मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार स्थानापन्न होवून आठवडा होत आला आहे. मात्र हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर संपूर्ण मंत्रिमंडळाचा विस्तार होईल आणि पहिल्यांदा शपथ घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांसह ७ मंत्र्यांचे खातेवाटपही होईल अशी अटकळ बांधली जात होती. मात्र मंत्रिमंडळातील उपमुख्यमंत्री पदावरून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जुंपली असल्याने मंत्र्यांच्या खात्याचे वाटप आणि मंत्रिमंडळ विस्तार …
Read More »नाना पटोलेंची विधानसभा अध्यक्षपदी निवड बिनविरोध निवड झाल्याचे हंगामी अध्यक्षांकडून जाहीर
मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील सत्तास्थापनेवर महाविकास आघाडीने विश्वासदर्शक ठराव जिंकत राजकिय नाट्यावर तुर्तास पडदा पडला. त्यामुळे सांसदीय राजकारणातील पुढील कायमस्वरूपी विधानसभा अध्यक्षाच्या निवडीसाठी घेण्यात आलेल्या निवडणूकीतून भाजपाचे उमेदवार किसन कथोरे यांनी माघार घेतल्याने काँग्रेसच्या नाना पटोले यांनी बिनविरोध निवड करण्यात आली. यासंदर्भातची घोषणा विधानसभेचे हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी सभागृहात …
Read More »विधानसभेत मविआच्या १६९ मतांना पाहून भाजपाने केला सभात्याग मनसे आणि मार्क्सवादी आणि एमआयएम तटस्थ
मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यात सत्ता स्थापनेवरून निर्माण झालेल्या राजकिय नाट्यावर आज शनिवारी शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीवर १६९ आमदारांनी विश्वास दाखविल्याने पडदा पडला. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर महाविकास आघाडीच्या सर्वच आमदारांबरोबर बहुजन विकास आघाडीच्या दोन, प्रहार संघटनेच्या एक आणि एका अपक्ष आमदाराने विश्वास दाखविला. विशेष म्हणजे बहुमत …
Read More »शरद पवार करणार मविआच्या माध्यमातून देशाच्या राजकारणात नवी नांदी भाजपेतर पक्षांच्या आघाडीचे पुन्हा एकदा यशस्वी प्रयत्न?
मुंबईः विशेष प्रतिनिधी विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सातारा आणि सोलापूरात केलेल्या घोषणेनुसार राज्यातील भाजपाच्या नेतृत्वाखालील सत्ता उलथवून टाकल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याची आणि अनेकांना घरी बसविल्याशिवाय मी घरी जाणार नसल्याची घोषणा केली. त्यानुसार शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी राज्यातील महाविकास आघाडीच्या माध्यमातून मुख्यमंत्री पदाची शपथ …
Read More »शिकाँराकडून राज्यपालांच्या कार्यालयाकडे सत्ता स्थापनेचा दावा शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून दाव्याचे पत्र सादर
मुंबईः प्रतिनिधी राज्याच्या मुख्यमंत्री पदी भाजपा नेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र या दोघांच्या सरकारला बहुमताचे संख्याबळ नसून ते संख्याबळ शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या राजकिय आघाडीला असल्याचा दावा या तिन्ही पक्षांनी करत सत्ता स्थापन करण्यासाठी निमंत्रित करावे अशी मागणी या …
Read More »काळे कारनामे करून लपून छपून मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी घेतली शपथ महाराष्ट्राच्या इतिहासात आजचा दिवस काळ्या अक्षरात लिहिला जाईलः खा. अहमद पटेल
मुंबईः प्रतिनिधी रात्रीच्या अंधारात काळे कारनामे करून आज सकाळी कोणालाही न सांगता लपून छपून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली. यामागे काळेबेरे आहे, हे निश्चित. भाजपने निर्लज्जपणाचा कळस गाठला असून संविधानाची पायमल्ली केली जात आहे. आजचा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासात काळ्या अक्षरात लिहीला जाईल अशी घणाघाती टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खा. अहमद …
Read More »शिकाँरात आम्ही आहोत…राहणार आणि सरकारही येणार राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या संयुक्त पत्रकार परिषदेत शरद पवारांची घोषणा
मुंबईः प्रतिनिधी भाजपासोबत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय हा अजित पवार यांचा वैयक्तिक निर्णय असून त्यास राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा नाही. त्याचबरोबर जे आमदार त्यांच्यासोबत गेले ते परत आमच्याशी संपर्क साधून आमच्याकडे येत असल्याचे सांगत शिकाँरा अर्थात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आहोत, एकत्र राहणार असून राज्यात या तीन पक्षाचे सरकार येणार …
Read More »भाजपा वगळून सत्ता स्थापन करण्याची काँ-राच्या मित्रपक्षांची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व मित्रपक्षांच्या आघाडीची बैठक संपन्न
मुंबईः प्रतिनिधी सरकार स्थापन करण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये जी चर्चा झाली याबाबतची संपूर्ण माहिती आघाडीतील मित्र पक्षांना देण्यात आली असून भाजप वगळून सरकार स्थापन व्हावे असे मित्र पक्षांनाही वाटत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांची आघाडीतील मित्रपक्षाच्या …
Read More »सत्ता स्थापनेच्या चर्चेमागे महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याचा घाट वबआचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचा आरोप
मुंबईः प्रतिनिधी विधानसभा निवडणूकीचे निकाल जाहीर झाल्यापासून राज्यात सत्ता स्थापनेसाठी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चर्चेच्या फेरीचे नाट्य घडवून आणले जात आहे. मात्र या चर्चेच्या मागे महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याचा घाट घालण्यात येत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी केला. गेल्या महिनाभराच्या कालावधीत महाराष्ट्रातील जनता सरकार स्थापनेच नाट्य …
Read More »शिकाँरासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी लवकरच शिवसेनेशी चर्चा करणार राष्ट्रवादीच्या साक्षीने काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांची माहिती
नवी दिल्लीः प्रतिनिधी राज्यात शिकाँरा अर्थात शिवसेनेच्या नेतृत्वाखालील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार स्थापन करण्यासंदर्भातील काँग्रेस-राष्ट्रवादीतील चर्चा पूर्ण झाली आहे. या चर्चेची माहिती लवकरच आघाडीतील घटकपक्षांना देण्यात येणार असून त्यानंतर लवकरच पुढील चर्चा शिवसेनेशी करणार असल्याची माहिती काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. नवी दिल्लीत काँग्रेस, राष्ट्रवादीमधील चर्चेची शेवटची फेरी …
Read More »
Marathi e-Batmya