Breaking News

Rohit Shetty firing case: २० जानेवारी रोजी स्कूटीवर मुंबईत आले होते आरोपी रोहित शेट्टी यांच्या घरी झालेल्या गोळीबाराच्याच्या घटनेत नवी माहिती आली बाहेर

Rohit Shetty firing case: The accused had arrived in Mumbai on a scooter on January 20.

मुंबईतील रोहित शेट्टीच्या Rohit Shetty घरी झालेल्या गोळीबाराच्या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे आणि आता या प्रकरणाचे गूढ हळूहळू उलगडत आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या तपासात मोठा कट उघड झाला आहे. पोलिसांनी सांगितले की बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा, मोठ्या प्रमाणात निधी आणि आंतरराष्ट्रीय संबंध असू शकतात. पोलिसांच्या मते, आरोपी सिद्धार्थ आणि समर्थ …

Read More »

BirdFluAlert : कावळ्यांच्या मृत्यूनंतर तामिळनाडूमध्ये बर्ड फ्लूचा इशारा… लोकांना खबरदारी घेण्याचा सल्ला

BirdFluAlert issued in Tamil Nadu after deaths of crows.

तामिळनाडूच्या पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय विभागाने बर्ड फ्लूचा प्रसार ( BirdFluAlert ) रोखण्यासाठी जैवसुरक्षा आणि खबरदारीच्या उपाययोजनांबाबत एक सल्लागार जारी केला आहे. मोठ्या प्रमाणात कावळ्यांचे मृत्यू आणि एव्हीयन इन्फ्लूएंझाचा प्रादुर्भाव होण्याची भीती यांच्या पार्श्वभूमीवर विभागाने हे पाऊल उचलले आहे. BirdFluAlert सार्वजनिक आरोग्य आणि प्रतिबंधात्मक औषध संचालनालयाने (डीपीएच) देखील एक सार्वजनिक …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास, विदर्भाच्या सर्वांगीण विकासावर भर केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ‘खासदार औद्योगिक महोत्सव- ॲडव्हान्टेज विदर्भ’चे थाटात उद्घाटन

गडचिरोली येथे जगातील सर्वात मोठे ग्रीन स्टिल हब, नागपुरात सोलर मॉडयुल आणि अमरावतीमध्ये आशिया खंडातील सर्वात मोठे वैमानिक प्रशिक्षण केंद्र उभारण्याच्या दिशेने महत्त्वाची पावले पडली आहेत. निर्मिती आणि सेवा क्षेत्रात विदर्भाची घोडदौड सुरु आहे. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीसोबत झालेल्या सामंजस्य करारातून नागपूरमध्ये ऑटोमोबाईल उद्योगाचे पदार्पण झाले आहे, या सर्व प्रयत्नांतून येत्या ५ …

Read More »

रामदास कदम यांचा आरोप, शरद पवारांना शह देण्यासाठी शपथविधी घडवून आणला महायुतीत वादाच्या ठिणग्या

अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुप्त संघर्ष सुरू झाला आहे. अग्निसंस्काराच्या राख थंड होत नाही तोच तिसऱ्या तिसऱ्या दिवशी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार याचा उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी झाला. हा शपथविधी करून घेण्यात आला यावरून टिकेची झोड उठली आहे. अजित पवारांच्या निधनाला ७२ तासही उलटत नाहीत, तोच सुनेत्रा …

Read More »

जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांसाठी मतदानाची तयारी पूर्ण जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज

राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी उद्या (ता. ७) मतदान होत असून जिल्हा परिषदेच्या ७३१; तर आणि पंचायत समित्यांच्या १ हजार ४६२ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. एकूण ७ हजार ४३८ इतके उमेदवार निवडणूक रिंगणात असून सर्व मिळून एकूण २ कोटी ८ लाख २० हजार ७०२ …

Read More »

प्रताप सरनाईक यांचे निर्देश, उत्पन्न वाढीसाठी एसटी बसेस फेऱ्यांचा वक्तशीरपणा वाढवा एसटी महामंडळाला दिले निर्देश

“बसेस वेळेवर धावल्या तरच उत्पन्नाची चाके वेगाने फिरतील, असे परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सांगितले. मंत्रालयातील दालनात आयोजित उत्पन्नवाढ आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीला एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.माधव कुसेकर यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले …

Read More »

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाढदिवस साजरा करणार नाही अजित पवार यांच्या निधनामुळे वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे महाराष्ट्रावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यामुळे यंदा ९ फेब्रुवारी रोजी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. पुष्पगुच्छ, भेटी आणू नयेत, शुभेच्छा देणारे होर्डिंग्ज लावू नये, तसेच वाढदिवसानिमित्ताने कोणताही सोहळा आयोजित करू नये, असे आवाहनही एकनाथ शिंदे यांनी केले. अजित दादांच्या अकाली जाण्याच्या वेदनेतून …

Read More »

वर्षा गायकवाड यांची मागणी, कुर्ला-ट्रॉम्बे मार्गालगतच्या झोपडपट्यांची पाडकाम मोहीम रद्द करा खासदार वर्षा गायकवाड यांची रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे पत्राद्वारे मागणी

रेल्वे प्रशासनाने कुर्ला-ट्रॉम्बे मार्गालगतच्या ३१५४ झोपड्यांचे पाडकाम करण्याची नोटीस २७ जानेवारी २०२६ रोजी दिली असून या नोटीसीमुळे रहिवाशांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. १० फेब्रुवारी २०२६ ते १२ फेब्रुवारी २०२६ दरम्यान हे पाडकाम करण्यात येणार आहे. ही पाडकाम मोहीम रद्द करावी तसेच बाधित कुटुंबांसाठी कायमस्वरूपी पुनर्वसन योजना सुरू करावी, अशी मागणी मुंबई …

Read More »

कुणाल कामरा आणि वकील हरिष जगतियानी यांची केंद्राच्या सहयोग पोर्टलच्या विरोधात याचिका मुंबई उच्च न्यायालयात दिले आव्हान

स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा आणि ज्येष्ठ वकील हरेश जगतियानी यांनी केंद्र सरकारच्या ‘सहयोग’ पोर्टलच्या वैधतेला आव्हान देत मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. हे पोर्टल X, मेटा, यूट्यूब इत्यादी ऑनलाइन मध्यस्थांना सामग्री काढून टाकण्याचे आदेश देण्यासाठी वापरले जाते. त्यांनी माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक तत्त्वे आणि डिजिटल मीडिया आचारसंहिता) सुधारणा नियम, …

Read More »

बिहार निवडणूकीच्या विरोधात दाद मागणाऱ्या प्रशांत किशोर यांनाच सर्वोच्च न्यायालयाने फटकारले एकदा लोकांनी नाकारल्याने न्यायपालिकेचा दुरोपयोग

सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज पार्टी’ने दाखल केलेली याचिका फेटाळून लावली. या याचिकेत २०२५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनेचा गैरवापर केल्याचा आरोप करण्यात आला होता [जन सुराज पार्टी विरुद्ध भारतीय निवडणूक आयोग]. भारताचे सरन्यायाधीश (CJI) सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य …

Read More »