राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय मुंबई : प्रतिनिधी आदिवासी अल्पभूधारक शेतकरी आणि शेतमजुरांना आदिवासी विकास महामंडळाकडून खावटी कर्जापोटी देण्यात आलेले २४४.६० कोटींचे कर्ज आणि त्यावरील ११६.५७ कोटींचे व्याज अशा एकूण ३६१ कोटी १७ लाख रुपयांची रक्कम माफ करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. २००९ ते २०१४ या कालावधीत कर्ज घेतलेल्या ११ लाख २५ हजार ९०७ शेतकरी-शेतमजुरांना …
Read More »दुसऱ्याला विचारून काम करणाऱ्या मंत्र्याने अपयशी कारभाराचा विचार करावा
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांची उपरोधिक टीका मुंबई : प्रतिनिधी आपल्या विभागात काय काम करायचे? हे ही दुस-या मंत्र्यांना विचारणा-या मंत्र्यांने कर्नाटक सरकारच्या भवितव्याचा विचार करण्यापेक्षा आपल्या अपयशी कारभाराचा व त्यामुळे महाराष्ट्राच्या झालेल्या नुकसानीचा विचार करावा असा टोला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी जलसंधारण मंत्री राम …
Read More »भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे १९-२० रोजी नागपूरात राष्ट्रीय महाअधिवेशन
अधिवेशनाला भाजपाध्यक्ष अमित शाह, गडकरी उपस्थित राहणार मुंबई : प्रतिनिधी भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय अनुसूचित जाती मोर्चातर्फे १९ व २० जानेवारी रोजी नागपूर येथे राष्ट्रीय महाअधिवेशन आयोजित करण्यात आले असून या महाअधिवेशनाला १२०८ अनुसूचित जातीतील जाती सहभागी होणार आहेत. तसेच भाजपाचे अनुसूचित जाती मोर्चाचे देशभरातील सहा हजार प्रतिनिधी उपस्थित राहतील तर २० जानेवारी …
Read More »शाळाबाह्य मुलींसाठीच्या पूरक पोषणासाठी आता साडेनऊ रूपये मिळणार
राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय मुंबई : प्रतिनिधी शाळाबाह्य मुलींच्या पूरक पोषणासाठी राज्यातील अकरा जिल्ह्यांत केंद्र पुरस्कृत SAG ( Scheme for Adolescent Girls) अर्थात किशोरवयीन मुलींसाठी सुधारित योजना राबविण्यात येणार असून या योजनेच्या लाभात प्रतिदिन पाच रूपयांवरुन साडेनऊ रूपये एवढी वाढ करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. याबरोबरच या मुलींना व्यावसायिक किंवा …
Read More »ओबीसी बेरोजगारांना आता १० ते ५० लाखाचे कर्ज मिळणार
विविध महामंडळांसाठी ७३६ कोटींच्या अनुदानास मंत्रिमंडळाची मंजुरी मुंबई : प्रतिनिधी विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागांर्तगत येणाऱ्या महामंडळांना विविध योजना राबविण्यासाठी ७३६.५० कोटी रुपयांचे सहाय्यक अनुदान देण्यास राज्य मंत्रिमंडळाने आज मान्यता दिल्याची माहिती या विभागाचे मंत्री प्रा. राम शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. मंत्रालयात झालेल्या या पत्रकार परिषदेस …
Read More »उद्धवजी, कामगारांना वाऱ्यावर सोडून बेस्ट विकणार आहात काय?
आमदार कपिल पाटील यांचा उध्दव ठाकरे यांना सवाल प्रति, मा. श्री. उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष प्रमुख महोदय, बेस्ट कामगारांचा संप सुरु आहे. आज सातवा दिवस आहे. महापालिकेत आपली सत्ता आहे. महापौर शिवसेनेचा आहे. बेस्ट कमिटी आपल्या ताब्यात आहे. स्टँडिंग कमिटी आपल्याच ताब्यात आहे. बेस्ट कामगार मराठी आहेत. तरीही या संपात …
Read More »मुख्यमंत्र्यांना सोलापूरची डाळींब पाहताच होते खायची इच्छा
‘लोकसंवाद’ कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचे शेतकऱ्यांशी हितगुज मुंबई : प्रतिनिधी सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधत असताना काही शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील डाळींब सोबत आणले होते. ते पाहून मुख्यमंत्री म्हणाले, डाळींब खूप छान दिसताय. पाहताच खायची इच्छा होतेय अशा स्पष्ट शब्दात सोलापूरी डाळींबला पाहताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरच्या डाळींबीबाबत असलेली आवड शेतकऱ्यांना सांगितली. शेतात राबून …
Read More »पेरणी क्षेत्र, हवामान, पिकांवरील रोगाची माहिती देणारे पहिले महा ॲग्रीटेक
डिजिटली ट्रॅकचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ : दीड कोटी शेतकऱ्यांना लाभ मुंबई : प्रतिनिधी पेरणी ते पीक काढणी या प्रत्येक टप्प्यावर पेरणी क्षेत्र, हवामान, पिकांवरील रोग अशा विविध बाबी डिजिटली ट्रॅक करुन शेतकऱ्यांना माहिती देणाऱ्या देशातल्या अशाप्रकारच्या पहिल्या ‘महा ॲग्रीटेक’ योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ‘लोकसंवाद’ कार्यक्रमात केला. उपग्रह आणि ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या या …
Read More »लेकीचं आणि झाडाचं नातं झालं अधिक दृढ
कन्या वन समृद्धी योजनेअंतर्गत लागली २१ हजार ७७० झाडं मुंबई: प्रतिनिधी शेतकरी कुटुंबात मुलगी जन्माला आली तर तिच्या जन्माचे स्वागत म्हणून तिच्या नावाने अंगणात १० वृक्षांची लागवड करायची असा संस्कार वन विभागाने “कन्या वन समृद्धी योजने”अंतर्गत घालून दिला. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली सुरु झालेल्या या योजनेनं शेतकऱ्यांच्या लेकीचं तिच्या नावाने लावल्या …
Read More »भाजप सरकारला जमिनीवर आणण्यासाठी सज्ज व्हा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार परिवर्तन यात्रेत छगन भुजबळ यांचे आवाहन भिवंडी: प्रतिनिधी हवेत असलेल्या या सरकारला जमिनीवर आणण्याचे काम तुम्हा- आम्हाला करायचे आहे त्यासाठी सज्ज व्हा असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ यांनी करत विकासाचा मुद्दा बाजुला ठेवुन भाजप सरकार मंदिर मस्जिदीचा मुद्दा घेवून सरकार धंदा करत आहे. राम रहीम …
Read More »
Marathi e-Batmya