Breaking News

मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचाराची लाटः पाच जण ठार पोलिसांचेही काही चालेना

मणिपूरमध्ये हिंसाचाराची नवीन लाट उसळली असून, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हल्ले आणि हत्येचे सत्र सुरु झाल्याची माहिती पुढे येत आहे. मणिपूरच्या जिरीबाम जिल्ह्यात आज सकाळी काही संशयित कुकी बंडखोरांनी राज्याची राजधानी इंफाळपासून सुमारे २३० किमी अंतरावर असलेल्या नुंगचप्पी गावावर हल्ला केल्यानंतर झालेल्या ताज्या हिंसाचारात किमान पाच जण ठार झाल्याची प्राथमिक माहिती …

Read More »

जाहिरसभेत अजित पवार यांची आवाहन, मी जी चूक केली…ती करू नका धर्मराव बाबा आत्राम यांच्या कन्येवरून केले आवाहन

राज्यातील पक्षफुटीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित असून त्या याचिकांवर अद्याप अंतिम निर्णय आलेला नाही. त्यातच राज्यातील विधानसभा निवडणूका आता येऊ घातल्या असून या निचवडणूकांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा निवडूण येण्याच्या हमीवर अजित पवार गटातील अनेक आमदार आणि कार्यकर्त्ये हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी शरदचंद्र …

Read More »

बृजभूषण सरण सिंग यांच्या टीकेला बजरंग पुनियाचे प्रत्त्युतर, देशप्रेमाची मानसिकता… काँग्रेस पुरस्कृत आंदोलन असल्याची केली होता आरोप

कुस्तीपटू विनेश फोगट, बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक यांनी कुस्ती परिषदेचे अध्यक्ष बृजभूषण सरण सिंग यांच्याकडून करण्यात येत असलेल्या लैगिंक शोषणाच्या विरोधात आवाज उठविला. तसेच बृजभूषण सरण सिंग यांच्यावर कारवाई करावी म्हणून दिल्लीच्या रस्त्यावर आंदोलनही केले. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत शेवटच्या क्षणी अपात्र ठरविण्यात आल्यानंतर परतलेल्या विनेश फोगट आणि बजरंग पुनिया …

Read More »

पूजा खेडकरच्या विरोधात केंद्र सरकारची आणखी एक कारवाई नोकरीतून तात्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश जारी

केंद्र सरकारने माजी प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना नागरी सेवा परीक्षांमध्ये ओबीसी आणि अपंगत्व कोट्याच्या लाभांचा गैरवापर केल्याचा आरोपावरून यापूर्वीच पुन्हा परिक्षेसाठी बसण्यासाठी अपात्र ठरविले. त्यानंतर आज केंद्र सरकारने पूजा खेडकर हीला भारतीय प्रशासकीय सेवेतून (IAS) तात्काळ कार्यमुक्त करण्यात येत असल्याचे आदेश जारी केले. ६ सप्टेंबरच्या अधिकृत आदेशानुसार, पूजा …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचं मागणं, राज्यातील जनतेला सुख, समृद्धी मिळू दे ‘वर्षा’ निवासस्थानी श्री गणरायाची प्रतिष्ठापना

गणेशोत्सवानिमित्त आज ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक श्री गणरायाची विधिवत पूजा करुन प्रतिष्ठापना केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला सुख समृद्धी मिळू दे अशी प्रार्थना केली. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी गणरायाचे आगमन झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांच्या पत्नी सौ. लता शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, स्नुषा …

Read More »

राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची स्पष्टोक्ती, पर्युषण हा केवळ जैन धर्माचा उत्सव… स्वतःच्या पलीकडे जाऊन इतरांसाठी जगल्यास प्रगत समाज निर्मिती शक्य

पर्युषण हा केवळ जैन धर्माचा उत्सव नसून तो संपूर्ण मानवतेच्या आंतरिक शुद्धीचा उत्सव आहे. केवळ स्वतःसाठी जगणे चुकीचे आहे. स्वतःसोबत निरपेक्ष सेवाभावाने इतरांसाठी जगल्यास प्रगत समाज निर्मिती होईल, असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज येथे केले. राज्यपाल राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीमद राजचंद्र मिशन धरमपूर संस्थेच्या वतीने मुंबई …

Read More »

विनेश फोगट, बजरंग पुनियांचा काँग्रेस प्रवेश होताच बृजभूषण सरण सिंग यांची टीका महिला कुस्तीगीरांचे आंदोलन काँग्रेस पुरुस्कृत

काही महिन्यांपूर्वी देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत एकाबाजूला नव्या संसद भवनाच्या इमारतीचे उद्घाटन होत असताना दुसऱ्याबाजूला भाजपा खासदार बृजभूषण सरण सिंग यांने महिला कुस्ती पटूंचे लैगिंक शोषण केल्याच्या विरोधात रस्त्यावर आंदोलन सुरु केले होते. अखेर दिल्लीतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काही बृजभूषण सरण सिंग यांच्या विरोधात कारवाई करण्याचे धारिष्ट काही झाले …

Read More »

अमित शाह म्हणाले, जम्मू आणि काश्मीरमध्ये पहिल्यांचा तिरंग्याखाली निवडणूका जम्मू काश्मीरला तीन कुटुंबानी लुटले

जम्मू आणि काश्मीरमधील विधानसभा निवडणूकांमधील सामन्यातील रंगत वाढत चाचली आहे. नुकतेच काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि इंडिया आघाडीतील घटक पक्ष असलेल्या फारूख अब्दुला यांच्या नॅशनल काँन्फरन्सच्यावतीने प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले. यासभेत बोलताना राहुल गांधी यांनी जम्मू आणि काश्मीर राज्याला पुन्हा एकदा राज्याचा दर्जा मिळवून देणार असल्याचे आश्वासन …

Read More »

राज्यात विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा गोल-गोल वर्तुळ पुन्हा तेच चेहरे- पण पक्ष बदलेले

कधी काळी सांसारीक जीवनातील व्यक्तींकडून त्यांच्या पुढच्या पिढीला नेहमी एक शहाजोगपणाचा सल्ला देत असत, की जग-दुनिया गोल आहे. जे आपण इतरांना देतो, ते पुन्हा आपल्याकडेच येत. काही वर्षांपूर्वी अर्थात २०१४ च्या लोकसभा निवडणूकीच्या आधीपासून राज्यात् कायम सत्तेवर राहिलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचाराचे आरोप भाजपाकडून करण्यात येऊ लागले. तसेच …

Read More »

आरबीआयची माहिती खाजगी भांडवली कर्जात वाढ देशांतर्गत बँकामधील कर्ज महाग झाल्याने खाजगी कर्जाचे प्रमाण वाढतेय

नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपन्यांना (NBFCs) देशांतर्गत वित्त उभारणीत आव्हानांचा सामना करावा लागत असल्याने आणि खाजगी भांडवली भांडवल वाढताना अलीकडच्या तिमाहीत बाह्य व्यावसायिक कर्ज (ECBs) ने वेग घेतला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) डेटा दर्शवितो की ECB नोंदणी FY25 च्या पहिल्या तिमाहीत ३३६ सौद्यांमध्ये एकूण $११.१ अब्ज कर्ज घेऊन उंचावत राहिली. …

Read More »