस. …

Read More »