असलेल्या लोकसभा व विधानसभेच्या जागांमध्ये ५० टक्के वाढ होईल, म्हणजे कोणत्याही राज्यावर अन्याय होणार नाही असा निर्णय घेण्यात आला. उलट दक्षिणेतील राज्यांतून लोकसभेत २३.७६ टक्क्यांवरून २३.८७ टक्के प्रतिनिधित्व झाले असते. लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार लोकसंख्येच्या आधारावर लोकप्रतिनिधी निवडले जातात, त्यामुळे भारताच्या लोकसभेत ५४३ जागा जेव्हा असतील असे १९७१ मध्ये ठरले, तेव्हा लोकसंख्या …
Read More »१२ वर्षे सत्तेत असलेल्या पंतप्रधान मोदी यांनी आरक्षण विधेयकप्रश्नी काँग्रेसला जबाबदार ठरवले महिला अधिकाराची भ्रुणहत्या केल्याची काँग्रेसवर टीका, सुधारीत विधेयक फेटाळले
संसदेत महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी देशातील “माता आणि मुलींची” माफी मागितली. तसेच, विरोधकांच्या “क्षुद्र राजकारणामुळे” महिलांच्या हक्कांची “गर्भहत्या (भ्रूणहत्या)” होत असल्याचा आरोप करत पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. देशाला उद्देशून केलेल्या ३० मिनिटांच्या भाषणात, आक्रमक पंतप्रधान मोदी यांनी अधोरेखित केले की, लोकसभेत …
Read More »राहुल गांधी यांच्या जादूगार (मॅजिशिएन) शब्दावरून भाजपा खासदारांचा गोंधळ पंतप्रधान मोदी यांना उद्देशून जादूगर शब्द वापरल्याने गोंधळ
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत त्यांना “बालाकोट, नोटाबंदी आणि ऑपरेशन सिंदूरचे जादूगार” म्हटले, ज्यामुळे संसदेत खळबळ उडाली. या वक्तव्याचा भाजपने तीव्र शब्दांत निषेध केला असून, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह आणि किरेन रिजिजू यांनी हे असंसदीय असल्याचे म्हटले आहे आणि ते कामकाजाच्या नोंदीतून वगळण्याची …
Read More »राहुल गांधी यांचा भाजपावर आरोप, भारताचा निवडणूक नकाशा चोरण्याचा प्रयत्न ओबीसींचे अधिकारही नाकारण्याचा प्रयत्न
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी संसदेत जोरदार हल्ला चढवला. महिला आरक्षण चौकट आणि मतदारसंघ पुनर्रचना यांच्यातील प्रस्तावित संबंधाचा वापर करून भारताचा निवडणूकीचा नकाशा चोरण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. राहुल गांधी यांनी असा युक्तिवाद केला की, २०२३ मध्ये मंजूर झालेले महिला आरक्षण विधेयक हा ‘खरा कायदा’ होता आणि …
Read More »राहुल गांधी यांचा आरोप, विधेयकावर संविधानापेक्षा मनुवादाचा प्रभाव लोकसभेत बोलताना पंतप्रधान मोदी यांना उद्देशून म्हणाले, पंतप्रधांनांना पत्नी बद्दलच्या समस्या नाहीत
महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना यावरील विशेष अधिवेशनादरम्यान बोलताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले की, देशाच्या राष्ट्रीय कल्पनेत महिला एक प्रेरक शक्ती आहेत. त्यांनी नमूद केले की, प्रत्येकजण आपल्या आयुष्यात महिलांमुळे प्रभावित आणि घडला आहे, आणि समाजात त्यांची महत्त्वाची भूमिका अधोरेखित केली. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी संसदेत …
Read More »पवन खेरा यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा नाही आसामधील न्यायालयाकडे दाद मागण्याचे दिले आदेश
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या पत्नीकडे अनेक पासपोर्ट आणि परदेशी मालमत्ता असल्याच्या काँग्रेस प्रवक्ते पवन खेरांच्या आरोपांवरून,दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात काँग्रेस नेते पवन खेरा यांना मंजूर केलेल्या अंतरिम जामिनाला सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दुसऱ्यांदा स्थगिती दिली. आसाममधील न्यायालये बंद असल्याचे कारण देत, पवन खेरा यांनी तेलंगणा उच्च न्यायालयाने मंजूर केलेल्या …
Read More »महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्यावरून भाजपा अडकली स्वतःच्या जाळ्यात विरोधकांकडून भाजपाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न
“जर चाणक्य हयात असते, तर तुमच्या कपटाने तेही थक्क झाले असते,” अशा शब्दांत काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांनी महिला आरक्षण विधेयकावरील चर्चेदरम्यान अमित शाह यांच्यावर उपरोधिक टीका केली. स्वतः एक धूर्त राजकारणी असलेल्या प्रियांका यांनी ‘एनडीए’ची (NDA) रणनीती उघडी पाडली. महिला आरक्षणाचा मुद्दा वादग्रस्त अशा ‘सीमानिश्चिती’च्या (delimitation-डिलीमीटेशन) प्रक्रियेशी जोडून, ’एनडीए’ने …
Read More »हर्षवर्धऩ सपकाळ यांची मागणी, कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारकडून वाटाण्याच्या अक्षता राजू शेट्टींनी कोकणातील शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी सुरु केलेल्या आंदोलनाला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा
कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही मदत केली नाही. ग्लोबल वॉर्मिंगचा मोठा फटका कोकणातील शेतकऱ्यांना बसल्याने ते हवालदिल झाले आहेत, त्यांना भरीव मदत करण्याची गरज आहे. शेतकरी जगला पाहिजे ही काँग्रेसची भूमिका असून कोकणच्या शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत मिळावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, सीबीआयचे दोनवेळा छापे, मग महाराष्ट्र पोलीस काय करत होते? महाराष्ट्रात ‘जामतारा’ सारख्या बोगस कॉल सेंटरच्या माध्यमातून कोट्यवधींच्या लूटीचा गोरखधंदा;
ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार सगळीकडे जोरात सुरु असून ‘जामतारा’ रॅकेट यासाठी कुप्रसिद्ध आहे पण ‘जमतारा’ प्रमाणेच महाराष्ट्रातही अशा बोगस कॉल सेंटरच्या माध्यमातून जगभरातील नागरिकांना फसवून शेकडो कोटी रुपयांचा गोरखधंदा सुरु आहे, असा गंभीर आरोप करत या प्रकरणात आयपीएस अधिकारी दत्ता कराळे व दोन पोलीस अधिक्षक यांचाही सहभाग असल्याचा गौप्यस्फोट काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन …
Read More »प्रियांका गांधी यांचा आरोप, महिला आरक्षण विधेयकाला राजकारणाचा वास पंतप्रधान मोदी यांनी विधेयकाची माहिती पूर्ण दिली नाही
काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी लोकसभेत महिला आरक्षण विधेयकावरील चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आणि या कायद्याबाबत सरकारच्या भूमिकेवर निशाणा साधला. प्रियांका गांधी यांनी या प्रस्तावाच्या हाताळणीवर आणि वेळेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले, तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते अंमलबजावणीबाबत स्पष्टतेसाठी दबाव आणत आहेत. महिलांच्या आरक्षणाच्या चौकटीवरून सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांमध्ये …
Read More »
Marathi e-Batmya