Tag Archives: congress

मुंबईत सर्वाधिक उमेदवार वरळी आणि मुंबादेवी विधानसभा मतदारसंघात ५ उमेदवारांनी घेतली माघार एकूण उमेदवार ८९ रिंगणात

मुंबईः प्रतिनिधी विधानसभा निवडणूक-२०१९ मुंबई शहर जिल्ह्यांतर्गत १० विधानसभा मतदार संघात सर्वाधिक उमेदवार वरळी आणि मुंबादेवी मतदारसंघात आहेत. यातील वरळी विधानसभा मतदारसंघात १३ उमेदवार रिंगणात आहेत. तर मुंबईदेवी विधानसभा मतदारसंघात १२ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. नामनिर्देशन पत्र मागे घेण्याच्या आज शेवटच्या दिवशी ३ मतदारसंघातून ५ उमेदवारांनी माघार घेतली. उमेदवारी अर्ज …

Read More »

राष्ट्रवादी काँग्रेसची अंतिम यादी अर्ज छाननीनंतर होणार जाहीर अंतिम यादी ७ तारखेला जाहीर करणार

मुंबईः प्रतिनिधी विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमधील सर्वाधिक नेते, आमदारांनी पक्षांतर करत भाजपात प्रवेश केला. तरीही राष्ट्रवादीकडून नव्या दम्याच्या उमेदवारांना उमेदवारी देत आपला बालेकिल्ला लढविण्याचा प्रयत्न सुरु केला. परंतु राष्ट्रवादीकडून अद्याप अंतिम उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली नसली तरी ही अंतिम यादी अर्ज छाननीनंतर ७ ऑक्टोंबर रोजी जाहीर करण्यात येणार …

Read More »

शासकीय संकेतस्थळांवरील मुख्यमंत्र्यांच्या जाहिराती तात्काळ बंद करा काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांची निवडणूक अधिका-यांकडे मागणी

मुंबईः प्रतिनिधी राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असताना अद्यापही शासकीय संकेतस्थळांवरती मुख्यमंत्री आणि शासनाच्या जाहिराती दिसत आहेत. https://cmo.maharashtra.gov.in/ , https://maharashtra.mygov.in या शासकीय संकेतस्थळावर अद्याप मुख्यमंत्र्यांच्या जाहिराती झळकत आहेत. हा सरळसरळ आचारसंहिता भंगाचा गुन्हा आहे. या जाहिराती तात्काळ बंद करण्याचे आदेश संबंधितांना द्यावेत आणि मुख्यमंत्र्यांविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करावा …

Read More »

चंद्रकांत दादा, शिवस्मारकावर एकदा होवूनच जाऊ द्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे खुल्या चर्चेचे आव्हान

मुंबईः प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्राचे नाही तर संपूर्ण देशाचे अराध्य दैवत आहेत. त्यांच्या स्मारकात झालेला भ्रष्टाचार हा अतिशय संतापजनक व असहनीय आहे. सरकारकडून या प्रकाराची चौकशी करण्याकरिता टाळाटाळ केली जात असून भ्रष्टाचार झाकण्यासाठी धादांत खोटी उत्तरे दिली जात आहेत. त्यामुळे सरकारतर्फे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी …

Read More »

अरबी समुद्रातील छत्रपतींच्या शिवस्मारकात १ हजार कोटींचा भ्रष्टाचार केंद्रीय दक्षता समितीकडे तक्रार करणार अन्यथा कोर्टात दाद मागणार असल्याची काँग्रेस-राष्ट्रवादीचा इशारा

मुंबईः प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील अश्वारूढ स्मारकात मुख्यमंत्र्यांच्या खात्याकडून एक हजार कोटीचा भ्रष्टाचार झाला असून याबाबत केंद्रीय दक्षता समितीकडे तक्रार करणार आहे. या तक्रारीची त्यांनी दखल घेतली नाही तर कोर्टात दाद मागणार आहे असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत …

Read More »

राज्य सहकारी बँकेसंदर्भातील कारवाई राजकीय हेतूने प्रेरित हिम्मत असेल तर युती सरकारच्या भ्रष्ट मंत्र्यांवर कारवाई करुन दाखविण्याचे काँग्रेसचे आव्हान

मुंबईः प्रतिनिधी सरकारच्याविरोधात आवाज उठवणाऱ्यांना भीती दाखवण्यासाठी आणि विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी ईडीसारख्या सरकारी यंत्रणांचा भाजप सरकारकडून गैरवापर केला जात असल्याचा आरोप करून हिम्मत असेल तर युती सरकारमधील भ्रष्ट मंत्र्यांवर कारवाई करून दाखवावी असे आव्हान विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिले. युती सरकारच्या भ्रष्ट कारभाराचा पंचनामा काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी वारंवार …

Read More »

शिवस्मारक उभारता न आल्याचे विरोधकांना शल्य प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांची टीका

मुंबईः प्रतिनिधी पंधरा वर्ष राज्य करण्याची संधी मिळून सुद्धा अरबी समुद्रात शिवस्मारक उभारता न आल्याचे शल्य तर विरोधकांच्या मनात आहेच. पण, आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांचे मोठ्या प्रमाणात भाजपाकडे वळणे, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या फारच जिव्हारी लागल्यासारखे दिसते आहे, अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केली. मुळात अभ्यास न करता पत्रपरिषदा घेणे, …

Read More »

भ्रष्ट आणि लज्जाहीन भाजपा शिवसेना सरकारचा शिवस्मारकातही भ्रष्टाचार! न्यायालयीन चौकशी करण्याची काँग्रेस-राष्ट्रवादीची संयुक्त मागणी

मुंबईः प्रतिनिधी शिवछत्रपतींचा आर्शिवाद, चला देऊ मोदींना साथ अशा घोषणा देऊन सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने शिवाजी महाराजांना देखील सोडले नाही. राज्यातील २१ मंत्र्याचे भ्रष्टाचार पुराव्यानिशी समोर आल्यावर क्लीन चीट चे वाटप करत स्वतः च्या प्रतिमेवर कोणताही डाग नाही असे म्हणणा-या भ्रष्ट आणि लज्जाहीन भाजप सरकारने शिवस्मारकातही भ्रष्टाचार करण्याचे पाप केल्याचा …

Read More »

लॉर्ड माऊंटबँटनचे ओएसडी म्हणतात जम्मू -काश्मीरचा प्रश्न नेहरूंमुळे नव्हेतर ब्रिटीशांमुळे राजकिय गुंतागुत केवळ ब्रिटीशांनी निर्माण केली

दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूक प्रचाराचा नारळ फोडताना भाजपाध्यक्ष तथा देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी देशाचा अविभाज्य भाग असलेल्या जम्मू आणि काश्मीरला लागू असलेले ३७० कलम आणि ३५ ए हे कलम काढून टाकल्यामुळे हे राज्य पूर्णतः आता भारताचे झाले आहे. त्याचबरोबर नेहरूंच्या एका चुकीमुळे जम्मू आणि काश्मीरचा अर्धाभाग पाकिस्तानकडेच राहीला. …

Read More »

मुख्यमंत्र्यांमुळेच पोलिसांची पगार खाती अ‍ॅक्सिस बँकेकडे मुख्यमंत्र्यांनी तात्काळ पदाचा राजीनामा देऊन चौकशीला सामोरे जाण्याची काँग्रेस नेते नाना पटोले यांची मागणी

मुंबईः प्रतिनिधी पोलिसांची पगाराची खाती अ‍ॅक्सिस बँकेकडे वर्ग करताना मुख्यमंत्र्यांनी पदाचा दुरुपयोग केला असून मुख्यमंत्र्यांनी तात्काळ पदाचा राजीनामा देऊन चौकशीला सामोरे जावे अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रचार समितीचे अध्यक्ष माजी खा. नाना पटोले यांनी केली. गांधी भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पोलिसांची पगाराची खाती अ‍ॅक्सिस …

Read More »