अहमदनगर: प्रतिनिधी देहव्यापारातील बळी महिलांतर्फे कोल्हापूर, सांगली ,बेळगाव भागातील पूरग्रस्तांसाठी आज ११ हजार रुपयांचा आर्थिक सहयोग देण्यात आला.यात ३ हजार रुपये रोख तर ८ हजार रुपये धनादेशाद्वारे शासनास देण्यात आले. यापूर्वी स्नेहालय-अनाम प्रेम परिवाराने पूरग्रस्त भागात २ ट्रकद्वारे पाठविलेल्या आणि वितरित केलेल्या वस्तुरूप सहयोगात ६० हजार रुपयांचा किराणा या महिलांनी …
Read More »पूरग्रस्त ग्रामीण भागातील घरांच्या दुरुस्तीसाठी पंतप्रधान आवास योजनेतून मदत पुररेषेच्या आतील निवासी अतिक्रमणांनाही मदत करणार असल्याची मंत्री मुंडे यांची माहिती
मुंबई: प्रतिनिधी पूरग्रस्त ग्रामीण भागातील वाहून गेलेली किंवा पडलेली घरे दुरुस्त करुन देण्यासाठी किंवा बांधून देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेतून मदत करण्यात येईल. पुररेषेच्या आतील नुकसान झालेल्या घरांनाही ग्रामविकास विभागाच्या निवासी अतिक्रमणे नियमानुकूल करुन देण्याच्या योजनेंतर्गत इतरत्र घर बांधून देण्यासाठी मदत केली जाईल. ग्रामीण भागात नुकसान झालेल्या घरांचा इत्यंभूत आराखडा आठ …
Read More »केंद्रीय मंत्री इराणी म्हणाल्या, महिला व बाल कल्याण विभागाचे काम चांगले मुख्यमंत्री फडणवीस यांच्याबरोबरील बैठकीत स्मृती इराणी यांचे प्रशंसोद्गार
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राचे महिला व बालकल्याण क्षेत्रातील काम उल्लेखनीय आहे. कुपोषणमुक्ती, माता व बाल आरोग्य यातही उत्कृष्टपणे काम सुरू असल्याचे प्रशंसोद्गार केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी आज येथे काढले. केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा शासकीय निवासस्थानी भेट …
Read More »राज्यात प्रथमच शेळ्या-मेंढ्यांसाठी चारा छावणी सुरू करणार छावण्यांमधील जनावरांसाठी टॅंकरद्वारे पाणी देण्याचा निर्णय
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील दुष्काळी भागात सुरू असलेल्या चारा छावण्यांमधील जनावरांसाठी टॅंकरद्वारे पाणी देण्याचा तसेच राज्यात प्रथमच शेळ्या-मेंढ्यांसाठी छावणी सुरू करण्याचा निर्णय मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला. चारा छावण्यांची बिले देण्यास विलंब करू नये, चारा छावण्यांच्या ठिकाणी तात्पुरते स्वच्छतागृहे सुरू करण्याचे …
Read More »टँकर देण्यासाठी २०१८ च्या लोकसंख्येचा आधार घ्या मराठवाड्यातील ३ जिल्ह्याच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश
मुंबई : प्रतिनिधी पाण्याचे टँकर सुरू करताना २०११ची लोकसंख्या लक्षात न घेता 2018 ची लक्षात घेऊन पिण्याचा पाणी पुरवठा करावा. जनावरांसाठी याच पद्धतीने पिण्याच्या पाण्याचे नियोजन करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. वर्षा निवासस्थानातून ऑडिओ ब्रिजच्या माध्यमातून परभणी, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातील सरपंच, ग्रामसेवक, गट विकास अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी …
Read More »मुंडे स्मारकावरून एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न सरकार टाळाटाळ करत असल्याचा भगवान महासंघाचा आरोप
औरंगाबाद : प्रतिनिधी लोकनेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकासाठी औरंगाबादमध्ये जागा आणि निधी देऊन देखील सरकार हेतुपूरस्पर टाळाटाळ करत असल्याचा आरोप करत जय भगवान महासंघाचे जिल्हाध्यक्ष सचिन डोईफोडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. गोपीनाथ मुंडे यांचे शहरात भव्य स्मारक व्हावे आणि त्यातून …
Read More »पहिल्या स्मार्ट ग्रामपंचायतीतच ५० लाखांहून अधिक रकमेचा भ्रष्टाचार बापर्डे ग्रामपंचायतीतील ग्रामसेवक, सरपंचाचा अजब कारभार
देवगडः प्रतिनिधी राज्यातील शहरांबरोबर गावे ही विकासित व्हावीत या उद्देशाने राज्य सरकारकडून स्मार्ट गावांची योजना जाहीर केली. या योजनेत पहिली ग्रामपंचायत म्हणून देवगड तालुक्यातील बापर्डे ग्रामपंचायतीची निवड करण्यात आली. परंतु या ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक शिवराज राठोड, सरपंच श्रीकांत नाईकधुरे यांनी संगनमताने गावात विकासकामे न करताच ५० लाखाहून अधिक रकमेचा भ्रष्टाचार केल्याची …
Read More »बीड जिल्हयात निर्भीड आणि निष्पक्ष वातावरणात निवडणुका घ्या एस.पी. आणि पी.आय.पाळवदेची जिल्हयाबाहेर बदली करण्याची विरोधी पक्षनेते मुंडे यांची मागणी
मुंबईः प्रतिनिधी बीड जिल्ह्यातील पोलीस प्रशासन सत्ताधाऱ्यांच्या मर्जीने काम करीत असल्यामुळे बीड जिल्ह्यात निर्भीड आणि निष्पक्ष वातावरणात निवडणुका होणार नाही त्यामुळे निवडणूक आयोगाने यात लक्ष घालावे अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. या निवडणुका भयमुक्त वातावरणात व्हाव्यात यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख आणि स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस …
Read More »दानवेंच्या विरोधातील खोतकरांची तलवार अखेर म्यान मुख्यमंत्री फडणवीस उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत पडला पडदा
औरंगाबाद : प्रतिनिधी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे मंत्री अर्जुन खोतकर यांच्यातील वादावर तोडगा काढण्यासाठी व त्यांची नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात एका हॉटेलमध्ये बैठक झाली. मात्र या बैठकीत हवा तसा तोडगा न निघाल्याने खोतकर यांनी काहीशा नाराजीनेच आपली तलवार म्यान करत …
Read More »जालन्यात मैत्रीपुर्ण लढतीबाबत आग्रही शिवसेनेचे अर्जुन खोतकर दानवेंच्या विरोधावर ठाम
मुंबईः प्रतिनिधी जालना लोकसभा मतदारसंघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उमेदवारीला आजही विरोध आहे. यासंदर्भात शनिवारी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यासमोर माझ्याकडून जालन्यात मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव ठेवला आहे. त्याबाबत निर्णय झालेला नसला तरी यावर उद्याच्या बैठकीत अंतिम निर्णय होणार असल्याचे सांगत अन्यथा…असा सूचक इशाराही शिवसेनेचे मंत्री अर्जुन खोतकर यांनी दिला. …
Read More »
Marathi e-Batmya