मुंबई

राज्यात पाळीव प्राण्यांसाठी सशुल्क स्मशानभूमी मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पाठपुराव्याला यश ..

राज्यात मृत पाळीव प्राण्यांना इतरत्र टाकले जाते. परिणामी दुर्गंधी व आजार फैलावतात. यावर मात करण्यासाठी राज्य शासनाने एक शासन निर्णय जारी करून या सर्व मृत पाळीव प्राण्यांना अंत्यविधीसाठी सशुल्क स्मशानभूमी तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी नगर विकास विभागाने स्थानिक स्वराज्य संस्थांना घनकचरा व्यवस्थापन केंद्राच्या शेजारी जागा उपलब्ध करून देण्याचे …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची आशा, उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करून ‘बेस्ट’ व्हावे बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमाच्या (बेस्ट)आढावा बैठक

मुंबईतील नागरिकांची जीवनवाहिनी म्हणून ‘बेस्ट’ची ओळख आहे. नागरिकांचा प्रवास अधिक सुखकर, आरामदायी होण्यासाठी ‘बेस्ट’ने अत्याधुनिक बस आणि प्रभावी सोयीसुविधा पुरविण्यासोबत स्वत:चे उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमाच्या (बेस्ट)आढावा बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुंबई उपनगर …

Read More »

कोकणातील माकडे व वानरांच्या निर्बीजीकरणासाठी केंद्र उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन वन मंत्री गणेश नाईक यांचे निर्देश

कोकणातील फळबागा आणि शेतीपिकांना होणारा वानर आणि माकडांचा मोठ्या प्रमाणात होणाऱ्या उपद्रवाला आळा घालण्यासाठी माकडांचे निर्बीजीकरण करण्यासाठी केंद्र उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे राज्याचे वन मंत्री गणेश नाईक यांनी सांगितले. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या त्रासासंदर्भात वन मंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी गणेश नाईक बोलत होत. …

Read More »

परदेशात शिक्षण शिष्यवृत्तीसाठी १७ मे पर्यंत अर्ज करा इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे आवाहन

राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती (विजाभज), इतर मागास वर्ग (इमाव) आणि विशेष मागास प्रवर्ग (विमाप्र) मधील विद्यार्थ्यांसाठी परदेश शिक्षण शिष्यवृत्ती योजनेंतर्गत १७ मे २०२५ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाने केले आहे. या प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांनी पदव्युत्तर पदवी, पदव्युत्तर पदविका व पी एच डी अभ्यासक्रमासाठी QS …

Read More »

जोशी, लेले, मोने कुटुंबियांनी पत्रकार परिषद घेत सांगितला पहलगाममधील रक्तरंजित घटनाक्रम हर्षल लेले म्हणाला, गोळ्या झाडल्यानंतर वडिलांचे डोकं रक्ताने माखलं

पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ जणांचा बळी गेला. यापैकी ६ जणा महाराष्ट्रातील आहेत. तर चार जण डोंबिवलीतील तीन आणि पनवेलमधील एक जणाचा तर पुण्यातील दोघांचा समावेश आहे. त्यापैकी डोंबिवलीतील हेमंत जोशी, संजय लेले आणि अतुल मोने कुटुंबियांनी आज पत्रकार परिषद घेत पहलगाममधील दहशवाद्यांनी त्यांच्यासोबत घडवून आणलेला रक्तरंजित घटनाक्रम. तसेच यावेळी …

Read More »

अतुल मोने यांच्या पत्नी आणि मुलीने सांगितला, पहलगाम मधील दहशतवाद्यांच्या कृत्याचा घटनाक्रम कोण हिंदू आणि कोण मुस्लिम म्हणत गोळी मारली, लहान मुलांनाही सोडलं नाही

डोंबिवलीहून काश्मीरातील पहलगाम येथील बैसरण अर्थात मिनी स्विझरलॅड म्हणून ओखळले जाणाऱ्या ठिकाणी पर्यटनासाठी गेले होते. मात्र २२ एप्रिल रोजी दोन पाकिस्तानी आणि दोन स्थानिक दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्यात २६ जण पर्यटकांचा बळी गेला. डोंबिवलीतील तिघे आणि आणि पनवेल येथील देसले यांचे मृतदेह कालच मुंबईत आणण्यात आले. त्यानंतर आज अतुल मोने …

Read More »

महिलांच्या सुरक्षेसाठी समिती स्थापन न करणाऱ्या कार्यालयांना ५० हजारांचा दंड महिला व बालविकास अधिकारी संजय धनगर यांची माहिती

कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून (संरक्षण प्रतिबंध मनाई व निवारण)अधिनियम कायदा-२०१३ च्या कलम २६ नुसार शासकीय किंवा खासगी कार्यालये अंतर्गत तक्रार समिती’ स्थापन करणार नाहीत अशा कार्यालयांना रुपये ५० हजार दंड आकारण्याची तरतूद आहे. अशी समिती न करणे आणि कायद्यातील व नियमातील तरतुदीचे आणि जबाबदारीचे पालन न केल्यास परवाना रद्द …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा आरोप, विलेपार्लेतील दिगंबर जैन मंदिर पाडणे हा पूर्वनियोजित कट जैन समाजाला विश्वासात घेऊन त्याच ठिकाणी मंदिर पुनर्बांधण्याचे महानगरपालिका आयुक्तांचे आश्वासन

विलेपार्ले पूर्व येथील दिगंबर जैन मंदिर प्रकरण न्यायालयात असताना न्यायालयाच्या निकालाची वाट न पहाता बीएमसी अधिकाऱ्यांनी मंदिर जमीनदोस्त केले. जैन मंदिर पाडताना जैन तीर्थंकरांच्या मूर्ती, जिनवाणी आणि आदरणीय ग्रंथ आणि धर्मग्रंथांचाही घोर अपमान करण्यात आला. विलेपार्लेतील दिगंबर जैन मंदिर पाडणे हा पूर्वनियोजित कट असून भाजपा युतीचे ‘बुलडोझर सरकार’च जबाबदार असल्याचा …

Read More »

भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी पदाच्या तयारीसाठी सुवर्णसंधी एस.एस.बी. कोर्ससाठी मोफत प्रशिक्षण

भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्याची इच्छा असलेल्या महाराष्ट्रातील युवक-युवतींसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनाच्या वतीने ५ मे ते १४ मे २०२५ या कालावधीत एस.एस.बी. (SSB) कोर्स क्र. ६१ आयोजित करण्यात आला आहे. या कोर्समध्ये प्रशिक्षणार्थींना निःशुल्क प्रशिक्षण, …

Read More »

डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातूनच मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती वडाळा येथील कोरबा मिठागर भागात डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

मुंबई ही महाराष्ट्राची आहे, असे ठणकावून सांगणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. मुंबई आणि महाराष्ट्र हे एकमेकात रमलेले आहे. भाषावार प्रांतरचनेत मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातूनच झाली असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई आणि बाबासाहेब यांचे अतूट नाते असल्याचे प्रतिपादित केले. वडाळा पूर्व येथील कोरबे मिठागर भागात …

Read More »