Breaking News

विजयस्तंभाला मानवंदना देण्यास येणाऱ्यांसाठी सर्व सोयी-सुविधा द्या

सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचे सामाजिक न्याय मंत्री बडोले यांचे आदेश पुणे : प्रतिनिधी येथील भिमा-कोरेगांव येथील विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी दरवर्षी १ जानेवारी रोजी मोठ्या प्रमाणात जनसमुदाय येतो. विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना उच्च प्रतीच्या मुलभूत सोयी सेवा-सुविधा देण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे आदेश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री …

Read More »

एसटीतील कर्मचाऱ्याने बदली मागितल्यास राजीनामा म्हणून समजणार

परिवहन मंत्री दिवकार रावते यांचा अजब निर्णय मुंबई : प्रतिनिधी राज्यातील ३८ जिल्ह्यांमध्ये चालक-वाहक पदावर काम करणाऱ्यांना कर्मचाऱ्यांनी जर मागितली तर त्या कर्मचाऱ्याचा राजीनामा पत्र म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे. तसेच यापुढे वाहक-चालकांच्या सर्व बदलीच्या प्रक्रिया रद्द करण्यात येणार असल्याची अजब घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली. परिवहन मंत्री …

Read More »

सरकारच्या पाठिंब्यामुळेच कट्टरतावाद्यांकडून अल्पसंख्यांकावर हल्ले

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा आरोप मुंबई : प्रतिनिधी कोल्हापूरातील चंदगड येथे रविवारी प्रार्थनेसाठी गेलेल्या ख्रिश्चन धर्मियांवर कट्टरवाद्यांकडून दगडफेक करून तलवारीने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात अनेक भाविक गंभीर जखमी झाले असून काही जणांची प्रकृती गंभीर आहे. या घटनेला चार दिवस उलटूनही अद्याप हल्लेखोरांना अटक करण्यात आली नाही. सरकार आणि …

Read More »

मराठी भाषेविषयी शासन संवेदनशील नाही

२० व्या बालकुमार साहित्योत्सवाचे डॉ. भालचंद्र मुणगेकरांच्या हस्ते उदघाटन  मुंबई : प्रतिनिधी  केवळ मराठी भाषा संमेलने करून मराठीची वाढ होणार नाही. मराठी भाषेत रोजगार उपलब्ध व्हायला हवा. मात्र, मराठीचा दर्जा वाढविण्यात आपले शासन संवेदनशील नसल्याची खंत मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी येथे व्यक्त केली.   जगातील कोणताही विषय किचकट नसतो. साहित्य निर्माण करण्यासाठी विद्वेतेपेक्षा …

Read More »

वेतनवाढ २०१६ पासून मात्र वाढीव घरभाडे २०१९ पासून

राज्य सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या घरभाडे, सिटी अलाऊन्सवर डल्ला मुंबई : प्रतिनिधी राज्यातील शासकिय सेवेतील कर्मचाऱ्यांकडून आपल्या विविध मागण्यासाठी सामूहीक रजा आंदोलनाची घोषणा केली. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची धार बोथट करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारकडून १ जानेवारी २०१६ पासून सातवा वेतन आयोग लागू करण्याची घोषणा केली. परंतु एकाबाजूला सातवा वेतन आयोग लागू करण्याची घोषणा करतानाच …

Read More »

तुम्हाला जमत नाही मग घोषणा करता कशाला?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा सवाल  मुंबई : प्रतिनिधी टोमॅटोला…कांदयाला भाव नाही…दुधाला अनुदान नाही…शेतकऱ्यांनी मग करावं काय ? निवडणूका जवळ आल्यावर महत्वाच्या मुद्दयांना बगल दिली जाते. तुम्हाला जमत नाही मग घोषणा करता कशाला असा संतप्त सवाल सरकारला राष्ट्रवादीचे विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी केला.  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार …

Read More »

सातवा वेतन आयोग देतो, पण दोन वर्षे खर्च करायचा नाही

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे स्पष्टोक्ती मुंबई : प्रतिनिधी मागील काही वर्षांपासून राज्यातील शासकिय सेवेतील २० लाख ५० हजार कर्मचारी-अधिकाऱ्यांकडून सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी करण्यात येत होती. त्यानुसार आज अखेर या सर्व कर्मचारी-अधिकाऱ्यांची मागणी मान्य करण्यात येत असल्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला. पंरतु या वेतनाच्या फरकाची रक्कम बँकेच्या खात्यात …

Read More »

राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ.सदानंद मोरे यांची नियुक्ती

मुंबई : प्रतिनिधी राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या मराठी भाषा विभागाच्या राज्य साहित्य व संस्कृती मंडळावरील अध्यक्ष व सदस्यांची नव्याने नियुक्ती करण्यात आली आहे. या मंडळाच्या अध्यक्ष पदी ज्येष्ठ विचारवंत डॉ.सदानंद मोरे यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्यासह अन्य ३५ नव्या सदस्यांची नियुक्तीही करण्यात आल्याचा शासन निर्णय आज बुधवारी जारी करण्यात …

Read More »

राज्य सरकारची कर्जमाफी योजना फ्लॉप

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्येला आळा घालण्यासाठी आणि कर्जबाजारीपणातून मुक्त करण्यासाठी राज्य सरकारकडून छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना-२०१८ खाली कर्जमाफीची घोषणा करण्यात आली. परंतु ही योजना सर्वस्वी फ्लॉप योजना ठरल्याची टीका राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी ट्वीटरच्या माध्यमातून केली. …

Read More »

पंतप्रधान मोदी, रिलायन्सच्या अनिल अंबानींची नार्को टेस्ट करा

ठाणे : प्रतिनिधी राफेल लढाऊ विमान खरेदी व्यवहारात डसॉल्ट कंपनी आणि फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांशी केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच चर्चा केलेली आहे. या चर्चेमध्ये परराष्ट्र मंत्री, संरक्षण मंत्री, संरक्षण सचिव, हवाई दलाचे प्रमुख आदी कोणीही सहभागी झालेले नव्हते. या खरेदी व्यवहारात देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा झाला असून हा घोटाळा उघडकीस येण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र …

Read More »