राजकारण

आधी विद्यार्थ्यांची सुरक्षा नंतर परीक्षा काँग्रेसच्या राज्यव्यापी तसेच ऑनलाईन आंदोलनालाही प्रचंड प्रतिसाद : प्रदेशाध्यक्ष थोरात

मुंबई : प्रतिनिधी देशभरात कोरोनाने थैमान घातले असतानाही मोदी सरकार त्याचा कसलाही विचार न करता जेईई नीट परीक्षा घेण्यावर अडून बसले आहे. या परिक्षेसाठी देशभरातून तब्बल २४ लाख ५० हजार विद्यार्थी बसले आहेत. एवढ्या मोठ्या विद्यार्थांचा जीव धोक्यात घालून परीक्षा कसल्या घेता? विद्यार्थ्यांची सुरक्षा सर्वात महत्वाची आहे. त्यामुळे या परीक्षा काही …

Read More »

सफाई कामगारांसाठी स्वतंत्र कार्यासनाच्या निर्मितीसह हे प्रश्न सोडविणार सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची माहिती

मुबई: प्रतिनिधी सफाई कामगारांचे विविध प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी सामाजिक न्याय विभागात स्वतंत्र कार्यासनाची निर्मिती विचाराधीन असल्याचे प्रतिपादन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी केले. सफाई कामगारांच्या विविध मागण्यांसंदर्भात मंत्रालयात आयोजित बैठकीत मुंडे बोलत होते. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सचिव श्याम तागडे, समाजकल्याण आयुक्त प्रवीण दराडे, सामाजिक न्याय विभागाचे सहसचिव दिनेश डिंगळे, सफाई …

Read More »

मुख्यमंत्री, उद्योजक, कारखानदार असणा-या समाजाला मागासवर्गाचे आरक्षण कसे? मराठा समाजाच्या मतांच्या फायदासाठीच आरक्षण: अॅड सदावर्ते

मुंबई: प्रतिनिधी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात पी. एस पटवालिया, अभिषेक मनू सिंघवी यांनी बाजू मांडली. याआधी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने राज्य सरकारची बाजू ऐकून घेतली होती. त्यानंतर आज विरोधकांची बाजू ऐकून घेतली. यावेळी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षण लागू करणे कसे अयोग्य आहे? …

Read More »

सरकारने काय साध्य केले? शेवटी परिक्षेचा निर्णय झालाच ना भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार

मुंबई : प्रतिनिधी पदवी अंतिम वर्षे विद्यार्थ्यांच्या मनस्थितीशी खेळ करणाऱ्या राज्य सरकारची आता माफी मागण्याची वेळ आली आहे, अशी प्रतिक्रिया भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी दिली आहे सर्वोच्च न्यायालयाने अंतिम वर्षे परिक्षांबाबत दिलेल्या निर्णयानंतर भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, एका “बबड्याच्या” हट्टापायी …

Read More »

शिक्षण मंत्री सामंत म्हणाले, परिक्षा घेण्याबाबत कुलगुरूंशी चर्चा करणार सरकारचा निर्णय परिक्षा रद्दचा नव्हताच ऐच्छिक परिक्षा आहेच

मुंबई : प्रतिनिधी ३० सप्टेंबर पूर्वी अंतिम वर्षाच्या परिक्षा घेण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने निर्णय घेतल्यानंतर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांनी न्यायालयाच्या निकालाचा आपण आदर करत असून परिक्षा घेण्याबाबत विद्यापीठांच्या कुलगुरूंसोबत निर्णय घेवून निर्णय घेणार असल्याचे सांगितले. न्यायालयाच्या निकालानंतर तातडीने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. “हा निकाल देतानाच न्यायालयानं सांगितलं …

Read More »

सुप्रिया सुळेंच्या सूचनेची धंनजय मुंडे यांच्याकडून अंमलबजावणी दर आठवड्याला दिव्यांगांच्या प्रश्नाबाबत बैठक आयोजित करणार- धनंजय मुंडे

मुंबई : प्रतिनिधी दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक धोरण, यासह दिव्यांग व्यक्तींचे विविध प्रश्न प्राधान्याने सोडविणार असून दर आठवड्याला याबाबत बैठक आयोजित करणार असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली . दिव्यांग बांधवांच्या विकासाला प्रथम प्राधान्य देण्याची आपली भूमिका आहे. या विषयाची व्याप्ती लक्षात घेऊन आपण स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभागासाठी प्रयत्नशील असून मार्चपासून …

Read More »

मंत्र्यांसह सर्वांनी आधी कोरोनाचा टेस्ट रिपोर्ट दाखवा मगच विधानभवनात प्रवेश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी घेतला सविस्तर आढावा

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन ७ व ८ सप्टेंबर रोजी घेण्यात येणार असून आरटी-पीसीआर कोरोना चाचणीचा अहवाल नकारात्मक असल्याची खात्री केल्यानंतरच विधानभवनामध्ये प्रवेश देण्यात येईल. आज यासंदर्भात विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक होऊन सर्व व्यवस्थांचा तपशीलवार आढावा घेण्यात आला. विधानभवन, मुंबई येथील प्रवेशद्वाराजवळ सन्माननीय सदस्यांसाठी ५ व ६ …

Read More »

जेईई-नीट परीक्षा पुढे ढकला काँग्रेसचे उद्या राज्यव्यापी आंदोलन !: बाळासाहेब थोरात

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाचे संकट अजूनही गंभीर असताना केंद्रातील मोदी सरकार जेईई व नीट परीक्षा घेण्यावर ठाम आहे. लाखो विद्यार्थी व पालकांना त्यांच्या आरोग्याची व सुरक्षेची चिंता सतावत असताना मोदी सरकार मात्र अशा गंभीर परिस्थितीतही परीक्षा घेण्याचा हट्ट सोडायला तयार नाही. मोदी सरकारच्या या आडमुठ्या, हटवादी भुमिकेला विरोध करत परीक्षा …

Read More »

रेडी रेकनरच्या दराची फाईल कुठे “लक्ष्मीदर्शन” करतेय? भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार

मुंबई : प्रतिनिधी पुण्याहून निघालेली रेडी रेकनरची फाईल बिल्डरांच्या कार्यालयातून “टोल” गोळा करीत तर मुंबईत येत नाही ना? तिघाडीच्या भांडणात अडकली तर नाही ना? मुंबई- पुणे एक्सप्रेस वे असताना ही फाईल सत्ताधाऱ्यांसाठी पदयात्रा करुन “लक्ष्मीदर्शन” तर करीत नाही ना? फाईल संशयाच्या बोगद्यात का अडकलेय? , अशी टीका भाजपा नेते आमदार …

Read More »

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व स्पर्धा परीक्षा पुढे ढकलल्या सुधारीत वेळापत्रक नंतर जाहीर करणार

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोविड परिस्थितीमुळे अंतिम वर्षाच्या परिक्षेसह अनेक परिक्षा रद्द करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने घेतला. मात्र स्पर्धा परिक्षांबाबत सातत्याने तारखा नव्याने जाहीर करण्यात येत होत्या. त्यामुळे या परिक्षांसाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सतत संभ्रमावस्था निर्माण होत होती. त्यामुळे राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षा पुढे …

Read More »