विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. तसेच या दोन्ही बाजूच्या आमदारांकडून प्रचाराच्या निमित्तानेही प्रतिस्पर्धी उमेदवारांवर टीका-टीपण्णी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मुंब्रा-खळव्याचे आमदार तथा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जितेंद्र आव्हाड यांनी काल एका प्रचार सभेत बोलताना अजित पवार यांच्यावर टीका करताना म्हणाले …
Read More »नाना पटोले यांचे पंतप्रधान मोदींना पत्र, कापसाच्या आयातीवर तात्काळ बंदी घाला कापूस आयातीचा निर्णय व्यापाऱ्यांच्या फायद्याचा, केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे हित पहावे
कापूस उत्पादनात महाराष्ट्र देशातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य असून ४० लाखांपेक्षा जास्त शेतकरी कापसाचे उत्पादन घेतात. राज्यात भरपूर कापूस उत्पादन होत असताना २२ लाख गाठी कापसाची आयात करण्यात आल्याच्या बातम्यांमुळे देशात कापसाच्या भावात मोठी घसरण होण्याची भिती आहे. भारतीय कापूस महामंडळाकडेही विक्री न झालेल्या ११ लाख कापूस गाठी पडून आहेत. शेतकऱ्यांचे …
Read More »बंडखोरीबाबत बोलताना गोपाळ शेट्टी म्हणाले, पक्षहितासाठी जे करावं लागेल ते करेन देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर गोपाळ शेट्टी यांची स्पष्टोक्ती
लोकसभा निवडणूकीच्या कालावधीत गोपाळ शेट्टी यांना उमेदवारी न देता त्या मतदारसंघातून केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली. तसेच त्यावेळी गोपाळ शेट्टी यांना त्यांचे राजकीय पुर्नवसन करण्यात येणार असल्याचे आश्वासनही भाजपाने दिले. त्यानंतर राज्यसभेच्या रिक्त जागांसाठी आणि राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेवरील नामनिर्देशित जागा आणि निवडणूकाही झाल्या. मात्र गोपाळ शेट्टी …
Read More »रमेश चेन्नीथला यांचा आरोप, जनतेचे दिवाळे काढून शिंदे भाजपाची दिवाळी माजी मंत्री अनिस अहमद यांचा वंचितमधून काँग्रेस पक्षात प्रवेश
भाजपा शिंदे अजित पवारांच्या शेतकरी विरोधी आणि केंद्राच्या चुकीच्या आयात निर्यात धोरणामुळे राज्यातील शेतकरी उद्धवस्त झाले आहेत. एकीकडे महागाई प्रचंड वाढली असून सोयाबीन, कापूस आणि कांदा या शेतीमालाला रास्त भावही मिळत नाही. शेतकरी, कष्टकरी, गृहिणी यांचे दिवाळं काढून शिंदे भाजपाची दिवाळी सुरु आहे, असा घणाघाती हल्लाबोल काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश …
Read More »जयंत पाटील यांचा आरोप, पिछेहाटीला भाजपाच जबाबदार तर अजित पवार म्हणाले, अहवाल बघतो विकासाचे घोंगडं पांघरून बसलेल्यांनी हे लक्षात घ्यावं की कोंबडं कितीही झाकलं तरी आरवायचं राहत नाही
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक सल्लागार समितीने दिलेल्या अहवालात महाराष्ट्र मागील १० ते १२ वर्षात आर्थिक परिस्थितीत घसरण झाल्याचा आणि जीडीपी दरात २ टक्के कपात झाल्याची धक्कादायक माहिती दिली. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महाराष्ट्राच्या आर्थिक घसरणीला भाजपाचा जबाबदार असल्याचा आरोप केला. त्यावर अजित पवार …
Read More »पंतप्रधान मोदी यांची टीका, वास्तवात न उतरणारी आश्वासन देणारी काँग्रेस कर्नाटकातील सरकारकडून एक गॅरंटी कमी करण्याच्या चर्चेवर सोडले टीकास्त्र
कर्नाटकात विधानसभा निवडणूकीपूर्वी काँग्रेसने जनतेला पाच आश्वासनांची गॅरंटी दिली होती. मात्र कर्नाटक उमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी पाच पैकी एक गॅरंटी बंद करण्याचे सुतोवाच दिले. त्यावर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांना महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी “चुकीचा संदेश” दिल्याबद्दल कडक शब्दात कानउघाडणी केली. राज्य सरकारच्या महिलांसाठी मोफत …
Read More »प्रविण दरेकर यांची टीका, राऊतांना आरोप करण्याशिवाय कामच नाही संजय राऊत यांच्या टीकेवर प्रविण दरेकरांचे प्रत्युत्तर
राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या माध्यमातून आमचे फोन आजही टॅप केले जात असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. त्यांच्या या आरोपाला भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत यांना आरोप करण्याशिवाय काही काम नाही. अशा प्रकारचे कोण फोन टॅपिंग करत असेल असे अजिबात वाटत …
Read More »आता अजित पवार यांचे, मिळणाराय मिळणाराय, येणाराय येणाराय देवेंद्र फडणवीस यांच्या पुन्हा येईन, पुन्हा येईनच्या धर्तीवर बारामतीत केली घोषणा
राज्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थानापन्न झाल्यानंतर त्यावेळचे विरोधी पक्षनेते तथा विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मी पुन्हा येईनचा नारा दिला. त्यानंतर वर्षे-दोन वर्षात राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यात देवेंद्र फडणवीस हे यशस्वीही झाले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी होय मी पुन्हा आलो पण दोन पक्षांना फोडून …
Read More »शिंदे गटाचे उमेदवार मुरजी पटेल यांच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका १९९५ च्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत अनियमितता केल्याचा याचिकेत आरोप
विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील अॅडजेस्टमेंट म्हणून भाजपाचे माजी नगरसेवक तथा विकासक मुरजी पाटील यांनी नुकताच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. मात्र मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्ज भरताच झोपडपट्टी पुर्नवसन योजने अनियमितता आणि रहिवाशांची फसवणूक केल्याचा आरोप करत मुरजी पटेल यांच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. …
Read More »नवाब मलिक यांचा भाजपाला इशारा, तर मी कायदेशीर कारवाई करणार अंडरवर्ल्ड डॉन दाऊदशी जोडल्यास कारवाई करणार
विधानसभा निवडणूकीतील उमेदवारीवरून मानखुर्द शिवाजीनगरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नवाब मलिक यांनी महायुतीतील घटक पक्ष असलेल्या भाजपाकडून सातत्याने विरोध करण्यात येत आहे. त्यातच आज पुन्हा भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्या उमेदवारीला विरोध करत भाजपा नवाब मलिक यांच्या उमेदवारीला विरोध करत त्यांचा प्रचार भाजपा करणार नसून शिवसेना शिंदे गटाच्या …
Read More »
Marathi e-Batmya