आपल्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणाऱ्या तरुण मुला-मुलींवर देवेंद्र फडणवीस यांचे पोलीस अत्यंत राक्षसी पद्धतीने वागत आहेत. मुलांना ड्रग्जच्या खोट्या केसमध्ये अडकवण्याची धमकी दिल्यानंतर आता दादरमध्ये एका मुलीचा विनयभंग करण्यापर्यंत फडणविसांच्या पोलिसांची मजल गेली आहे. तरुण मुलांवर लाठीहल्ला केला जात आहे. विद्यार्थ्यांवर दडपशाही करणारे पोलीसराज महाराष्ट्राला कलंक असून स्वतःला …
Read More »राज ठाकरे यांचा सवाल, विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या पोलिसांवर आणि आदेश देणाऱ्यांवर कारवाई का होत नाही? शाळेतल्या शिक्षकांवर कारवाई होते मग पोलिसांवर का कारवाई होत नाही
मला एक प्रश्न पडला आहे. जर शाळेत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मारलं तर त्यांच्यावर कारवाई होते, तर मग दिल्लीत विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या पोलिसांवर आणि तसे आदेश देणाऱ्यांवर कारवाई का होत नाही? असा सवाल मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पोलिसांना केला. नवी दिल्लीतील जंतरमंतर येथील कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. …
Read More »वर्षा गायकवाड यांचा आरोप,… पण सरकार व रेल्वे प्रशासन मात्र कुंभकर्णी झोपेत मुंबई लोकल प्रवास रामभरोसे, प्रवाशांवर हल्ले, खून, मारामाऱ्या, महिला अत्याचारांत वाढ
मुंबई उपनगरीय रेल्वेतील प्रवास हा दिवसेंदिवस धोकादायक व चिंताजनक बनला आहे. लोकलमध्ये चाकू हल्ला, खून, मारमारी, महिलांवरील अत्याचारात मोठी वाढ झालेली दिसत आहे. लोकल प्रवास सुरक्षित राहिलेला नाही. आधीच लोकलमधील गर्दीमुळे लोंबकळत प्रवास कारावा लागत असताना आता वाढलेल्या हिंसक घटनामुळे लोकल प्रवास रामभरोसे झाला आहे. रेल्वे पोलीस, रेल्वे व्यवस्थापन व राज्य सरकार कोणालाही प्रवाशांची …
Read More »राज ठाकरे यांना भेटल्यानंतर रोहित पवार म्हणाले, अपघातानंतर एफआयआर का घेतला नाही हाच प्रश्न अजित पवार अपघात प्रकरणी रोहित पवार यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्यानंतर, या अपघातामागे घातापात असल्याचे कर्जत जामखेडचे आमदार तथा अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार यांच्याकडून सातत्याने करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आतापर्यंत रोहित पवार यांनी जवळपास तीन दिन झाले, रोहित पवार हे यांनी सुरुवातीला मंत्रायाच्या जवळील मरिन लाईन्स पोलिस स्टेशन आणि …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, डिजिटल अरेस्ट हा निव्वळ खोटेपणा फसवणुकीचा संशय आल्यास लगेच १९३० वर संपर्क करावा
कोणालाही डिजिटल अरेस्ट करता येत नाही. अशा प्रकारचा कॉल, मेसेज किंवा व्हिडिओ कॉल आल्यास तो फसवणूक असल्याने डिजिटल ॲरेस्टचा फोन आल्यास नागरिकांनी तत्काळ १९३० या सायबर हेल्पलाईनवर संपर्क साधावा. अशा प्रकरणात जनजागृतीसाठी राज्य आणि केंद्र शासनाकडून याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती मोहीम राबवली जात असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत प्रश्नोत्तरांच्या वेळी …
Read More »Rohit Shetty firing case: २० जानेवारी रोजी स्कूटीवर मुंबईत आले होते आरोपी रोहित शेट्टी यांच्या घरी झालेल्या गोळीबाराच्याच्या घटनेत नवी माहिती आली बाहेर
मुंबईतील रोहित शेट्टीच्या Rohit Shetty घरी झालेल्या गोळीबाराच्या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे आणि आता या प्रकरणाचे गूढ हळूहळू उलगडत आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या तपासात मोठा कट उघड झाला आहे. पोलिसांनी सांगितले की बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा, मोठ्या प्रमाणात निधी आणि आंतरराष्ट्रीय संबंध असू शकतात. पोलिसांच्या मते, आरोपी सिद्धार्थ आणि समर्थ …
Read More »काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी? राज्यातील गुन्हेगारीला फडणवीसांचे पाठबळ; मुंबईतील एन्काऊंटरवर अनेक गंभीर प्रश्न
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर पोलीस पाळत ठेवत आहेत. मुंबईतील नाना चौकातील सर्वोदय आश्रमात सपकाळ यांचा मुक्काम असतो, त्या आश्रमात पोलीस सातत्याने पाळत ठेवत आहेत. आज सकाळी एका साध्या वेशातील पोलिसांने थेट बेडरुममध्ये घुसून टेहळणी आणि चौकशी केली. हे आतापर्यंत तिस-यांदा घडले आहे. कोणाच्या आदेशाने आमच्यावर पाळत ठेवली जात आहे?, …
Read More »स्टुडिओत १७ मुलांना ओलिस ठेवणाऱ्या रोहित आर्यचा पोलिस गोळीबरात मृत्यू पवई भागात रोहित आर्य नावाच्या एका इसमाने १७ अल्पवयीन मुलांना डांबून ठेवले
मुंबईतील पवई येथे रोहित आर्य नामक इसमाने १७ अल्पवयीन मुलांना डांबून ठेवल्याची घटना समोर आली होती. या घटनेनंतर पोलिसांनी १७ मुलांची सुखरूप सुटका केली. तसेच रोहित आर्यने पोलिसांवर हल्ला केल्यामुळे त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. छातीत गोळी लागल्यानंतर त्याच्यावर उपचार करण्यात येते होते. उपचारा दरम्यान रोहित आर्यचा मृत्यू झाल्याची माहिती समोर …
Read More »पोलिसांच्या अनुकंपा नियुक्त्यांचा निर्णय मिशन मोडवर राबविणार मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
राज्य शासनाच्या १५० दिवस आराखडा कार्यक्रमात पोलिसांच्या अनुकंपा भरती संदर्भातील सर्व प्रकरणे मिशन मोडवर निकाली काढली जातील. त्याचबरोबर अनुकंपा भरतीसंदर्भात सर्व विभागांना आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. विधानपरिषद सदस्य सुनील शिंदे यांनी पोलिसांच्या कामकाजातील सुधारणा, गृहनिर्माण, आरोग्य, मानसिक आरोग्य व इतर सुविधांच्या संदर्भात प्रश्न विचारला …
Read More »झारखंडमध्ये पावसामुळे १६२ विद्यार्थी शाळेत अडकले एनएडीआरएफच्या जवान आणि पोलिसांनी शालेय विद्यार्थ्यांना वाचविले
झारखंडच्या पूर्व सिंहभूम जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे पाण्याखाली गेलेल्या एका खाजगी निवासी शाळेत अडकलेल्या किमान १६२ विद्यार्थ्यांना रविवारी (२९ जून २०२५) पोलिसांनी वाचवले, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. मुसळधार पावसामुळे परिसरात पाणी साचल्यानंतर शनिवारी (२८ जून) रात्रीपासून कोवाली पोलिस स्टेशन परिसरातील हळदीपोखर-कोवाली रोडवरील पंडारसोली येथील शाळेत विद्यार्थी अडकले होते. “मुसळधार पावसामुळे …
Read More »
Marathi e-Batmya