Tag Archives: congress

मराठी ई-बातम्याने भाकित केलेल्या मंत्र्यांसह ३६ जणांचा शपथविधी उपमुख्य़मंत्री पदी अजित पवार, शिवसेनेचे आदीत्य ठाकरे झाले मंत्री

मुंबईः प्रतिनिधी राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या अनुषंगाने शिवसेनेच्या ६, काँग्रेसच्या ६ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ८ मंत्र्यांची नावे भाकित केली होती. यापैकी बहुतांष आमदारांनी आज मंत्री पदाची शपथ घेतल्याने मराठी ई-बातम्या.कॉमचे वृत्त खरे ठरले. तसेच राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ अजित पवार यांनी घेतली. तर पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडूण आलेले आदीत्य ठाकरे यांचाही …

Read More »

मंत्रिमंडळ विस्तारात मराठा, बौध्द, मुस्लिम, ओबीसी, जैन आणि महिलांना स्थान महाविकास आघाडीचे सर्वसमावेशक मंत्रिमंडळ

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात मराठा समाजाबरोबरच बौध्द, मुस्लिम आणि महिला समाजाला मोठ्या प्रमाणावर समावेश करत सामाजिक स्तरावरील सर्व घटकांना समाविष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. महाविकास आघाडी सरकारच्या आज सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून मराठा समाजातील प्रत्येकी ८ जणांचा समावेश करण्यात आला. तर …

Read More »

भाजपा म्हणते, काँग्रेसने किमान स्वत:ची कागदपत्र तरी नीट वाचावित ती स्थानबद्धता केंद्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार-केशव उपाध्ये

मुंबईः प्रतिनिधी स्थानबध्द केंद्र निर्माण करण्यासाठी काँग्रेसने जारी केलेली कागदपत्रे आधी त्यांनीच आधी नीट वाचायला हवीत असा खोचक सल्ला भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी देत काँग्रेसचे प्रवक्ते हे आपल्या सोयीची कागदपत्र वापरून बेताल वक्तव्य करण्यासाठी प्रसिद्ध असल्याची टीका त्यांनी केली. काँग्रेसच्या अशा बेताल वक्तव्यांना भारतीय जनता पार्टीने वारंवार उघडे पाडले …

Read More »

पंतप्रधान म्हणतात चर्चा झाली नाही, मग स्थानबध्द केंद्राचे पत्र कसे जारी केले एनआरसी कायद्यावरून खोटं बोलत असल्याचा काँग्रेसचा आरोप

मुंबईः प्रतिनिधी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनआरसी कायद्याबाबत मंत्रिमंडळात आणि संसदेत चर्चा झाली नसल्याचे सांगितले. मात्र देशाचे गृहमंत्री सीएए आणि एनआरसी कायदा संपूर्ण भारतात राबविणार असल्याचे संसदेसह इतर ठिकाणी जाहीररित्या सांगत आहेत. तसेच स्थानबध्द केंद्र स्थापन करण्याबाबत सर्व सरकारांना केंद्राकडून पत्र पाठविण्यात आल्याने मग चर्चा न करताच ही …

Read More »

काँग्रेसकडून चव्हाण, थोपटे आणि गायकवाड यांची नावे निश्चित लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता

मुंबई-नवी दिल्लीः प्रतिनिधी राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार २७ डिसेंबर पूर्वी करण्याचा निर्णय शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला आहे. यापैकी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची यादी जवळपास निश्चित मानली जात असताना काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पुण्याच्या भोर तालुक्यातील संग्राम थोपटे आणि मुंबईतील धारावीच्या आमदार वर्षा गायकवाड यांची नावे …

Read More »

संविधान बदलण्याचा भाजप सरकारचा डाव हाणून पाडा काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांचे आवाहन

नागपूरः प्रतिनिधी संविधानामुळे आपल्या देशात लोकशाही रूजली आणि वाढली. हेच संविधान बदलून देशात हुकुमशाही आणण्याचा केंद्रातील भाजप सरकारचा डाव आहे. संविधानाचे रक्षण करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी असल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपचा डाव हाणून पाडण्यासाठी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून संघर्ष करावा, असे आवाहन अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मल्लिकार्जुन खर्गे यांनी केले. …

Read More »

फडणवीसांच्या उद्विग्न प्रश्नांना मुख्यमंत्री ठाकरेंची दिलखुलास उत्तरे भारूडाला अभंगातून आणि विडंबनातून जवाब

नागपूरः विशेष प्रतिनिधी राज्यपालांच्या अभिभाषणावरील ठरावाच्यावेळी काल काहीजणांनी हे चालेची ना ते चालेची ना सारखे काहीतरी म्हणत होते. मात्र आम्ही कमी बोलतो, जास्त काम करतो असे सांगत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या भाषेत सांगायचे तर संताचा तो प्रचार अमर, अजूनही लोक-मनावर, राज्य चालवोनी निरंतर, लाखो जीवा उद्धरितो अशा पध्दतीचे आमचे राज्य …

Read More »

काँग्रेस पक्ष तरूणांना मोठी संधी देणार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे प्रतिपादन

नागपूरः प्रतिनिधी काँग्रेस पक्षाचा विचार हा सर्वसमावेशक आणि शाश्वत विचार आहे. भारतीय जनता पक्षाच्या धर्मांध आणि विभाजनवादी अजेंड्याला राष्ट्रीय एकात्मता आणि बंधुभाव वाढवणारा काँग्रेस विचारच रोखू शकतो. काँग्रेसची विचारसरणी तळागाळापर्यंत पोहोचवून संघटना मजबूत करण्यासाठी तरूणांना मोठ्या प्रमाणात संधी देणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व राज्याचे महसूल मंत्री …

Read More »

शिवस्मारकातील भ्रष्टाचाराच्या चौकशीचे स्वागत काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचे प्रतिपादन

मुंबईः प्रतिनिधी गेल्या पाच वर्षात भाजपाच्या सरकारने प्रचंड घोटाळे केले. त्या सर्व घोटाळ्यांना क्लीन चिट दिली. परंतु त्यातही ज्या शिवरायांचे नाव घेऊन भाजप सत्तेवर आली त्यांच्या स्मारकातही भ्रष्टाचार करण्याचे प्रचंड मोठे पातक भाजपने केल्याचे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने उघडकीस आणलेल्या शिवस्मारक घोटाळ्यातील आरोपांना कॅगने अधोरेखीत केले. या घोटाळ्याची मुख्यमंत्री उद्धव …

Read More »

राहुल गांधींची भाजपकडून नाहक बदनामी काँग्रेस नेते आ. अशोक चव्हाण यांचा भाजपावर आरोप

नागपूर: प्रतिनिधी भाजपशासीत राज्यांमधील वाढते महिला अत्याचार आणि अशा प्रकरणांमध्ये गुंतलेल्या भाजप नेत्यांवर कारवाई होत नसल्यासंदर्भात काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांनी जोरदार आघाडी उघडली. मात्र, खा. राहुल गांधी यांच्या आरोपांना उत्तर देता येत नसल्याने भाजपने आता त्यांची नाहक बदनामी सुरू करून देशाचे लक्ष इतरत्र वळविण्याचा प्रयत्न चालविल्याचा आरोप माजी …

Read More »