रत्नागिरी: प्रतिनिधी ज्या लोकमान्य टिळकांना भारतीय असंतोषाचे जनक म्हणून ओळखले जाते त्यांच्या पवित्र भूमीतून सांगतो, महाराष्ट्रातील असहिष्णुतेचे जनक उध्दव ठाकरे हे असून त्यांची शिवसेना कोकण विरोधी असल्याचा आरोप भाजपा नेते आमदार ॲड. आशिष शेलार यांनी रत्नागिरी येथे केला. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला आजपासून रत्नागिरीतून पुन्हा सुरुवात झाली …
Read More »गृहनिर्माण मंत्री आव्हाडांनी घेतलेल्या निर्णयावर पुन्हा मुख्यमंत्री ठाकरेंचे ओव्हर रूल झोपडपट्टी पुनर्वसनातील रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आराखडा तयार करण्याचे मुख्यमंत्र्याचे आदेश
मुंबई : विशेष प्रतिनिधी शहरातील रखडलेल्या झोपडपट्टी पुर्नवसन प्रकल्पांचे काम एसआरए हाती घेईल आणि ते प्रकल्प पूर्ण करणार असल्याची घोषणा साधापणत: तीन आठवड्यांपूर्वी गृहनिर्माण मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी केली होती. त्यास आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी ओव्हर रूल केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. साधारणत: तीन आठवड्यापूर्वी गृहनिर्माण मंत्री डॉ.जितेंद्र …
Read More »वकिलांची चांगली फौज, अनिल परबांच्याविरोधात याचिका दाखल करण्याचं काम सुरु भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा इशारा
सांगली: प्रतिनिधी हे सरकार पोलीस आणि गुंडांच्या जोरावर चाललंय, असा आरोप भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी करत आपल्याकडे वकिलांची चांगली फौज असून ते सतत कायद्याची सविस्तर माहिती घेवून त्यानुसार न्यायालयीन लढ्यासाठी मदत करत आहेत. त्यामुळे ठाकरे सरकार सारखं न्यायालयाकडून थपडा खात असून परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधात याचिका दाखल करण्याचं …
Read More »पाठी लागू नका मी बोलायला लागलो तर सगळचं अवघड होईल चीवचीव सेना पुन्हा घरावर चालून आली तर त्यांचा योग्य सन्मान करू
रत्नागिरी: प्रतिनिधी मुंबई आणि कोकणात सुरु असलेल्या जन आर्शिवाद यात्रेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितल्यामुळे आलो आहे. या यात्रे दरम्यान काही घटना घडल्या. त्याचा सगळाच उल्लेख मी करत नाही. मात्र माझ्यावर झालेली कारवाई ही बेकायदेशीर असून एखाद्या दरोडेखोराप्रमाणे माझ्यावर कारवाई करण्यात आली आहे. नारायण राणेच्या पाठी जास्त लागू नका नाही …
Read More »ओबीसी राजकीय आरक्षणाबाबत सर्वांचेच एकमत: अंतिम निर्णय येत्या ७ दिवसानंतर प्राप्त सूचना, उपलब्ध पर्यायांचा अभ्यास करून शुक्रवारी पुन्हा बैठक
मुंबई: प्रतिनिधी ओबीसींना राजकीय आरक्षण मिळालेच पाहिजे या विषयावर सगळ्याच पक्षांचे एकमत आहे. यासंदर्भात आज सर्वपक्षीय बैठकीत प्राप्त झालेल्या सूचना, विविध पर्यांयाचा अभ्यास करून येत्या शुक्रवारी यावर सर्वानुमते निर्णयाप्रत येण्यासाठी बैठक घेऊ असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले. ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात आज सह्याद्री अतिथीगृहात आयोजित करण्यात आलेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या …
Read More »महाराष्ट्र प्रदेशची काँग्रेसची कार्यकारणी आणि १४ जिल्हा व ग्रामीणचे अध्यक्ष अखेर जाहीर १८ उपाध्यक्ष, ६५ जनरल सेक्रेटरी, १०४ सचिव, ६ प्रवक्ते कायम
नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र काँग्रेसची कार्यकारणीत कोणा कोणाचा समावेश होणार याची उत्सुकता कार्यकर्त्यांमध्ये होती. त्यानुसार आज काँग्रेसच्या केंद्रीय समितीने महाराष्ट्रातील प्रदेश काँग्रेस कार्यकारणीतील नावांना मंजूरी दिली असून यासंबधीची यादीही जाहीर केली. या कार्यकारणीत १८ उपाध्यक्ष, ६५ जनरल सेक्रेटरी, १०४ सचिव, १ खजिनदार आदींसह कार्यकारणी सदस्य आणि १४ …
Read More »३ऱ्या लाटेत ६० लाख नागरीक बाधित होण्याचा धोका: केंद्राकडून १ कोटी ६० लाख लसी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
मुंबई: प्रतिनिधी राज्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेत २० लाख लोक बाधित झाले, दुसऱ्या लाटेत ४० लाख बाधित झाले आणि तिसऱ्या लाटेत ६० लाख लोक बाधित होतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यात १२ टक्के लोकांना ऑक्सिजन लागतो. गेल्या वेळी एका वेळी साडेसहा लाख ॲक्टिव्ह रुग्ण होते, आता १३ लाख ॲक्टिव्ह …
Read More »आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांच्या मोबदला वाढीसह मंत्रिमंडळाने घेतले हे महत्वाचे निर्णय निधी वितरणातील सुसूत्रता, अन्न प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहने, न्यायाधीशांना सुधारीत वेतनश्रेणी
मुंबई: प्रतिनिधी आशा स्वयंसेविकांना राज्य शासनाकडून देण्यात येणाऱ्या दरमहा मोबदल्यात एक हजार रुपये तर गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात दरमहा बाराशे रुपयांची वाढ करण्यास राज्य मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. कोरोना महामारी सुरु असेपर्यन्त आशा स्वयंसेविका व आशा गटप्रर्वतक यांना दरमहा पाचशे रुपये कोविड भत्ता राज्य शासनाच्या निधीतून अदा …
Read More »इंजिनिअरींगचे नवे कॉलेज, वाढीव तुकड्या या गोष्टी करायचेत या तारखेपर्यंत प्रस्ताव पाठवा तंत्रशिक्षणाच्या नवीन शैक्षणिक संस्थाच्या परवानगीसाठी मुदतवाढ
मुंबई : प्रतिनिधी राज्यात इंजिनियरींग अर्थात तंत्रशिक्षणाच्या नवीन शैक्षणिक संस्थांना कॉलेज सुरु करण्यासाठीचा प्रस्ताव सादर करण्याच्या मुदतीत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून अशा नव्या संस्थांना परवानगीसाठी आता १५ सप्टेंबर २०२१ पूर्वी अर्ज करता येतील. यादृष्टीने महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ अधिनियम, १९९७ मधील विविध कलमांमध्ये सुधारणा करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात …
Read More »नर्सिंगच्या या अभ्यासक्रमांना आता थेट मिळणार प्रवेश: सीईटी परिक्षेची गरज नाही एएनएम आणि जीएनएम अभ्यासक्रमांसाठी सीईटी नाही—वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी एएनएम (ऑक्सिलरी नर्सिंग मिडवाइफरी) म्हणजेच सहायक नर्सिंग मिडवाइफरी आणि जीएनएम (जनरल नर्सिंग मिडवाइफरी) या अभ्यासक्रमांसाठी थेट १२ वीच्या गुणांवर प्रवेश देण्यात येणार असून सीईटी (सामायिक प्रवेश परीक्षा) घेण्यात येणार नसल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली. महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाची आढावा बैठक मंत्रालयात …
Read More »
Marathi e-Batmya