देवगडः प्रतिनिधी राज्यातील शहरांबरोबर गावे ही विकासित व्हावीत या उद्देशाने राज्य सरकारकडून स्मार्ट गावांची योजना जाहीर केली. या योजनेत पहिली ग्रामपंचायत म्हणून देवगड तालुक्यातील बापर्डे ग्रामपंचायतीची निवड करण्यात आली. परंतु या ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक शिवराज राठोड, सरपंच श्रीकांत नाईकधुरे यांनी संगनमताने गावात विकासकामे न करताच ५० लाखाहून अधिक रकमेचा भ्रष्टाचार केल्याची …
Read More »बीड जिल्हयात निर्भीड आणि निष्पक्ष वातावरणात निवडणुका घ्या एस.पी. आणि पी.आय.पाळवदेची जिल्हयाबाहेर बदली करण्याची विरोधी पक्षनेते मुंडे यांची मागणी
मुंबईः प्रतिनिधी बीड जिल्ह्यातील पोलीस प्रशासन सत्ताधाऱ्यांच्या मर्जीने काम करीत असल्यामुळे बीड जिल्ह्यात निर्भीड आणि निष्पक्ष वातावरणात निवडणुका होणार नाही त्यामुळे निवडणूक आयोगाने यात लक्ष घालावे अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. या निवडणुका भयमुक्त वातावरणात व्हाव्यात यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख आणि स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस …
Read More »दानवेंच्या विरोधातील खोतकरांची तलवार अखेर म्यान मुख्यमंत्री फडणवीस उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत पडला पडदा
औरंगाबाद : प्रतिनिधी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे मंत्री अर्जुन खोतकर यांच्यातील वादावर तोडगा काढण्यासाठी व त्यांची नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात एका हॉटेलमध्ये बैठक झाली. मात्र या बैठकीत हवा तसा तोडगा न निघाल्याने खोतकर यांनी काहीशा नाराजीनेच आपली तलवार म्यान करत …
Read More »जालन्यात मैत्रीपुर्ण लढतीबाबत आग्रही शिवसेनेचे अर्जुन खोतकर दानवेंच्या विरोधावर ठाम
मुंबईः प्रतिनिधी जालना लोकसभा मतदारसंघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उमेदवारीला आजही विरोध आहे. यासंदर्भात शनिवारी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यासमोर माझ्याकडून जालन्यात मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव ठेवला आहे. त्याबाबत निर्णय झालेला नसला तरी यावर उद्याच्या बैठकीत अंतिम निर्णय होणार असल्याचे सांगत अन्यथा…असा सूचक इशाराही शिवसेनेचे मंत्री अर्जुन खोतकर यांनी दिला. …
Read More »भ्रष्टाचारप्रकरणी महिला व बालविकास मंत्र्यांची हकालपट्टी करा काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांची मागणी
मुंबई: प्रतिनिधी महिला व बालविकास विभागातर्फे घरपोच आहाराचे सुमारे ६ हजार ३०० कोटी रूपयांचे कंत्राट सर्वोच्च न्यायालयाने रद्द करून सरकारचे तोंड काळे केले आहे. याच निर्णयाद्वारे बालकांना शिजवलेले गरम अन्न देण्याऐवजी प्रिमिक्स पाकिटे देण्याचे कंत्राट सरकारने याच माफियांना दिले होते. ते ही सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे. या संपूर्ण प्रकरणात प्रचंड …
Read More »महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विजया रहाटकर यांची फेरनियुक्ती
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विजया रहाटकर यांची फेरनियुक्ती राज्य सरकारने केली. त्यांचा कार्यकाळ तीन वर्षांचा राहणार आहे. माझी फेरनियुक्ती केल्याबद्दल मी राज्य सरकारचे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महिला व बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे यांचे आभार मानते. गेल्या तीन वर्षांत आयोगाने महिलांच्या अनेक प्रश्नांना हात घातलेला …
Read More »भाजपमधील आणखी एका मंत्र्याचा खडसे करण्याच्या हालचाली
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मंत्र्याच्या दालन आणि बंगल्यावर छुपा पहारा मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या मंत्रिमंडळातील डोईजड होणाऱ्या मंत्र्यांना वैदर्भीय दणका देत पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी शिल्लक ठेवायचा नसल्याची रणनीती आखण्यात येत आहे. काही वर्षापूर्वी माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनाही असाच दणका देत पक्ष आणि सत्तेबाहेर ठेवण्यात आले. अगदी त्याच पध्दतीने मंत्रालयातील चवथ्या …
Read More »गोपीनाथ मुंडे यांच्या हत्येची सखोल चौकशी करणार
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे आश्वासन हिंगोली – वसमतनगर: प्रतिनिधी ईव्हीएम मशिन्स हँक करण्यासंदर्भातील माहिती स्व. गोपीनाथ मुंडे असल्यानेच त्यांची हत्या झाल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट सुप्रसिध्द हँकर सय्यद सुजी याने केला. त्यानंतर भाजप मधील ज्येष्ठ नेत्यांनी बोलण्याचे टाळलेले असले तरी सत्तेत आल्यानंतर स्व.मुंडे यांच्या मृत्यूला कोण जबाबदार आहे हे शोधण्याची …
Read More »गोपीनाथ मुंडे हत्याप्रकरणी पंकजा मुंडे यांचे मौन
मंत्रिमंडळ बैठकीला ही गैरहजेरी मुंबई: प्रतिनिधी ईव्हीएम मशिन्स हँकींगबाबतची माहिती भाजप नेते तथा ग्रामविकास मंत्री स्व.गोपीनाथ मुंडे यांना असल्यानेच त्यांची हत्या झाल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट आंतरराष्ट्रीय हॅकर सय्यद सुजी यांने लंडन येथील पत्रकार परिषदेत काल सोमवारी केला. त्यामुळे महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. राज्याच्या मंत्रिमंडळात महिला व बाल कल्याण आणि …
Read More »शाळाबाह्य मुलींसाठीच्या पूरक पोषणासाठी आता साडेनऊ रूपये मिळणार
राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय मुंबई : प्रतिनिधी शाळाबाह्य मुलींच्या पूरक पोषणासाठी राज्यातील अकरा जिल्ह्यांत केंद्र पुरस्कृत SAG ( Scheme for Adolescent Girls) अर्थात किशोरवयीन मुलींसाठी सुधारित योजना राबविण्यात येणार असून या योजनेच्या लाभात प्रतिदिन पाच रूपयांवरुन साडेनऊ रूपये एवढी वाढ करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. याबरोबरच या मुलींना व्यावसायिक किंवा …
Read More »
Marathi e-Batmya