Tag Archives: congress

नाना पटोले यांचा इशारा, महायुती सरकारमध्ये भ्रष्टाचाराचा कळस; चार आयएएस अधिकाऱ्यांच्या प्रकरण लवकरच उघड भाजपाचा महिलांबद्दलचा कळवळा बेगडी; महिला आरक्षण विधेयक २०२३ सालीच मंजूर

भारतीय जनता पक्ष हा खोटारडा असून महिलांबाबतचा त्यांचा कळवळा बेगडी आहे. खोटं बोल पण रेटून बोल, ही त्यांची पद्धत आहे. २०२३ सालीच महिला आरक्षण विधेयक संसदेत सर्व पक्षांच्या पाठिंब्याने पास झालेले आहे, त्याची अंमलबजावणी भाजपा करत नाही तर १६ एप्रिलला जे विधेयक लोकसभेत सादर केले होते ते देश तोडणारे होते, …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, संजय गायकवाडवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते? आमदार संजय गायकवाडांचे विधान विकृत व गुन्हेगारी स्वरुपाचे

शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना अर्वाच्च भाषेत शिविगाळ केलीच पण त्यांची भाषा अत्यंत घाणेरडी, विकृत व गुन्हेगारी प्रवृत्तीची आहे. आमदार गायकवाड यांनी यावेळी कॅाम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येबाबतही भाष्य केलेले आहे, अशा विकृत व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आमदारावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कारवाई …

Read More »

अनंत गाडगीळ यांचा सवाल, हाच का डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दलचा भाजपाचा आदर? काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते आर्की. अनंत गाडगीळ यांचा संतप्त सवाल

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील दादर येथील ‘राजगृह’ या ऐतिहासिक निवासस्थानाला १४ एप्रिल रोजी येणाऱ्या अनुयायांसाठी मुंबई महापालिकेने राजगृहा समोरील पदपथावर अनेक फिरती शौचालय उभारली होती. स्थानिकांची या दिवसाबाबत तक्रारही नव्हती. तथापि आज १० दिवस उलटून गेले तरीही असंख्य अनुयायांनी वापरलेली ती फिरती शौचालये त्याच अवस्थेत असून मुंबई महापालिकेने अजून …

Read More »

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट जैन मुनीचे विधान जैन धर्माच्या अहिंसा तत्वाला छेद देणारे, खुलेआम गुंडगिरी करणाऱ्या शिवसेना आमदार संजय गायकवाडांवर तत्काळ कठोर कारवाई करा,

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येचे कोणी समर्थन करत असेल तर ते भारतीय संस्कृतीला धरून नाही. अहिंसा हे जैन धर्माचे तत्व आहे, त्यालाच ते छेद देणारे आहे. गांधी हत्येत सात आरोपी होते. त्यातील एक माफीचा साक्षिदार झाला, काहींना शिक्षा झाली. कपूर आयोगाचा अहवाल आहे, दिल्लीच्या लाल किल्ल्यातील न्यायालयाने शिक्षा ठोठावलेली आहे. …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचे आव्हान, आधी ‘बंच ऑफ थॉट’ व ‘मनुस्मृती’ जाळा मगच बोला भाजपा डिलीमिटेशनवर का बोलत नाही? मुंबई व महाराष्ट्राचा गायपट्टा करण्याचा भाजपा व देवेंद्र फडणवीसांचा डाव

भारतीय जनता पक्षाला महिला आरक्षणावर बोलण्याचा काहीही अधिकार नाही. भाजपाची विचारसणी ही गोलवलकर यांच्या बंच ऑफ थॉट तसेच मनुस्मृतीवर आधारीत आहे व यामध्ये महिलांना अतिशुद्र समजले आहे. चातुर्वर्ण्य व्यवस्थेचा स्विकार करणाऱ्या मनुवादी विचाराच्या पक्षाने आधी बंच ऑफ थॉट व मनुस्मृतीची होळी करावी व मगच महिला आक्षणावर बोलावे, तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक …

Read More »

वर्षा गायकवाड यांचे आव्हान, भाजपाला महिलांना आरक्षण द्यायचेच नाही, हिम्मत असेल तर…. तामिळनाडू, प. बंगालमधील विधानसभा निवडणुकीत राजकीय लाभ मिळवण्यासाठी महिला विधेयकाचा अस्त्रासारखा गैरवापर

महिला आरक्षणाचा मुद्दा पुढे करून भारतीय जनता पक्ष फक्त राजकीय पोळी भाजण्याचा उद्योग करत आहे. १६ एप्रिलच्या विशेष अधिवेशनात महिला आरक्षण विधेयक नाही तर मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाचा पराभव झाला आहे, कारण महिला आरक्षण विधेयक तर २०२३ मध्ये सर्वसंमतीने मंजूर झालेले आहे, त्याचा कायदाही बनला आहे, पण त्याची अंमलबजावणी मात्र भाजपा …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची टीका, विरोधकांची सतत महिला विरोधी भूमिका महिला आऱक्षण विधेयकाच्या पराभवावरून केली टीका

असलेल्या लोकसभा व विधानसभेच्या जागांमध्ये ५० टक्के वाढ होईल, म्हणजे कोणत्याही राज्यावर अन्याय होणार नाही असा निर्णय घेण्यात आला. उलट दक्षिणेतील राज्यांतून लोकसभेत २३.७६ टक्क्यांवरून २३.८७ टक्के प्रतिनिधित्व झाले असते. लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार लोकसंख्येच्या आधारावर लोकप्रतिनिधी निवडले जातात, त्यामुळे भारताच्या लोकसभेत ५४३ जागा जेव्हा असतील असे १९७१ मध्ये ठरले, तेव्हा लोकसंख्या …

Read More »

१२ वर्षे सत्तेत असलेल्या पंतप्रधान मोदी यांनी आरक्षण विधेयकप्रश्नी काँग्रेसला जबाबदार ठरवले महिला अधिकाराची भ्रुणहत्या केल्याची काँग्रेसवर टीका, सुधारीत विधेयक फेटाळले

संसदेत महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी देशातील “माता आणि मुलींची” माफी मागितली. तसेच, विरोधकांच्या “क्षुद्र राजकारणामुळे” महिलांच्या हक्कांची “गर्भहत्या (भ्रूणहत्या)” होत असल्याचा आरोप करत पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. देशाला उद्देशून केलेल्या ३० मिनिटांच्या भाषणात, आक्रमक पंतप्रधान मोदी यांनी अधोरेखित केले की, लोकसभेत …

Read More »

राहुल गांधी यांच्या जादूगार (मॅजिशिएन) शब्दावरून भाजपा खासदारांचा गोंधळ पंतप्रधान मोदी यांना उद्देशून जादूगर शब्द वापरल्याने गोंधळ

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत त्यांना “बालाकोट, नोटाबंदी आणि ऑपरेशन सिंदूरचे जादूगार” म्हटले, ज्यामुळे संसदेत खळबळ उडाली. या वक्तव्याचा भाजपने तीव्र शब्दांत निषेध केला असून, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह आणि किरेन रिजिजू यांनी हे असंसदीय असल्याचे म्हटले आहे आणि ते कामकाजाच्या नोंदीतून वगळण्याची …

Read More »

राहुल गांधी यांचा भाजपावर आरोप, भारताचा निवडणूक नकाशा चोरण्याचा प्रयत्न ओबीसींचे अधिकारही नाकारण्याचा प्रयत्न

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी संसदेत जोरदार हल्ला चढवला. महिला आरक्षण चौकट आणि मतदारसंघ पुनर्रचना यांच्यातील प्रस्तावित संबंधाचा वापर करून भारताचा निवडणूकीचा नकाशा चोरण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. राहुल गांधी यांनी असा युक्तिवाद केला की, २०२३ मध्ये मंजूर झालेले महिला आरक्षण विधेयक हा ‘खरा कायदा’ होता आणि …

Read More »