मुंबई महानगर प्रदेशात (MMA) पेट्रोल आणि डिझेल वाहनांवर बंदी घालण्याची शक्यता पडताळून पाहण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सात सदस्यीय समिती स्थापन केली आहे. २२ जानेवारी रोजी जारी केलेल्या सरकारी ठरावानुसार, निवृत्त आयएएस अधिकारी सुधीर कुमार श्रीवास्तव यांच्या नेतृत्वाखालील समितीला तीन महिन्यांत अभ्यास करून त्यांचे निष्कर्ष सादर करण्याचे काम देण्यात आले आहे. समितीच्या …
Read More »सह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले, मुंबई उपनगरांना ‘मिनी बांग्लादेश’ बनू देणार नाही मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न : लोढा यांच्या महत्वाच्या सूचना
मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीची बैठक २७ जानेवारी २०२५ रोजी संपन्न झाली. यावेळी सह पालकमंत्री तथा कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मुंबई उपनगर जिल्ह्याची सुरक्षा आणि नागरिकांचे जीवनमान उंचावण्याच्या उद्देशाने काही महत्वाच्या सूचना केल्या. आपल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी, मुंबईचे आकर्षण बाळगून विविध मार्गाने होणारी बांग्लादेशी आणि रोहिंग्यांची अवैध घुसखोरी रोखणे …
Read More »मुंबई समुद्र किनारी रस्त्याची उत्तर वाहिनीचे लोकार्पणः काय आहेत या प्रकल्पाची वैशिष्टै सोमवारपासून मुंबईकरांच्या सेवेत, किनारी रस्त्यामुळे वेळ आणि इंधनाची बचत तर प्रदूषणापासून मुक्ती - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्त्याच्या उत्तर वाहिनीचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज झाले. किनारी रस्त्यामुळे मुंबईकरांच्या प्रवासाच्या वेळेत तसेच इंधनामध्ये मोठी बचत होणार असून प्रदूषणापासून मुक्ती मिळण्यामध्ये हा मार्ग महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी …
Read More »सायन पुल प्रश्नी भाजपा सरकारच्या उदासीनतेविरोधात मुंबई काँग्रेसचे आंदोलन खा. वर्षा गायकवाड म्हणाल्या, सायन पुलाच्या संथ गतीच्या बांधकामाचा स्थानिकांना प्रचंड त्रास
सायन पुलाच्या पुनर्बांधणीचे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू असल्याचा मोठा फटका स्थानिक मुंबईकरांना बसत आहे. दैनंदिन कामासाठी घराबाहेर पडणाऱ्या मुंबईकरांना जीव मुठीत धरून धोकादायक पदपथावरून ये-जा करावी लागत आहे. शाळकरी मुलांनाही जीव धोक्यात घालून शाळेत ये-जा करावी लागत असल्याने पालक सतत चिंतेत असतात. सायन पुलाचे बांधकाम वेगाने पूर्ण करावे अन्यथा …
Read More »वर्षा गायकवाड यांचा इशारा, …. जमीन अदानीच्या घशात जाऊ देणार नाही मुंबईकरांचा आवाज दडपण्यासाठी मोदानी सरकारकडून पोलीस बळाचा वापर
अदानीविरोधात सर्वसामान्य जनता आवाज उठवते तेव्हा मोदानी सरकार पोलीस यंत्रणेचा वापर करून आवाज दाबण्याचा प्रयत्न करते. कुर्ल्यातील मदर डेअरीच्या जमिनीच्या लुटीविरोधात लोकशाही मार्गाने निदर्शने करत असताना अदानीचे एजंट भाजपा सरकारने पोलीसांना पुढे करुन आंदोलकांना रोखले, धक्काबुक्की केली. मुंबईकरांचा आवाज दडपण्याच्या अशा कोणत्याही प्रयत्नांना काँग्रेस भीक घालत नाही. मोदानी सरकारने कितीही …
Read More »१० कोटी खर्चून बांधलेल्या कुर्ल्यातील काजूपाडा रस्त्यावर भेगा अनिल गलगली यांची कारवाईची मागणी
१० कोटी खर्चून बांधलेल्या कुर्ल्यातील काजूपाडा रस्त्यावर भेगा पडल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. कुर्ला एल वॉर्डातील सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आलेल्या काजूपाडा रस्त्यावर पडलेल्या भेगांबाबत योग्य कार्यवाही करणे व संबंधित कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे. मुंबई पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर …
Read More »एमएमआरडीए मुंबईकरांच्या स्वप्नांना आकार देणारे विकासाचे माहेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
मुंबईकरांच्या स्वप्नांना आकार देणारे आणि विकासाचे माहेर असलेले मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजे राज्याचे ग्रोथ इंजिन असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. येथील वांद्रे कुर्ला संकुल येथील कन्व्हेशन सेंटर येथे ‘एमएमआरडीए’ च्या ५० व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमास कौशल्य, रोजगार आणि उद्योजकता विकास मंत्री मंगलप्रभात …
Read More »मुंबई विद्यापीठाच्या समस्यांबाबत शासन दरबारी पाठपुरावा करणार विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे आश्वासन
मुंबई विद्यापीठातील शिक्षकांची रिक्त पद, महाविद्यालयांचा नामांकनाचा विषय, एमएमआरडीएकडून विद्यापीठ परिसरात रखडलेली विकासकामे आदी मुंबई विद्यापीठ आणि विद्यार्थ्यांच्या समस्यांबाबत शासन दरबारी मांडून त्याबाबत पाठपुरावा करणार असल्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सांगितले. आज मुंबई विद्यापीठाच्या कलिना कँम्पस येथे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सिनेट सदस्यांसोबत भेट देऊन विद्यार्थ्यांच्या …
Read More »रुग्णांना जागा कमी पडू नये यासाठी केईएममध्ये आयुष्मान शताब्दी टॉवर उभे करावे झिरो प्रिस्किप्शन पॉलिसी लागू करावी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
रुग्णसेवेचे अखंड व्रत घेतलेले केईएम रुग्णालय हे मुंबईकरांचे खऱ्या अर्थाने आधारवड आहे. ज्या विश्वासाने रुग्ण येथे येतात त्यांना जागा कमी पडू नये यासाठी केईएममध्ये आयुष्मान शताब्दी टॉवर उभे करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. अविरत रुग्णसेवेची शंभर वर्ष पूर्ण करणाऱ्या आणि लाखो रुग्णांना जीवनदान देणाऱ्या केईएम रुग्णालयाच्या चरणी …
Read More »आधार फेस ऑथेंटिकेशन व्यवहार १०० कोटींच्या टप्प्यावर पोहोचले UIDAI आणि महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने आधार संवाद आयोजित
आधारद्वारे सेवा वितरण अधिक सक्षम करण्यासाठी UIDAI (युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया) आणि महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आधार संवाद या कार्यक्रमाला BFSI, फिनटेक आणि टेलिकॉम क्षेत्रातील ५०० हितधारक उपस्थित होते. या कार्यक्रमात आधारच्या विविध उपयोजनांवर चर्चा करण्यात आली. फेस ऑथेंटिकेशन व्यवहारांचा ऐतिहासिक उच्चांक आधार फेस ऑथेंटिकेशन व्यवहारांनी १०० कोटींचा …
Read More »
Marathi e-Batmya