दुपारी १ वाजेपर्यंत ३० तर ३ वाजेपर्यंत ४६ टक्के मतदान लोकसभेच्या पहिल्या टप्प्यात संथगतीने मतदान

मुंबई : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील सात मतदारसंघात आज सकाळी ७ पासून शांततेत मतदानास सुरूवात झाली. दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३०.१९ टक्के तर दुपारी ३ वाजेपर्यंत ४६. १३ टक्के मतदान झाले असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली.
पहिल्या टप्प्यातील सात लोकसभा मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत पुढीलप्रमाणे मतदान झाले. वर्धा ३०.२२ %, रामटेक (अ.जा.) २३.१९%, नागपूर २७.४७%, भंडारा-गोंदिया ३२.०२%, गडचिरोली-चिमूर (अ.ज.) ४१.८७%, चंद्रपूर ३०.५०% आणि यवतमाळ-वाशिम २६.०९% मतदान झाले.
दुपारी ३ वाजेपर्यंत झालेले मतदान
पहिल्या टप्प्यातील सात लोकसभा मतदारसंघात पुढीलप्रमाणे मतदान झाले आहे. वर्धा ४३.९०%, रामटेक (अ.जा.) ४४.५०%, नागपूर ४१.२५%, भंडारा-गोंदिया ४९.०५%, गडचिरोली-चिमूर (अ.ज.) ५७%, चंद्रपूर ४६.३०% आणि यवतमाळ-वाशिम ४३.३५% टक्के मतदान झाले.

About Editor

Check Also

खासदार वर्षा गायकवाड यांची मागणी, मुंबईत ४० टक्केही मॅपिंग झालेले नाही, ते पूर्ण करा

लोकशाही व्यवस्थेत निवडणुका हा एक उत्सव आहे, या उत्सवात सर्वांचा सहभाग असला पाहिजे परंतु एसआयआर मोहिम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *