सध्या कोरोनाची दुसरी लाट राज्यात वेगात पसरते आहे. शहरी भागासोबतच ग्रामीण भागातही रुग्ण मोठया संख्येने आढळत आहेत. हे संकट मोठे आहे. तथापी आपण काही साध्यासुध्या गोष्टी नीट पाळल्या आणि नियम व्यवस्थित पाळले तर आपण या संकटाची तीव्रता कमी करु शकतो. आपण काय करु शकतो ? _सगळयात महत्वाची गोष्ट म्हणजे – …
Read More »फी भरली नाही म्हणून शिक्षण रोखणाऱ्या शाळांची माहिती द्या शिक्षणाधिकारी आणि शालेय शिक्षण विभागाचे आवाहन
मुंबई : प्रतिनिधी विद्यार्थ्यांनी वाढीव फी भरली नाही म्हणून त्यांना शिक्षणापासून, परिक्षेस बसण्यापासून वंचित ठेवता येणार नाही असा आदेश उच्च न्यायालयाने १ मार्च २०२१ रोजी दिला आहे. त्यामुळे कोणत्याही शाळेने विद्यार्थ्यांनी वाढीव फी भरली नाही म्हणून त्यांना शिक्षणापासून किंवा परिक्षेस बसण्यापासुन वंचित ठेवल्यास ही बाब पालकांनी संबंधित शिक्षणाधिकारी यांच्या निदर्शनास आणून …
Read More »नाना पटोलेना भाजपाचे प्रतित्तुर, भ्रमातून बाहेर या, जनतेकडे लक्ष द्या भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचे आवाहन
मुंबई : प्रतिनिधी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर कोणतीच टीका केलेली नसताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडणे दुर्भाग्यपूर्ण आहे. नाना पटोले यांनी भ्रमातून बाहेर यावे आणि आरोप – प्रत्यारोपांचा खेळ खेळण्यापेक्षा राज्यातील सत्ताधारी पक्ष म्हणून कोरोनाकाळात जनतेकडे लक्ष द्यावे, असे आवाहन भाजपा …
Read More »चंद्रकांत पाटील, तुम्ही पुण्याचे सेवक की पुनावालाचे ? कोरोना लसीच्या नफेखोरीला साथ, हा मृतांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचाच प्रकार: नाना पटोले
मुंबई: प्रतिनिधी देशभरात कोरोना महामारीने थैमान घातले आहे. केंद्र सरकारच्या निष्काळजीपणा आणि गलथानपणाने संपूर्ण देशाला कोरोनाच्या खाईत ढकलले आहे. ऑक्सिजन, इतर आवश्यक औषधे आणि उपकरणांच्या कमरतेमुळे कोरोना रूग्ण तडफडून मरत आहेत. अशा गंभीर परिस्थितीत सरकारसोबत मिळून लोकांच्या मदतीला धावून जाण्याऐवजी भाजपचे नेते हीन राजकारण करत आहेत. काँग्रसे नेते राहुल गांधी …
Read More »ब्रेक दि चेन निर्बंधातंर्गत नवे नियम लागू झाले पण प्रवास, रेल्वेने जायचाय: तर हे वाचा राज्य सरकारने केले लोकांच्या शंकाचे निरसन
प्रश्न १ – डॉक्टर आणि वैद्यकीय क्षेत्रातले लोक जिल्ह्यामध्ये कोणत्याही निर्बंधांचे शिवाय प्रवास करू शकतात का? उत्तर – होय. डॉक्टर्स आणि वैद्यकीय क्षेत्रातले लोक जिल्ह्यामध्ये व्यक्तिगत/ खाजगी किंवा सार्वजनिक वाहनाचा वापर करून त्यांना प्रशासनातर्फे देण्यात आलेल्या ओळख पत्राच्या आधारे प्रवास करू शकतात. त्यांच्या प्रवाशाचे निमित्त वैद्यकीय आणि आरोग्यशी संबंधित असणे अपेक्षित …
Read More »विरार आगीच्या चौकशीचे आदेश देत मृतक-जखमींसाठी मदत जाहिर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केली घोषणा
मुंबई: प्रतिनिधी विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागास आग लागून काही रुग्णांचा मृत्यू झाल्याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून उपचार घेत असलेल्या इतर रुग्णांना झळ पोहचू नये तसेच त्यांची लगेचच इतरत्र व्यवस्था करावी असे निर्देश दिले. आगीची घटना कळल्यानंतर मुख्यमंत्री स्वतः संबंधित अधिकाऱ्यांशी बोलले असून त्यांनी सर्वप्रथम प्राधान्याने …
Read More »मुख्यमंत्री म्हणाले, परदेशातून लस आणि रेमडेसिवीर आयात करण्याची परवानगी द्या ऑक्सिजन, रेमडीसीव्हीर पुरवठा नियमित करा
मुंबई : प्रतिनिधी पंतप्रधानांनी कोविड संसर्ग रोखण्यावर लॉकडाऊन हा अखेरचा पर्याय म्हणून सांगितला. महाराष्ट्रासाठी दुर्दैवाने असे कडक निर्बंध लावण्याची वेळ आली आहे. मात्र आम्ही अर्थचक्राला झळ बसू नये याची देखील काळजी घेत आहोत असे स्पष्ट करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही लढाई आम्ही कोणत्याही परिस्थितीत जिंकूत असा आत्मविश्वास व्यक्त केला. …
Read More »मुख्यमंत्री तुमचा अंदाज तर अचूक ठरला, पण तयारी काय केली ते सांगा भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांचा सवाल
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा आकडा खाली गेला असला तरी दुसऱ्या लाटेचा धोका आहे व ही लाट सुनामीसारखी असण्याची शक्यता आहे, असा अचूक अंदाज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नोव्हेंबर २०२० मध्ये जाहिररित्या वर्तवला होता. पण या लाटेला तोंड देण्यासाठी त्यांनी गेल्या पाच महिन्यात तयारी काय केली, हे सांगितले पाहिजे, …
Read More »या ३५ लाख लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा झाले दोन महिन्यांचे अर्थसहाय्य सामाजिक न्याय विभागांतर्गत सव्वा चौदाशे कोटी रुपये निधी वितरित- सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे
मुंबई : प्रतिनिधी कोरोनाच्या अनुषंगाने कडक निर्बंधांच्या काळात गरीब जनतेला दिलासा मिळावा या हेतूने राज्य सरकारने यापूर्वीच विशेष पॅकेज घोषित केले आहे. यामधून सामाजिक न्याय विभागांतर्गत संजय गांधी निराधार, श्रावण बाळ, वृद्धापकाळ वेतन, विधवा निवृत्ती वेतन व दिव्यांग निवृत्ती वेतन या पाच योजनांतील ३५ लाख लाभार्थ्यांना एप्रिल व मे या दोन महिन्यांचे प्रतिमहिना एक हजार रुपये …
Read More »१३ विद्यापीठांच्या परिक्षा ऑनलाईन होणार आणि विद्यार्थ्यांचे लसीकरण उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची घोषणा
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील वाढत्या कोरोनाच्या संसर्गाला रोखण्यासाठी राज्य सरकारकडून दिवसेंदिवस कडक निर्बंध लागू करण्यात येत असल्याने अकृषिक विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या ऑफलाईन परिक्षा घेणे अशक्य झाले. त्यामुळे या सर्व परिक्षा आता ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. राज्य सरकारने आज आणखी कडक निर्बंध …
Read More »
Marathi e-Batmya