हवामान

राज्यातील मराठवाडा, विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रात कृत्रिम पाऊस पाडणार राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

मुंबईः प्रतिनिधी राज्यात उद्‌भवलेल्या तीव्र दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी पाण्याच्या उपलब्धतेसाठी आवश्यक त्या सर्व तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून पर्जन्यवाढीसाठी एरियल क्लाऊड सीड‍िंगची (Arial Cloud Seeding) उपाययोजना करून कृत्रिमरित्या पाऊस पाडण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. राज्यात कमी पाऊस पडल्याने यंदा दुष्काळी पर‍िस्थ‍िती असून बहुतांशी …

Read More »

महाराष्ट्र सुर्य किरणांनी आणखी तापणार वाढत्या तापमानापासून लोकांनी काळजी घ्यावी

मुंबई: प्रतिनिधी राज्यातल्या बऱ्याच भागातील कमाल तापमानात १९ मे पासून वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशातील बऱ्याच भागातील कमाल तापमानात लक्षणीय वाढ होणार असल्यामुळे २५ मे पर्यंत या भागातील कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहतील. या दरम्यान अकोला, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांत कमाल तापमान ४६ …

Read More »

राज्यात मान्सूनचे आगमन जरा उशीराच १० जूनपर्यंत मुंबईत आगमन होणार असल्याचा स्कायमेटचा अंदाज

मुंबईः प्रतिनिधी गतवेळच्या मान्सूनमध्ये पुरेसा पाऊस न पडल्याने जानेवारी-फेब्रुवारी महिन्यातच राज्यातील जनतेला दुष्काळी परिस्थितीचे चटके जाणवू लागले. तर मार्च महिन्यापासून पाणी टंचाईला सामोरे जावू लागले. त्यातच यंदा राज्यातील मान्सून उशीराने दाखल होणार असल्याचा अंदाज स्कायमेट या हवामान कंपनीने व्यक्त केला. मान्सूनचे आगमन केरळमध्ये चार जूनला होण्याची शक्यता व्यक्त करत सरासरीच्या …

Read More »

अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने आपत्ती निवारणाचे नवे मार्ग शोधा

आंतरराष्ट्रीय आपत्ती निवारण परिषदेत मुख्यमंत्र्यांचे आवाहन मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्रात दुष्काळासारख्या नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार सारखी योजना यशस्वी ठरली. शेतीचा शाश्वत विकास होण्याबरोबरच कमी पाऊस होवून देखील शेतीच्या उत्पादकतेत घट होण्याऐवजी भरघोस वाढच झाली. ही किमया जलयुक्त शिवार योजनेमुळे साधता आल्याचे सांगत कृत्रिम बुद्धीमत्ता, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि समाजातील …

Read More »

शेतकऱ्यांनो सावधान ! २४ ते २६ जानेवारीला वादळी पाऊस पडणार

शेतमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी नियोजन करावे मुंबई : प्रतिनिधी राज्यातल्या पूर्व भागातील हवामान अस्थिर होणार असल्यामुळे २४ ते २६ जानेवारी दरम्यान विदर्भात (प्रामुख्याने पूर्व-विदर्भात) वादळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. गडचिरोली,चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यांतील बऱ्याच भागात या दरम्यान मेघ-गर्जनेसह पावसाची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी हवामानाच्या परिस्थितीनुसार नियोजन करावे आणि …

Read More »

तळोजा औद्योगिक वसाहतीतील प्रदूषण थांबवण्यासाठी उपाययोजना करा मॉनिटरिंग कमिटीचे अध्यक्ष न्या. व्ही. एम. कानडे यांची सूचना

मुंबई : प्रतिनिधी तळोजा औद्योगिक वसाहतीतील प्रदूषण थांबविण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश तथा तळोजा मॉनिटरिंग कमिटीचे अध्यक्ष व्ही. एम. कानडे यांनी आज दिले. हरित लवादाकडे अरविंद म्हात्रे यांनी प्रदूषणासंदर्भात केलेल्या तक्रारीवरुन तळोजा औद्योगिक वसाहतीतील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प व प्रदूषणासंदर्भात एका बैठकीचे आयोजन इंडियन मर्चंट चेंबरमध्ये …

Read More »

त्रिपक्षीय करारातून राज्यात फुलतेय वन चार वर्षात ३५८.१४९ हेक्टरवर वृक्ष लागवड

मुंबई : प्रतिनिधी त्रिपक्षीय करारातून राज्यात वनराई फुलवण्याचे काम जोमाने सुरु असून आतापर्यंत चार वर्षात ३५८.१४९ हेक्टर वन जमीनीवर या पद्धतीने ५ लाख १७ हजार ०९६ वृक्षलागवड झाली आहे, अशा पद्धतीने राज्यातील हरित क्षेत्रात वाढ करणारे महाराष्ट्र हे देशातील अग्रगण्य राज्य आहे, अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. मुनगंटीवार …

Read More »

२७, २८ जूनला विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाचा अंदाज कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार

मुंबई : प्रतिनिधी मध्य-भारतात या आठवड्यात एक कमी दाबाचा पट्टा तयार होण्याचे संकेत असल्याने २७ व २८ जूनला विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत, तसेच मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड, परभणी, जालना, औरंगाबाद आणि बीड या जिल्ह्यांत चांगल्या पावसाचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. मध्य-महाराष्ट्रातील जळगाव, अहमदनगर आणि नाशिकसारख्या काही जिल्ह्यांत हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात …

Read More »

पुढील ४८ तासात विदर्भ, मराठवाड्यात आणखी वादळीवाऱ्यासह गारपिटीचा अंदाज शेतकऱ्यांनी शेतमालाच्या बचावासाठी उपाय योजण्याचे आवाहन

मुंबई : प्रतिनिधी भारतीय हवामान खात्याच्या नागपूर व मुंबई केंद्राकडून मिळालेल्या सूचनेनुसार, येत्या ४८ तासांमध्ये विदर्भामध्ये (विशेषत: अमरावती आणि नागपूर विभाग) वादळीवारा, वीज व प्रामुख्याने गारपीट होण्याची तसेच  मराठवाड्याच्या बहुतांश भागात वादळीवारा होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर या भागातील शेतकऱ्यांनी दक्षता घेण्याचे आवाहन मंत्रालयातील आपत्ती निवारण कक्षाने केले. वादळी वारा व गारपीटीच्या पार्श्वभूमीवर यामध्ये शेतमाल …

Read More »

हवामान बदलामुळे विदर्भ, मराठवाड्यात गारपीटीची शक्यता पिकांची काळजी घेण्याचे राज्य सरकारचे शेतकऱ्यांना आवाहन

मुंबई : प्रतिनिधी विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतांशी भागात येत्या १० ते १३ फेब्रुवारी दरम्यान वादळी वाऱ्याच्या गडगडाटासह गारपीट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी तयार झालेल्या पिकांची कापणी करुन शेतमालाची योग्यरित्या साठवणूक करावी. तसेच सर्व नागरिकांनी वादळ, विजा आणि गारपीटीपासून संरक्षण होण्‍यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन राज्य सरकारतर्फे एका …

Read More »