Tag Archives: election commission of india

काँग्रेससह विरोधकांचा आरोप, मतचोरीचा नवा फंडा १२ राज्यात एसआयआर बिहारनंतर आता आता १२ राज्यात खेळ

काँग्रेसने सोमवारी निवडणूक आयोगावर मोदी सरकारशी संगनमत करून मतदार यादीच्या विशेष सघन पुनरावृत्ती (एसआयआर) अंतर्गत १२ राज्यांमध्ये “मत चोरीचा खेळ” राबवल्याचा आरोप केला. पक्षाने आरोप केला की बिहारच्या सुधारणेच्या मोहिमेनंतर, ज्यामध्ये ६९ लाख नावे वगळण्यात आली होती, आता तीच “मतदार फेरफार करण्याची पद्धत” देशभरात पसरवली जात आहे. एक्स X वर …

Read More »

१२ राज्ये, केंद्र शासित प्रदेशांमध्ये निवडणूक आयोगाने जाहिर केला एसआयआर निवडणूक आयोगाकडून एसआयआरचा दुसरा टप्पा जाहिर

भारतीय निवडणूक आयोगाने २८ ऑक्टोबर २०२५ पासून १२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार यादीच्या विशेष सघन पुनरीक्षणाचा दुसरा टप्पा जाहीर केला. उद्यापासून ज्या १२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये विशेष सघन पुनरीक्षण (SIR) सुरू होईल त्यामध्ये अंदमान आणि निकोबार बेटे, गोवा, पुडुचेरी, छत्तीसगड, गुजरात, केरळ, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, पश्चिम …

Read More »

निवडणूक आयोगाकडून लवकरच देशभरात एसआयआर तारखा लवकरच करणार असल्याची निवडणूक आयोगातील अधिकाऱ्यांची माहिती

निवडणूक आयोग (EC) २७ ऑक्टोबर रोजी अनेक राज्यांमध्ये मतदार यादीच्या विशेष सघन पुनरावृत्ती (SIR) चा वेळापत्रक जाहीर करेल, असे अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले. ही माहिती दुपारी ४.१५ वाजता आयोजित केली जाईल आणि त्याचे अध्यक्षपद मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याकडे असण्याची शक्यता आहे. निवडणूक मंडळाच्या माध्यम निमंत्रणात या विषयाचा स्पष्टपणे उल्लेख …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, मतांची चोरी करून मोदी पंतप्रधान तर फडणवीस मुख्यमंत्री झाले मतचोरीचे सर्व पुरावे देऊनही निवडणूक आयोग गप्प, आयोगाविरोधात मोर्चा निघत असेल तर काँग्रेसचे समर्थनच

देशात व महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचे आलेले सरकार हे मतचोरी करून आलेले आहे. मतचोरी करूनच नरेंद्र मोदी पंतप्रधान तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आहेत म्हणूनच निवडणूक आयोगाची पाठराखण भारतीय जनता पक्ष व देवेंद्र फडणवीस करत आहेत, असा ह्ल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. यासंदर्भात बोलताना काँग्रेस …

Read More »

राज ठाकरे यांचा आरोप, महाराष्ट्राच्या मतदार याद्यांमध्ये ९६ लाख खोटे मतदार घुसवले निवडणूक आयोगाने सत्ताधाऱ्यांच्या मदतीसाठी केले कृत्य

दिवाळी सणाच्या तिसऱ्या दिवशी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज रविवारी मनसे कार्यकर्त्यांचा आयोजित मेळाव्यात मार्गदर्शन करताना म्हणाले की, २०१८ साली मी निवडणूक आयोगाच्या कामकाजासंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यामुळे मी ईव्हीएम मशिन्सबाबत शंका उपस्थित केली होती. परंतु त्यावेळी कोणी आपल्या म्हणण्याकडे कोणी लक्ष दिले नव्हते. त्यानंतर आज निवडणूक आयोगाच्या …

Read More »

संजय राऊत यांचा इशारा, निवडणूक आयोगाला दणका देणं गरजेचं लोकशाहीच्या रक्षणासाठी महाराष्ट्र कसा लढतोय हे देशाला दाखवून देणार

निवडणूक आयोगाने सत्ताधाऱ्यांच्या फायद्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक शहरातील आणि मतदार संघांच्या याद्यांमध्ये घुसवले असल्याचा गंभीर आरोप मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज केला. तसेच मतदार याद्यातील घोळ जोपर्यंत दुरुस्त केला जात नाही तोपर्यंत निवडणूका घेऊ नये अशी मागणी करत गेल्या पाच वर्षापासून महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका झालेल्या नाहीत. आम्ही आणखी …

Read More »

रोहित पवार यांचा आरोप, सर्वसामान्य जनतेचा निवडणूक आयोगावर विश्वास राहिला नाही निवडणूक आयोगाला १० प्रश्नांची उत्तरे देण्याची केली मागणी

दुबार मतदान, खोटे मतदार नोंदणीसाठी आधार कार्डचा सगळ्यात मोठा वापर झाल्याचा आरोप करत, हेराफेरी कशी होते, हे या जगातील सर्वात ताकदवान व्यक्ती डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव माझ्या मतदारसंघात नोंदवू, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आज मुंबई येथे पत्रकारांशी संवाद साधताना महाराष्ट्रातील मतदान प्रक्रियेमध्ये होणाऱ्या अनियमिततांचा …

Read More »

आमदार रईस शेख यांची स्पष्टोक्ती, एसआयआरकडे लक्ष देण्यास राजकिय पक्षांना वेळ नाही केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली मागणी, स्थानिक निवडणूकांना समांतर केल्यास अनेकांची नावे कापली जाण्याची शक्यता

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान राज्यात मतदार याद्या पुर्ननिरिक्षण (Special Intensive Revision – SIR) करण्याचे काम हाती घेतल्यास राजकीय पक्ष व कार्यकर्त्यांना वेळ असणार नाही. परिणामी, मतदारांची मोठ्या संख्येने नावे कापली जातील, अशी भीती व्यक्त करत निवडणुका संपल्यानंतर फेब्रुवारीनंतर हा कार्यक्रम घ्यावा, अशी मागणी समाजवादी पक्षाचे ‘भिवंडी पूर्व’चे आमदार रईस शेख …

Read More »

राहुल गांधी यांच्या आरोपाला केंद्रीय निवडणूक आयोगाचे डिजीटली उत्तर आरोपच चुकीचे असल्याचा निवडणूक आयोगाचे उत्तर

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेत कर्नाटकातील आळंद मतदारसंघात आणि महाराष्ट्रातील राजुरा मतदारसंघातील मतदारांची नावे डिलीट आणि समाविष्ट करण्याच्या कामात कशा पद्धतीने हलगर्जीपणा झाला त्यातून मतचोरीचे  प्रकार कशा पद्धतीने घडले याचा पर्दाफाश केला. तसेच राहुल गांधी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या गलथान आणि चमडी बचाव कामकाज पद्धतीवर टीका …

Read More »

केशव उपाध्ये यांचा आरोप, राहुल गांधी हे मतचोरीचे बादशाह मतचोरीच्या खोट्या आरोपांबद्दल राहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी

उठसूठ मतचोरीचा डांगोरा पिटणारे राहुल गांधी हे मतचोरीचे बादशाह आहेत. गवगवा करून पत्रकार परिषदा घ्यायच्या, व्हिडिओ सादरीकरण करायचे, काँग्रेसच्या इको सिस्टिमने मतचोरीचा खोटा मुद्दा उचलून धरायचा आणि कोणताही पुरावा सादर न करता केवळ हवा निर्माण करायची हा सध्या काँग्रेसचा धंदा झाला आहे. मतचोरीचा खोटा आरोप करण्याबद्दल राहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी. …

Read More »