Breaking News

देवेंद्र फडणवीस म्हणाले, जाळपोळ प्रकरणी कठोर कारवाई करणार… सीसीटीव्हीत दिसणाऱ्यावर ३०७ कलमान्वये कारवाई

मराठा आंदोलन चिघळत असताना जिथे जाळपोळीच्या घटना घडल्या तिथे मुळीच गय करणार नाही. बीडमध्ये आमदारांची घरे गाड्या जाळणाऱ्यांची ओळख सीसीटीव्ही फूटेजमधून पटवण्यात येत असून असे प्रकार करणाऱ्यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचे ३०७ कलम लावून कठोर कारवाई केली जाईल असा इशारा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. मंत्रिमंडळ बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस पसार …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले “हे” महत्वाचे निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय घेतले

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना मदत करण्याच्या कार्यकक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय राज्यातील चिटफंड न्यायलयीन प्रकरणांचा वेगाने निवाडा यासाठी कायद्यातील जून्या कायद्यातील तरतूदींचा समावेश करण्यात येणार आहेत. याशिवाय चेंबूर येथे नवबौध्द मुलां-मुलींसाठी आयटीआय सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथे पीएम मित्रा पार्कच्या जमिनीसाठी देण्यात …

Read More »

जितेंद्र आव्हाड यांचा आरोप, सध्याच्या परिस्थितीला मुख्यमंत्री- दोन्ही उपमुख्यमंत्री जबाबदार उपमुख्यमंत्र्यानी राजीनामे द्यावे

राज्यातील सध्याच्या परिस्थितीला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जबाबदार असून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. तसेच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव जितेंद्र आव्हाड यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केली. जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले की, मराठा आरक्षणावरून सध्या राज्यामध्ये अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मराठा आंदोलक …

Read More »

सुनिल तटकरे म्हणाले, आता राजकारण करायची ही वेळ नाही… सर्वच राजकीय पक्षांनी जबाबदारीने सहकार्य करण्याची आवश्यकता

समाजात अस्वस्थता निर्माण होते त्यावेळी निर्माण झालेल्या परिस्थितीचा राजकीय फायदा घेणे योग्य ठरु शकत नाही. सर्वच राजकीय पक्षांनी जबाबदारीने आज ज्या परिस्थितीतून महाराष्ट्रातील स्थिती जातेय त्यामध्ये सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. राजकारण करायचे असते त्यावेळी करता येते परंतु आता राजकारण करायची ही वेळ नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे …

Read More »

नाना पटोले यांचे आश्वासन, काँग्रेस सत्तेत आल्यानंतर आरोग्य व शिक्षणाचा कायदा करू पेटता महाराष्ट्र नको तर छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र हवा

राज्यातील आरोग्य विभागात सावळा गोंधळ सुरु आहे, अपुरे कर्मचारी असल्याने त्याचा सार्वजिनक आरोग्य सेवेवर काय परिणाम होतो ते ठाणे, नाशिक, नांदेड व नागपूरमध्ये मागील महिन्यात झालेल्या घटनांवरून दिसले आहे. आरोग्य विभागात कर्मचारी व अधिकारी यांची हजारो पदे रिक्त आहेत पण सरकार या पदांची भरती करत नाही. आरोग्य विभाग व शिक्षण …

Read More »

कमी पावसामुळे राज्यातील ४० तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करणार राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

राज्यात कमी पावसामुळे काही जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता या खरीप हंगामासाठी पहिल्या टप्प्यात ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यास आज राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली. त्यानुसार दुष्काळी परिस्थितीत आवश्यक ती मदत करण्याबाबत तातडीने केंद्राला विनंती करण्यात येणार आहे. राज्यातील उर्वरित तालुक्यांमधील ज्या मंडळांमध्ये कमी पाऊस झाला आहे त्याबाबतीत आवश्यक ते …

Read More »

मोठी बातमीः कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरु न्या. शिंदे समितीचा पहिला अहवाल स्वीकारला

मराठवाड्यातील निझामकालीन व इतर उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे मराठा -कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्रांसंदर्भात कार्यवाही निश्चित करणाऱ्या निवृत्त न्या. संदीप शिंदे समितीचा पहिला अहवाल आज राज्य मंत्रिमंडळाने स्वीकृत केला. अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या अहवालामध्ये निवृत्त न्या. संदीप शिंदे समितीने नमूद केल्याप्रमाणे मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील सुमारे पावणेदोन कोटी नोंदी तपासण्यात आल्या …

Read More »

राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत मंत्रालयातील महिला-पुरूष संघास कांस्यपदक संघात मंत्रालय आणि शासकिय कार्यालयीत कर्मचाऱ्यांचा समावेश

नवी दिल्लीतील कोहात एन्क्लेव्ह १६ ते १९ ऑक्टोबर या कालावधीमध्ये खो खो सामने खेळविण्यात आलेल्या अखिल भारतीय नागरी सेवा अर्थात शासकिय कर्मचाऱ्यांची खो-खो स्पर्धा २०२३-२४ साठी आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये राज्य सरकारच्या मंत्रालयातील महिला व पुरुष कर्मचाऱ्यांच्या खो खो स्पर्धेत दोन्ही संघांनी कांस्य पदकाची कमाई केली. या यशाबद्दल …

Read More »

मुकेश अंबानींना पाच दिवसांत तिसऱ्यांदा जीवे मारण्याची धमकी ४०० कोटी मागितले

रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. त्यांना पाच दिवसांत तिसऱ्यांदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याआधी त्याला शुक्रवार आणि शनिवारी सलग दोन धमकीचे मेल पाठवण्यात आले होते. पोलिसांनी सांगितले की अंबानी यांना सोमवारी एका ईमेलद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात …

Read More »

दिवाळीनिमित्त सूट, १.३२ लाखाची स्कूटर ८६ हजारांना ५००० रूपयांची अतिरिक्त सवलत

इलेक्ट्रिक दुचाकी बनवणारी कंपनी एथर एनर्जीने सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सवलतीची योजना आणली आहे. कंपनीची इलेक्ट्रिक स्कूटर Ather 450s स्वस्तात उपलब्ध आहे. कंपनी Ather 450s वर ५००० रुपयांची अतिरिक्त सणाची सवलत आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर ८६०५० रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीत उपलब्ध असेल. या इलेक्ट्रिक स्कूटरची मूळ किंमत १.३२ लाख रुपये असली तरी सणासुदीच्या …

Read More »